*एपीएमसीच्या असुविधा मुळे उपोषण*

*एपीएमसीच्या असुविधा मुळे उपोषण*

मलकापूर 
(दिव्यांग शक्ती)
मलकापूर येथील 
मौजे बेलाड येथील मार्केट यार्ड मध्ये शेतकऱ्यासंबधी विविध समस्या
आहेत. त्या समस्यांचे निराकरण व्हावे याकरिता उपोषणाचा इशारा देण्यात आलेला आहे
अ) महिला कास्तकारांना शौचालय नसणे.
ब) मार्केटयार्ड मध्ये पुरेश्याप्रमाणात सि.सी.टी.व्ही. नसणे,
क) कास्तकारांना जेवनाची व्यवस्था नसणे.
ड) कास्तकारांना शुध्द पिण्याचे पाणी नसणे आणी इतरही समस्या
आहेत.
वरील समस्या जेव्हापासुन मार्केटयार्ड चालु आहे तेव्हापासुन आहे. भारत हा कृषीप्रधान देश असताना देखील शेतकऱ्यांचे खुप जास्त हाल होत आहे. मार्केटयार्ड मध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, जे पाणी पिण्यासाठी उपलब्ध आहे त्या पाण्यामध्ये जिव जंतु असुन स्वच्छ पाणी पिण्यासाठी नाही. तसेच सदरहु मार्केटमध्ये कमी म्हणजेच बोटावर मोजण्याऐवढे सि.सी. टी. व्ही असल्यामुळे तेथुन शेतकप्याचे धान्य चोरीला जाते. मार्केडयार्ड मध्ये शेतकऱ्यांना दिवसदिवस भर राहावे लागते परंतु तिथे जेवनाची कोणतीही व्यवस्था नाही. शेतकऱ्यांना दिवसभर मार्केटमध्ये राहावे लागते तर त्यांना
उपाशी पोटी राहावे लागते. तसेच महिला शेतकऱ्यांना शौचालयाची व्यवस्था देखील नाही. यामुळे सर्व शेतकरी / कास्तकार यांच्यावर एका प्रकारे अन्याय होत आहेत. आपल्या देशात जनतेच्या हितासाठी सकाळी शपथविधी होवू शकतो तर एखादया मंत्र्यांच्या दौऱ्या निर्मीत्त हेलीकॉप्टर उरण्यासाठी लाखो रूपये खर्च करून हेलीकॉप्टर उत्तरवण्यासाठी जागा करण्यात येते. रोड बांधण्यात येता गडडे भुजण्यात येता त्यांच्यासाठी शाही जेवनाची तयारी करण्यात येते. तसेच रोड ब्लाक करून जनतेला त्रास दिला जातो. मुख्य सांगायचे म्हणजे देशातील राजकीय लोकांसाठी युध्द पातळीवर कार्य केल्या जाते त्याच धरतीवर जगाचा पोशिदा असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी युध्द पातळीवर कार्य व्हावेत.
वरील समस्या सोडवण्यासाठी ७ दिवसाचा कालावधी खुप असुन आपण समस्यावर लक्ष देवून वरील समस्यां ७ दिवसाचे आत सोडवण्यात याव्यात. नाहीतर आम्ही ८व्या दिवशी लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करू मग त्यापासुन येणाऱ्या परिणामास तुम्ही सर्वस्वी जबाबदार राहाल.
असे डॉक्टर हनुमान भगत यांनी प्रसिद्धीस दिले आहे

Comments

Popular Posts

*नम्रता गणेशराव धोत्रे कौलखेड अकोला या लाडक्या बहिणी विरुद्ध मलकापूर पो. स्टे. ला महाराष्ट्रातून पहिली तक्रार दाखल. मलकापूर (दिव्यांग शक्ती प्रतिनिध)ी*नुकताच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहिर केली मात्र अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसत आहे.अर्जदार महीला नम्रता यांनी प्रथमतः दि. ३०-०८-२०२४ रोजी योजनेचा अर्ज केला व अंतिमतः दि. ०२-०९-२०२४ रोजी त्यांचा शासनाद्वारे अर्ज मंजुर करण्यात आला आहे व त्याप्रमाणे प्रस्तुत अर्जदार हिस दरमहा १५००/- रूपये प्रमाणे निधी तिचे खात्यात प्राप्त झाला आहे. खरे म्हणजे अर्जदार नम्रता हिने खोटे व बनावटी हमीपत्राचा दस्त तयार करून त्यात खोटी व बनावटी माहित दिली व तो खरा आहे असे भासवुना जाणीव पूर्वक सदर दस्त संबंधीत अधिकाऱ्यांकडे सादर केला.त्याद्वारे शासनाची फसवणुक करून स्वतःचा गैरहक्की आर्थिक लाभ प्राप्त केला आहे.याबाबत सविस्तर असे की सदर योजने करीता पात्रता निकष असे की,ज्या महिलेच्या एकत्रीत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० /- रूपयांपेक्षा अधिक आहे, ज्या कुटूंबातील सदस्य आयकर दाता आहे, ज्या कुटूंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी म्हणुन सेवानिवृत्ती नंतर सेवानिवृत्ती वेतन घेतात, ज्यांच्या कुटूंबात चारचाकी वाहन आहे किंवा ज्या कुटूंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरत नाही. पात्र अर्जदार लाडक्या बहिणीला तसे हमीपत्र सुद्धा द्यावे लागते.असे निकष असताना अर्जदार लाडकी बहिण नम्रता हिने तिचे लग्नानंतरचे नावाने अर्ज केला आहे. सदर अर्जदार हिचे सासर कडील एकत्र कुटूंबाचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त आहे, सदर अर्जदार हिचे सासरे सेवानिवृत्ती वेतन घेतात, त्यांचे पती दिपक चांभारे पाटील नावाने एकुण ६ एकर शेतजमिन आहे. म्हणजेच निकषाप्रमाणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे. असे असतांना देखील व सदरची बाब पुर्णतः माहिती व जाणीवेतील असतांना देखील प्रस्तुत अर्जदार हिने खोटे हमीपत्र निष्पादीत केले व सदर हमीपत्र व त्यातील मजकुर खोटा आहे याची माहिती व जाणीव असतांना गैरहक्की आर्थिक लाभाचे दुषित हेतुने त्याचा वापर करून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा आर्थिक लाभ प्राप्त करून घेतला आहे.प्रस्तुत अर्जदार ही तिचे पतीपासून गेल्या पाच ते सहा वर्षापासुन विभक्त राहत आहे. त्यांचेदरम्यान अकोला येथील न्यायालयात खावटीकरीता न्यायालयीन प्रकरणे सुरू असून सदर अर्जदार हिस तिचे पतीपासून एकत्रीतरित्या दरमहा ५०,००० /- रूपये खावटी मंजुर झाल्याची देखील तक्रारीत नमूद आहे. सबब निकषास पात्र नसतांना देखील खोटी माहिती देवून व खरी माहिती लपवून सदर अर्जदार हिने योजनेचा लाभ मिळविला आहे. सदर अर्जदार हिचे माहेरचे नांव नम्रता गणेश धोत्रे आहे व सदर धोत्रे परिवारात चारचाकी वाहन आहे व त्या परिवाराचे उत्पन्न देखील अडीच लाखापेक्षा जास्त आहे. असे असतांना स्वतःचे वैवाहिकस्थितीबाबत खोटी माहिती प्रस्तुत अर्जदाराने दिली असून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला आहे.सदर महिती जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसिलदार, मलकापूर यांचेकडून अर्ज व त्यासोबतची कागदपत्र यांची माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागणी केली असता. अर्जदार नम्रता यांनी खोटे हमीपत्र तयार करून त्यात खोटी माहिती देऊन शासनाची फसवणुक केल्याबाबतची व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला असल्याचे दिसले. नम्रता यांचे सदरचे कृत्य दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा असून त्याबाबत त्यांच्या विरूध्द मलकापूर पो. स्टे. ला फिर्याद श्री. राजेंद्र काजळे यांनी दिली आहे.