खामगावमध्ये विकास थांबवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विरोधकांना जनता कायमचीच लोळवणार — संजय शिनगारे यांचा जोरदार पलटवार

खामगावमध्ये विकास थांबवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विरोधकांना जनता कायमचीच  लोळवणार  — संजय शिनगारे यांचा जोरदार पलटवार

खामगाव नगरपरिषद निवडणुकीत वातावरण तापत असतानाच विरोधकांनी सुरू केलेल्या आरोपांच्या भडीमाराला भाजपच्या वतीने जिल्हा सचिव संजय शिनगारे यांनी धारदार प्रतिउत्तर दिले आहे.  “शहराचा चेहरा बदलून टाकणारा विकास डोळ्यांसमोर असताना ‘विकास नाही’ म्हणणाऱ्या विरोधकांना या निवडणुकीत जनता कायमचीच लोळवणार आहे. त्यांच्याकडे मुद्दे नाहीत, म्हणून खोटे आरोप आणि अफवांची धुरळेबाजी सुरू आहे,” अशा शब्दांत त्यांनी विरोधकांच्या राजकारणाचा खरपूस समाचार घेतला.

*“ज्यांनी खामगावला खऱ्या शाश्वत विकासापासून वंचित ठेवले त्यांनी आज आम्हाला विकास शिकवणे म्हणजे विनोद!”**
शिनगारे म्हणाले की, विरोधकांचा इतिहासच शहराचे नुकसान करणारा आहे. “त्यांच्या कारकीर्दीत जी कामे झाली नाहीत, ती आम्ही गेल्या दशकात प्रत्यक्ष करून दाखवली. त्यामुळेच त्यांच्या अंगाला विकासाची चर्चा सहन होत नाही. शहर चालवताना काय करायचं आणि कसं करायचं हे ज्यांना कधी कळलंच नाही, ते आज तोंडाला फेस फोडत आरोप करत फिरत आहेत,” असा जोरदार हल्लाबोल शिनगारे यांनी केला.

*रस्त्यांवरून टीका करणाऱ्यांनी आधी रस्ते कसे असतात ते तरी पाहावेत**

विरोधकांनी ‘रस्त्यांची कामे निकृष्ट आहेत’, ‘पूर्ण झाली नाहीत’, ‘थांबलेली आहेत’, ‘नागरिक त्रस्त आहेत’ अशी जी बोंबाबोंब केली आहे, त्यावर शिनगारे यांनी सरळसरळ उत्तर दिले:
“खामगावच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच वेळी तब्बल २९ रस्त्यांची कामे सुरू झाली आहेत. इतका मोठा प्रकल्प हातात घेतला की काही काळ तांत्रिक अडचणी, जॉईनिंग गॅप्स, धूळ, अडथळे येतातच. त्याला निकृष्ट म्हणणारे म्हणजे तांत्रिक अज्ञान पसरवणारे लोक.”

ते पुढे म्हणाले, “आज १३ रस्ते पूर्णत्वाकडे  आले आहेत, आणि उरलेले १६ रस्ते वेगात सुरू होणार आहेत. हे सर्व रस्ते पुढील 20 ते 25 वर्षांच्या दृष्टीने अधिक मजबूत आणि दीर्घकाल टिकतील अश्या पद्धतीने बांधले जात आहेत. नागरिकांना तात्पुरता त्रास नक्की आहे, परंतु हा त्रास दीर्घकालीन सुविधेसाठी आहे. रस्ता बनण्याआधी थोडा धूर, धूळ, खोदकाम अपरिहार्य असतं—हे माहित असूनही त्याच्यावर राजकारण करणारे शहराचे भले कधीच इच्छित नाहीत.”

*निधी गैरवापराचा आरोप म्हणजे विनोद—पारदर्शकतेचे धडे देणाऱ्यांची स्वतःची तिजोरी काळी*

विरोधकांनी केलेल्या “निधीचा गैरवापर झालाय” या आरोपावर शिनगारे अधिक आक्रमक झाले.
“ज्यांच्या कारकीर्दीत निधी फक्त दिखाव्यावर खर्च होत होता , ते आज पारदर्शकतेचे लेक्चर देतात, हेच हास्यास्पद आहे. आमच्या प्रत्येक प्रकल्पाचा अर्थसंकल्प, तांत्रिक मानके, मंजुरी, खर्च—सगळं खुलेपणाने जनतेसमोर आहे. गैरवापराचे आरोप म्हणजे त्यांची स्वतःची काळी छाया आमच्यावर टाकण्याचा प्रयत्न,” असे त्यांनी स्पष्ट केले.

*अफवांमध्ये हवा, कामांमध्ये दम—जनता खरे-खोटे ओळखते*

शिनगारे म्हणाले की, विरोधकांचे आरोप ही त्यांची हतबलता दाखवणारी लक्षणे आहेत. “कामे नाकारून मिळणारा राजकीय फायदा शहरात कुणाला मिळाला नाही आणि मिळणारही नाही. जनता प्रत्यक्ष पाहत आहे की खामगावच विकास मॉडेल कस बदलू लागल आहे. अफवांमध्ये हवा असते, कामांमध्ये दम असतो—जनता हे चांगलं ओळखते.”

*खामगावचे पुढील दशक ठरलेले आहे—आणखी मोठी कामे, अधिक वेगात*

“पुढील काळात पाणीपुरवठ्याची शाश्वत योजना, नवीन ड्रेनेज लाइन, विस्तृत रस्ते-जाळे, हरित उपक्रम, आधुनिक बाजारपेठा, महिला-सुरक्षेची पायाभूत सोय, युवकांसाठी रोजगार उपक्रम आणि डिजिटल प्रशासन—ही सर्व कामे आता सुपर-फास्ट मोडमध्ये जातील,” असे शिनगारे म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “विरोधकांचे काम थांबवण्याचे राजकारण आम्हाला माहीत आहे. पण आमचं काम थांबत नाही. खामगावचा विकास हा राजकीय घोषणांचा नव्हे, तर केलेल्या कामांचा पुरावा आहे. आरोप करणारे येतील-जातील; शहराच्या प्रगतीचा प्रवास मात्र थांबणार नाही.”

*विकास कामात काड्या करणे हीच विरोधकांची जनसेवा आहे का ?*
ना. आकाशदादा  फुंडकर यांच्या पुढाकारातून खामगाव शहरात गत १० वर्षांत मोठ्या प्रमाणात पायाभूत विकास झाला आहे. येणारी पाच वर्ष ही खामगाव शहराला विकसित शहर म्हणून बदलविण्यासाठीचा रोडमॅप तयार झाला आहे.  ही विकास कामे वेगाने पुढे सरकत असताना एक माजी प्रतिनिधी त्यात अडथळे आणण्याचा पाजीपणा करत आहे. नागरी सुविधांसाठी  कोणतंही विकास काम सुरु झाले कि काड्या करण्याची त्यांची खोड काही केल्या जात नाही. जनतेने नाकारले, कार्यकर्ते सोडून गेलेलं आणि उरलीसुरली सत्तास्थानं हातातून गेल्याने हतबल झालेले विरोधक मनात येईल ते आरोप करीत आहेत. 
या निवडणुकीत त्यांचा एकही उमेदवार निवडून येणार नाही हे विरोधकांना आधीच कळून चुकले आहे. त्यामुळे ते आक्राळस्तेपणाने सोशल मीडियावर ए. आय. निर्मित खोटा प्रचार करीत सुटले आहेत. असे ही शिंनगारे यांनी प्रसिद्धि पत्रकात म्हटले आहे

Comments

Popular Posts

*नम्रता गणेशराव धोत्रे कौलखेड अकोला या लाडक्या बहिणी विरुद्ध मलकापूर पो. स्टे. ला महाराष्ट्रातून पहिली तक्रार दाखल. मलकापूर (दिव्यांग शक्ती प्रतिनिध)ी*नुकताच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहिर केली मात्र अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसत आहे.अर्जदार महीला नम्रता यांनी प्रथमतः दि. ३०-०८-२०२४ रोजी योजनेचा अर्ज केला व अंतिमतः दि. ०२-०९-२०२४ रोजी त्यांचा शासनाद्वारे अर्ज मंजुर करण्यात आला आहे व त्याप्रमाणे प्रस्तुत अर्जदार हिस दरमहा १५००/- रूपये प्रमाणे निधी तिचे खात्यात प्राप्त झाला आहे. खरे म्हणजे अर्जदार नम्रता हिने खोटे व बनावटी हमीपत्राचा दस्त तयार करून त्यात खोटी व बनावटी माहित दिली व तो खरा आहे असे भासवुना जाणीव पूर्वक सदर दस्त संबंधीत अधिकाऱ्यांकडे सादर केला.त्याद्वारे शासनाची फसवणुक करून स्वतःचा गैरहक्की आर्थिक लाभ प्राप्त केला आहे.याबाबत सविस्तर असे की सदर योजने करीता पात्रता निकष असे की,ज्या महिलेच्या एकत्रीत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० /- रूपयांपेक्षा अधिक आहे, ज्या कुटूंबातील सदस्य आयकर दाता आहे, ज्या कुटूंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी म्हणुन सेवानिवृत्ती नंतर सेवानिवृत्ती वेतन घेतात, ज्यांच्या कुटूंबात चारचाकी वाहन आहे किंवा ज्या कुटूंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरत नाही. पात्र अर्जदार लाडक्या बहिणीला तसे हमीपत्र सुद्धा द्यावे लागते.असे निकष असताना अर्जदार लाडकी बहिण नम्रता हिने तिचे लग्नानंतरचे नावाने अर्ज केला आहे. सदर अर्जदार हिचे सासर कडील एकत्र कुटूंबाचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त आहे, सदर अर्जदार हिचे सासरे सेवानिवृत्ती वेतन घेतात, त्यांचे पती दिपक चांभारे पाटील नावाने एकुण ६ एकर शेतजमिन आहे. म्हणजेच निकषाप्रमाणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे. असे असतांना देखील व सदरची बाब पुर्णतः माहिती व जाणीवेतील असतांना देखील प्रस्तुत अर्जदार हिने खोटे हमीपत्र निष्पादीत केले व सदर हमीपत्र व त्यातील मजकुर खोटा आहे याची माहिती व जाणीव असतांना गैरहक्की आर्थिक लाभाचे दुषित हेतुने त्याचा वापर करून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा आर्थिक लाभ प्राप्त करून घेतला आहे.प्रस्तुत अर्जदार ही तिचे पतीपासून गेल्या पाच ते सहा वर्षापासुन विभक्त राहत आहे. त्यांचेदरम्यान अकोला येथील न्यायालयात खावटीकरीता न्यायालयीन प्रकरणे सुरू असून सदर अर्जदार हिस तिचे पतीपासून एकत्रीतरित्या दरमहा ५०,००० /- रूपये खावटी मंजुर झाल्याची देखील तक्रारीत नमूद आहे. सबब निकषास पात्र नसतांना देखील खोटी माहिती देवून व खरी माहिती लपवून सदर अर्जदार हिने योजनेचा लाभ मिळविला आहे. सदर अर्जदार हिचे माहेरचे नांव नम्रता गणेश धोत्रे आहे व सदर धोत्रे परिवारात चारचाकी वाहन आहे व त्या परिवाराचे उत्पन्न देखील अडीच लाखापेक्षा जास्त आहे. असे असतांना स्वतःचे वैवाहिकस्थितीबाबत खोटी माहिती प्रस्तुत अर्जदाराने दिली असून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला आहे.सदर महिती जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसिलदार, मलकापूर यांचेकडून अर्ज व त्यासोबतची कागदपत्र यांची माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागणी केली असता. अर्जदार नम्रता यांनी खोटे हमीपत्र तयार करून त्यात खोटी माहिती देऊन शासनाची फसवणुक केल्याबाबतची व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला असल्याचे दिसले. नम्रता यांचे सदरचे कृत्य दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा असून त्याबाबत त्यांच्या विरूध्द मलकापूर पो. स्टे. ला फिर्याद श्री. राजेंद्र काजळे यांनी दिली आहे.