दुबई येथे महाराष्ट्रातील वारकऱ्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा साजरा केला

दुबई येथे महाराष्ट्रातील वारकऱ्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा साजरा केला

अकोटः 
(मनोज भगत)
महाराष्ट्रातील संत ज्ञानेश्वर महाराजांचा ७२९ वा संजीवन समाधी सोहळा दुबई येथील विदेशात १७ नोव्हेंबर रोजी भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.
 हा सोहळा कार्तिकी वद्य त्रयोदशीच्या तिथीला आली असल्याने महाराष्ट्रातील वारकरी भावी भक्त हे दुबई दौऱ्यावर होते या ठिकाणी ह भ प गणेश महाराज शेटे यांच्या हस्ते संत ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर संत गजानन महाराजांच्या विजय ग्रंथ व प्रतिमा पूजन करण्यात आले याप्रसंगी भाविक भक्तांनी आरती केली त्यानंतर प्रा. माया म्हैसने यांनी पसायदान म्हटले. महाराष्ट्रातील वारकरी हे जगात कुठेही असले तरी संत ज्ञानेश्वर महाराजांनी शिकवण दिलेल्या हे विश्वचि माझे घर  या ओळीप्रमाणे भावी भक्तांनी विदेशात आपल्या अध्यात्म व संस्कृतीचे जतन करीत वारकरी पोशाखात हा समाधी सोहळा साजरा केला या सोहळ्याला महाराष्ट्रातीलच नव्हे तर विदेशी पर्यटकांनी सुद्धा हजेरी लावली होती त्यांनी सुद्धा संत ज्ञानेश्वर महाराजांचे दर्शन घेतले त्यामुळे हा संजीवनी सोहळा लक्षवेधी ठरला होता. या सोहळ्याला मोठ्या प्रमाणावर भावीकभक्त उपस्थित होते. ह भ प गणेश महाराज शेटे हे परमहंस आंतरराष्ट्रीय यात्रा कंपनीच्या माध्यमातून चारधाम सह भाविक भक्तांना विजय दौराकडून आणतात एवढ्या दौरा दुबईतील विदेशात असल्यामुळे त्यांनी या समाधी सोहळ्याचे खास आयोजन केले होते

Comments

Popular Posts

*नम्रता गणेशराव धोत्रे कौलखेड अकोला या लाडक्या बहिणी विरुद्ध मलकापूर पो. स्टे. ला महाराष्ट्रातून पहिली तक्रार दाखल. मलकापूर (दिव्यांग शक्ती प्रतिनिध)ी*नुकताच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहिर केली मात्र अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसत आहे.अर्जदार महीला नम्रता यांनी प्रथमतः दि. ३०-०८-२०२४ रोजी योजनेचा अर्ज केला व अंतिमतः दि. ०२-०९-२०२४ रोजी त्यांचा शासनाद्वारे अर्ज मंजुर करण्यात आला आहे व त्याप्रमाणे प्रस्तुत अर्जदार हिस दरमहा १५००/- रूपये प्रमाणे निधी तिचे खात्यात प्राप्त झाला आहे. खरे म्हणजे अर्जदार नम्रता हिने खोटे व बनावटी हमीपत्राचा दस्त तयार करून त्यात खोटी व बनावटी माहित दिली व तो खरा आहे असे भासवुना जाणीव पूर्वक सदर दस्त संबंधीत अधिकाऱ्यांकडे सादर केला.त्याद्वारे शासनाची फसवणुक करून स्वतःचा गैरहक्की आर्थिक लाभ प्राप्त केला आहे.याबाबत सविस्तर असे की सदर योजने करीता पात्रता निकष असे की,ज्या महिलेच्या एकत्रीत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० /- रूपयांपेक्षा अधिक आहे, ज्या कुटूंबातील सदस्य आयकर दाता आहे, ज्या कुटूंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी म्हणुन सेवानिवृत्ती नंतर सेवानिवृत्ती वेतन घेतात, ज्यांच्या कुटूंबात चारचाकी वाहन आहे किंवा ज्या कुटूंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरत नाही. पात्र अर्जदार लाडक्या बहिणीला तसे हमीपत्र सुद्धा द्यावे लागते.असे निकष असताना अर्जदार लाडकी बहिण नम्रता हिने तिचे लग्नानंतरचे नावाने अर्ज केला आहे. सदर अर्जदार हिचे सासर कडील एकत्र कुटूंबाचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त आहे, सदर अर्जदार हिचे सासरे सेवानिवृत्ती वेतन घेतात, त्यांचे पती दिपक चांभारे पाटील नावाने एकुण ६ एकर शेतजमिन आहे. म्हणजेच निकषाप्रमाणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे. असे असतांना देखील व सदरची बाब पुर्णतः माहिती व जाणीवेतील असतांना देखील प्रस्तुत अर्जदार हिने खोटे हमीपत्र निष्पादीत केले व सदर हमीपत्र व त्यातील मजकुर खोटा आहे याची माहिती व जाणीव असतांना गैरहक्की आर्थिक लाभाचे दुषित हेतुने त्याचा वापर करून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा आर्थिक लाभ प्राप्त करून घेतला आहे.प्रस्तुत अर्जदार ही तिचे पतीपासून गेल्या पाच ते सहा वर्षापासुन विभक्त राहत आहे. त्यांचेदरम्यान अकोला येथील न्यायालयात खावटीकरीता न्यायालयीन प्रकरणे सुरू असून सदर अर्जदार हिस तिचे पतीपासून एकत्रीतरित्या दरमहा ५०,००० /- रूपये खावटी मंजुर झाल्याची देखील तक्रारीत नमूद आहे. सबब निकषास पात्र नसतांना देखील खोटी माहिती देवून व खरी माहिती लपवून सदर अर्जदार हिने योजनेचा लाभ मिळविला आहे. सदर अर्जदार हिचे माहेरचे नांव नम्रता गणेश धोत्रे आहे व सदर धोत्रे परिवारात चारचाकी वाहन आहे व त्या परिवाराचे उत्पन्न देखील अडीच लाखापेक्षा जास्त आहे. असे असतांना स्वतःचे वैवाहिकस्थितीबाबत खोटी माहिती प्रस्तुत अर्जदाराने दिली असून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला आहे.सदर महिती जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसिलदार, मलकापूर यांचेकडून अर्ज व त्यासोबतची कागदपत्र यांची माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागणी केली असता. अर्जदार नम्रता यांनी खोटे हमीपत्र तयार करून त्यात खोटी माहिती देऊन शासनाची फसवणुक केल्याबाबतची व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला असल्याचे दिसले. नम्रता यांचे सदरचे कृत्य दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा असून त्याबाबत त्यांच्या विरूध्द मलकापूर पो. स्टे. ला फिर्याद श्री. राजेंद्र काजळे यांनी दिली आहे.