युगधर्म पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची पार्ले फॅक्टरीला शैक्षणिक भेट

युगधर्म पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची पार्ले फॅक्टरीला शैक्षणिक भेट

खामगाव 
संतोष आटोळे

युगधर्म पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गुरूवारी पार्ले फॅक्टरीला शैक्षणिक भेट देऊन उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. या भेटीमध्ये विद्यार्थ्यांना बिस्किट व इतर खाद्यपदार्थांच्या निर्मिती प्रक्रिया, आधुनिक यंत्रसामग्रीची कार्यपद्धती तसेच स्वच्छता व गुणवत्ता नियंत्रणाची माहिती देण्यात आली.

विद्यार्थ्यांनी फॅक्टरीतील विविध विभागांना भेट देत उत्पादन कसे तयार होते, त्यातील तांत्रिक टप्पे, पॅकिंग तसेच वितरण प्रक्रिया याबाबत उत्साहाने प्रश्न विचारले. मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्रातील नवकल्पना आणि कौशल्यांच्या संधी याबद्दलची प्रेरणादायी माहिती दिली.

या शैक्षणिक दौऱ्यामुळे विद्यार्थ्यांचे औद्योगिक ज्ञान समृद्ध झाले असून प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी त्यांना मिळाली. शाळेच्या व्यवस्थापनाने अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान आणि उद्योग यांविषयीची आवड वाढते असे सांगितले.

विद्यार्थ्यांना पार्ले कंपनीतर्फे बिस्कीट तसेच चॉकलेट चे वितरण करण्यात आले.तसेच या शैक्षणिक भेटीनंतर शाळेच्या विद्यार्थ्यांनी जनुना येथील रेणुका माता मंदिरात जाऊन सहभोजनाचा आनंद घेतला.
ही शैक्षणिक भेट शाळेचे प्राचार्य श्री अनिरुद्ध अवचार सर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. 
या शैक्षणिक सहलीसाठी प्राचार्य अनिरुद्ध अवचार सर यांच्यासह उपप्राचार्य सौ .अंकिता राठी मॅडम ,सहाय्यक शिक्षिका सौ .संगीता देशमुख मॅडम,  सौ .सपना रेठेकर मॅडम ,  तसेच सौ .रेखा राऊत मॅडम सौ .कल्पना वानखेडे मॅडम, जिया मथानी मॅडम तसेच शाळेच्या मदतनीस  वैशाली ताई , सुरेखा ताई यांचे योगदान लाभले.
.

Comments

Popular Posts

*नम्रता गणेशराव धोत्रे कौलखेड अकोला या लाडक्या बहिणी विरुद्ध मलकापूर पो. स्टे. ला महाराष्ट्रातून पहिली तक्रार दाखल. मलकापूर (दिव्यांग शक्ती प्रतिनिध)ी*नुकताच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहिर केली मात्र अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसत आहे.अर्जदार महीला नम्रता यांनी प्रथमतः दि. ३०-०८-२०२४ रोजी योजनेचा अर्ज केला व अंतिमतः दि. ०२-०९-२०२४ रोजी त्यांचा शासनाद्वारे अर्ज मंजुर करण्यात आला आहे व त्याप्रमाणे प्रस्तुत अर्जदार हिस दरमहा १५००/- रूपये प्रमाणे निधी तिचे खात्यात प्राप्त झाला आहे. खरे म्हणजे अर्जदार नम्रता हिने खोटे व बनावटी हमीपत्राचा दस्त तयार करून त्यात खोटी व बनावटी माहित दिली व तो खरा आहे असे भासवुना जाणीव पूर्वक सदर दस्त संबंधीत अधिकाऱ्यांकडे सादर केला.त्याद्वारे शासनाची फसवणुक करून स्वतःचा गैरहक्की आर्थिक लाभ प्राप्त केला आहे.याबाबत सविस्तर असे की सदर योजने करीता पात्रता निकष असे की,ज्या महिलेच्या एकत्रीत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० /- रूपयांपेक्षा अधिक आहे, ज्या कुटूंबातील सदस्य आयकर दाता आहे, ज्या कुटूंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी म्हणुन सेवानिवृत्ती नंतर सेवानिवृत्ती वेतन घेतात, ज्यांच्या कुटूंबात चारचाकी वाहन आहे किंवा ज्या कुटूंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरत नाही. पात्र अर्जदार लाडक्या बहिणीला तसे हमीपत्र सुद्धा द्यावे लागते.असे निकष असताना अर्जदार लाडकी बहिण नम्रता हिने तिचे लग्नानंतरचे नावाने अर्ज केला आहे. सदर अर्जदार हिचे सासर कडील एकत्र कुटूंबाचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त आहे, सदर अर्जदार हिचे सासरे सेवानिवृत्ती वेतन घेतात, त्यांचे पती दिपक चांभारे पाटील नावाने एकुण ६ एकर शेतजमिन आहे. म्हणजेच निकषाप्रमाणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे. असे असतांना देखील व सदरची बाब पुर्णतः माहिती व जाणीवेतील असतांना देखील प्रस्तुत अर्जदार हिने खोटे हमीपत्र निष्पादीत केले व सदर हमीपत्र व त्यातील मजकुर खोटा आहे याची माहिती व जाणीव असतांना गैरहक्की आर्थिक लाभाचे दुषित हेतुने त्याचा वापर करून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा आर्थिक लाभ प्राप्त करून घेतला आहे.प्रस्तुत अर्जदार ही तिचे पतीपासून गेल्या पाच ते सहा वर्षापासुन विभक्त राहत आहे. त्यांचेदरम्यान अकोला येथील न्यायालयात खावटीकरीता न्यायालयीन प्रकरणे सुरू असून सदर अर्जदार हिस तिचे पतीपासून एकत्रीतरित्या दरमहा ५०,००० /- रूपये खावटी मंजुर झाल्याची देखील तक्रारीत नमूद आहे. सबब निकषास पात्र नसतांना देखील खोटी माहिती देवून व खरी माहिती लपवून सदर अर्जदार हिने योजनेचा लाभ मिळविला आहे. सदर अर्जदार हिचे माहेरचे नांव नम्रता गणेश धोत्रे आहे व सदर धोत्रे परिवारात चारचाकी वाहन आहे व त्या परिवाराचे उत्पन्न देखील अडीच लाखापेक्षा जास्त आहे. असे असतांना स्वतःचे वैवाहिकस्थितीबाबत खोटी माहिती प्रस्तुत अर्जदाराने दिली असून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला आहे.सदर महिती जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसिलदार, मलकापूर यांचेकडून अर्ज व त्यासोबतची कागदपत्र यांची माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागणी केली असता. अर्जदार नम्रता यांनी खोटे हमीपत्र तयार करून त्यात खोटी माहिती देऊन शासनाची फसवणुक केल्याबाबतची व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला असल्याचे दिसले. नम्रता यांचे सदरचे कृत्य दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा असून त्याबाबत त्यांच्या विरूध्द मलकापूर पो. स्टे. ला फिर्याद श्री. राजेंद्र काजळे यांनी दिली आहे.