श्री संत भोजने महाराज पुण्यतिथी महोत्सवाची उत्साहात सांगता माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी घेतले दर्शन व महाप्रसादाचा लाभ

श्री संत भोजने महाराज पुण्यतिथी महोत्सवाची उत्साहात सांगता  
  माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी घेतले दर्शन व महाप्रसादाचा  लाभ

 खामगाव ः 

लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या तालुक्यातील श्री क्षेत्र अटाळी येथील सदगुरु श्री संत भोजने महाराज संस्थान येथे दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी प.पु.भोजने महाराज पुण्यतिथी महोत्सव व अखंड हरिनाम सप्ताहाला गुरुवार दि.23 ऑक्टोंबर 2025 पासुन प्रारंभ झाला होता. या दरम्यान दररोज रात्री 8 ते 10 या वेळे दरम्यान महाराष्ट्रातील ख्यातनाम किर्तन कारांचे भव्य किर्तन सुध्दा पार पडले. या भव्य दिव्य पुण्यतिथी महोत्सवाची गुरुवार दि.30 ऑक्टोंबर 2025 भक्तीभावपुर्ण वातावरणामध्ये उत्साहात सांगता झाली.अखेरच्या दिवशी हजारो भाविक भक्त श्री क्षेत्र अटाळी येथे दाखल झाले होते.
खामगाव विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस नेते माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी श्री क्षेत्र अटाळी येथे भोजने महाराज संस्थानमध्ये जावुन संत भोजने महाराज यांच्या मुर्तीचे पुजन करुन व दर्शन घेतले. तद्नंतर संत भोजने महाराजांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेवुन अभिवादन केले. यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंजाबरावदादा देशमुख,तालुका अध्यक्ष मनोज वानखडे,खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुभाष पेसोडे, संचालक श्रीकृष्ण टिकार, माजी जि.प.सदस्य श्रीकृष्ण धोटे,सर्कल प्रमुख जयराम मुंडाले,अनंता धामोडे,श्रीकांत देशमुख,अटाळीचे माजी सरपंच डॉ.दिलीप काटोले, सरपंचपती हरीष काटोले,संजय भिसे,सोपान काटोले,भगवान सुलताने,संजय काटोले,ब्रिजलाल पवार,मुरलीधर डिक्कर,परसराम पांडे यांच्यासह अटाळी ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.याप्रसंगी श्री संत भोजने महाराज संस्थानतर्फे निवृत्ती महाले यांनी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांचा शेला,टोपी व सन्मानचिन्ह देवुन सत्कार केला. पुण्यतिथी महोत्सवाच्या समारोप प्रसंगी दि.30 ऑक्टोंबर 2025 रोजी सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत रामायणाचार्य,विदर्भरत्न हभप श्री संजय महाराज पाचपोर यांच्या काल्याचे किर्तन पार पडले. तद्नंतर नगर प्रदक्षिणा होवुन पुण्यतिथी महोत्सवानिमित्त हजारो भाविक भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. राणा दिलीपकुमार सानंदा यांच्यासह उपस्थित मान्यवरांनीही या महाप्रसादाचा लाभ घेतला. पंचक्रोशीतील विविध गावातुन आलेल्या सेवेकऱ्यांच्या चमुने शिस्तबध्द पध्दतीने हजारो भाविकांना पंगतीमध्ये महाप्रसादाचे वितरण करुन सेवा दिली.

Comments

Popular Posts

*नम्रता गणेशराव धोत्रे कौलखेड अकोला या लाडक्या बहिणी विरुद्ध मलकापूर पो. स्टे. ला महाराष्ट्रातून पहिली तक्रार दाखल. मलकापूर (दिव्यांग शक्ती प्रतिनिध)ी*नुकताच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहिर केली मात्र अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसत आहे.अर्जदार महीला नम्रता यांनी प्रथमतः दि. ३०-०८-२०२४ रोजी योजनेचा अर्ज केला व अंतिमतः दि. ०२-०९-२०२४ रोजी त्यांचा शासनाद्वारे अर्ज मंजुर करण्यात आला आहे व त्याप्रमाणे प्रस्तुत अर्जदार हिस दरमहा १५००/- रूपये प्रमाणे निधी तिचे खात्यात प्राप्त झाला आहे. खरे म्हणजे अर्जदार नम्रता हिने खोटे व बनावटी हमीपत्राचा दस्त तयार करून त्यात खोटी व बनावटी माहित दिली व तो खरा आहे असे भासवुना जाणीव पूर्वक सदर दस्त संबंधीत अधिकाऱ्यांकडे सादर केला.त्याद्वारे शासनाची फसवणुक करून स्वतःचा गैरहक्की आर्थिक लाभ प्राप्त केला आहे.याबाबत सविस्तर असे की सदर योजने करीता पात्रता निकष असे की,ज्या महिलेच्या एकत्रीत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० /- रूपयांपेक्षा अधिक आहे, ज्या कुटूंबातील सदस्य आयकर दाता आहे, ज्या कुटूंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी म्हणुन सेवानिवृत्ती नंतर सेवानिवृत्ती वेतन घेतात, ज्यांच्या कुटूंबात चारचाकी वाहन आहे किंवा ज्या कुटूंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरत नाही. पात्र अर्जदार लाडक्या बहिणीला तसे हमीपत्र सुद्धा द्यावे लागते.असे निकष असताना अर्जदार लाडकी बहिण नम्रता हिने तिचे लग्नानंतरचे नावाने अर्ज केला आहे. सदर अर्जदार हिचे सासर कडील एकत्र कुटूंबाचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त आहे, सदर अर्जदार हिचे सासरे सेवानिवृत्ती वेतन घेतात, त्यांचे पती दिपक चांभारे पाटील नावाने एकुण ६ एकर शेतजमिन आहे. म्हणजेच निकषाप्रमाणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे. असे असतांना देखील व सदरची बाब पुर्णतः माहिती व जाणीवेतील असतांना देखील प्रस्तुत अर्जदार हिने खोटे हमीपत्र निष्पादीत केले व सदर हमीपत्र व त्यातील मजकुर खोटा आहे याची माहिती व जाणीव असतांना गैरहक्की आर्थिक लाभाचे दुषित हेतुने त्याचा वापर करून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा आर्थिक लाभ प्राप्त करून घेतला आहे.प्रस्तुत अर्जदार ही तिचे पतीपासून गेल्या पाच ते सहा वर्षापासुन विभक्त राहत आहे. त्यांचेदरम्यान अकोला येथील न्यायालयात खावटीकरीता न्यायालयीन प्रकरणे सुरू असून सदर अर्जदार हिस तिचे पतीपासून एकत्रीतरित्या दरमहा ५०,००० /- रूपये खावटी मंजुर झाल्याची देखील तक्रारीत नमूद आहे. सबब निकषास पात्र नसतांना देखील खोटी माहिती देवून व खरी माहिती लपवून सदर अर्जदार हिने योजनेचा लाभ मिळविला आहे. सदर अर्जदार हिचे माहेरचे नांव नम्रता गणेश धोत्रे आहे व सदर धोत्रे परिवारात चारचाकी वाहन आहे व त्या परिवाराचे उत्पन्न देखील अडीच लाखापेक्षा जास्त आहे. असे असतांना स्वतःचे वैवाहिकस्थितीबाबत खोटी माहिती प्रस्तुत अर्जदाराने दिली असून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला आहे.सदर महिती जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसिलदार, मलकापूर यांचेकडून अर्ज व त्यासोबतची कागदपत्र यांची माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागणी केली असता. अर्जदार नम्रता यांनी खोटे हमीपत्र तयार करून त्यात खोटी माहिती देऊन शासनाची फसवणुक केल्याबाबतची व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला असल्याचे दिसले. नम्रता यांचे सदरचे कृत्य दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा असून त्याबाबत त्यांच्या विरूध्द मलकापूर पो. स्टे. ला फिर्याद श्री. राजेंद्र काजळे यांनी दिली आहे.