बुलढाणा जिल्यातील भूमी पुत्र मा .बाबुराव भगवान विणकर (वाकद जहांगिर) यांना प्रियदर्शी राजा सम्राट अशोक आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर

बुलढाणा जिल्यातील भूमी पुत्र मा .बाबुराव भगवान विणकर (वाकद जहांगिर) यांना प्रियदर्शी राजा सम्राट अशोक आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर..

बुलढाणा
दिव्यांग शक्ती
डॉ बाबासाहेब आंबेडकर अकॅडमी निपानिया दार्जिलिंग वेस्ट बंगाल  येथे होत असलेल्या  ,,चलो बुद्ध की और,,अंतर्गत 11 वे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संमेलन 2 नोव्हेंबर 2025 ल होणार आहे ज्या मध्ये 13 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचा समावेश आहे ,चलो बुद्ध की और,या मिशन मध्ये देश आणि विदेश मधून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.या मध्ये मा.बाबुराव भगवान विणकर महाराष्ट्र यांची सामाजिक आणि संरक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत प्रियदर्शी राजा सम्राट अशोक आंतरराष्ट्रीय पुरस्कार  जाहीर झाल्यामुळे त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत असून वाकद या गावाच्या वैभवात आणखी एक मनाचा तुरा रोवला गेला आहे  बुलढाणा जिल्हा व महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे पुरस्काराचे स्वरूप सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र आहे  या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती केंद्रीय राज्यमंत्री तथा सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालय नवी दिल्ली मा.रामदास आठवले साहेब यांच्या हसते शुभारंभ होणार आहे आणि डॉ काशीराम पैठणे नॅशनल व्हाईस प्रेसिडेंट भारतीय बौद्ध संघ नवी दिल्ली.GHRPF नॅशनल एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेंड नवी दिल्ली कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहे त्यांनी आतापर्यंत 11 राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय परिषदा घेतल्या आहेत या माध्यमातून ते .सामाजिक .राजनैतिक. शैक्षणिक.उद्योजक. संरक्षण व मानव कल्याणासाठी अशा विविध क्षेत्रात देशभरात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लोकांना पुरस्कृत करण्यात येत आहे या कार्यक्रसाठी देशभरातून नामांकित मान्यवर उपस्थित असणार आहे प्रो.गोरख साठे डॉ .गोले तमांग डॉ. डी बी गायकवाड. डॉ .सुभाष लोखंडे डॉ.संजय कांबळे. ॲड.प्रताप खाटी मिस ,फाल्गुनी मिस. शशिबाला अधिकारी मा सूरज सिंग आदि मान्यवर उपस्थित असणार आहे

Comments

Popular Posts

*नम्रता गणेशराव धोत्रे कौलखेड अकोला या लाडक्या बहिणी विरुद्ध मलकापूर पो. स्टे. ला महाराष्ट्रातून पहिली तक्रार दाखल. मलकापूर (दिव्यांग शक्ती प्रतिनिध)ी*नुकताच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहिर केली मात्र अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसत आहे.अर्जदार महीला नम्रता यांनी प्रथमतः दि. ३०-०८-२०२४ रोजी योजनेचा अर्ज केला व अंतिमतः दि. ०२-०९-२०२४ रोजी त्यांचा शासनाद्वारे अर्ज मंजुर करण्यात आला आहे व त्याप्रमाणे प्रस्तुत अर्जदार हिस दरमहा १५००/- रूपये प्रमाणे निधी तिचे खात्यात प्राप्त झाला आहे. खरे म्हणजे अर्जदार नम्रता हिने खोटे व बनावटी हमीपत्राचा दस्त तयार करून त्यात खोटी व बनावटी माहित दिली व तो खरा आहे असे भासवुना जाणीव पूर्वक सदर दस्त संबंधीत अधिकाऱ्यांकडे सादर केला.त्याद्वारे शासनाची फसवणुक करून स्वतःचा गैरहक्की आर्थिक लाभ प्राप्त केला आहे.याबाबत सविस्तर असे की सदर योजने करीता पात्रता निकष असे की,ज्या महिलेच्या एकत्रीत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० /- रूपयांपेक्षा अधिक आहे, ज्या कुटूंबातील सदस्य आयकर दाता आहे, ज्या कुटूंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी म्हणुन सेवानिवृत्ती नंतर सेवानिवृत्ती वेतन घेतात, ज्यांच्या कुटूंबात चारचाकी वाहन आहे किंवा ज्या कुटूंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरत नाही. पात्र अर्जदार लाडक्या बहिणीला तसे हमीपत्र सुद्धा द्यावे लागते.असे निकष असताना अर्जदार लाडकी बहिण नम्रता हिने तिचे लग्नानंतरचे नावाने अर्ज केला आहे. सदर अर्जदार हिचे सासर कडील एकत्र कुटूंबाचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त आहे, सदर अर्जदार हिचे सासरे सेवानिवृत्ती वेतन घेतात, त्यांचे पती दिपक चांभारे पाटील नावाने एकुण ६ एकर शेतजमिन आहे. म्हणजेच निकषाप्रमाणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे. असे असतांना देखील व सदरची बाब पुर्णतः माहिती व जाणीवेतील असतांना देखील प्रस्तुत अर्जदार हिने खोटे हमीपत्र निष्पादीत केले व सदर हमीपत्र व त्यातील मजकुर खोटा आहे याची माहिती व जाणीव असतांना गैरहक्की आर्थिक लाभाचे दुषित हेतुने त्याचा वापर करून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा आर्थिक लाभ प्राप्त करून घेतला आहे.प्रस्तुत अर्जदार ही तिचे पतीपासून गेल्या पाच ते सहा वर्षापासुन विभक्त राहत आहे. त्यांचेदरम्यान अकोला येथील न्यायालयात खावटीकरीता न्यायालयीन प्रकरणे सुरू असून सदर अर्जदार हिस तिचे पतीपासून एकत्रीतरित्या दरमहा ५०,००० /- रूपये खावटी मंजुर झाल्याची देखील तक्रारीत नमूद आहे. सबब निकषास पात्र नसतांना देखील खोटी माहिती देवून व खरी माहिती लपवून सदर अर्जदार हिने योजनेचा लाभ मिळविला आहे. सदर अर्जदार हिचे माहेरचे नांव नम्रता गणेश धोत्रे आहे व सदर धोत्रे परिवारात चारचाकी वाहन आहे व त्या परिवाराचे उत्पन्न देखील अडीच लाखापेक्षा जास्त आहे. असे असतांना स्वतःचे वैवाहिकस्थितीबाबत खोटी माहिती प्रस्तुत अर्जदाराने दिली असून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला आहे.सदर महिती जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसिलदार, मलकापूर यांचेकडून अर्ज व त्यासोबतची कागदपत्र यांची माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागणी केली असता. अर्जदार नम्रता यांनी खोटे हमीपत्र तयार करून त्यात खोटी माहिती देऊन शासनाची फसवणुक केल्याबाबतची व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला असल्याचे दिसले. नम्रता यांचे सदरचे कृत्य दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा असून त्याबाबत त्यांच्या विरूध्द मलकापूर पो. स्टे. ला फिर्याद श्री. राजेंद्र काजळे यांनी दिली आहे.