सामाजिक सेवाभाव जोपासणारे श्री ओम जगदंबा उत्सव मंडळ ..भव्य महाप्रसाद , आरोग्य शिबिर ,. क्रीडा सांस्कृतिक कार्यक्रम सुंदर आयोजन

सामाजिक सेवाभाव जोपासणारे श्री ओम जगदंबा उत्सव मंडळ ..
भव्य महाप्रसाद , आरोग्य शिबिर ,. क्रीडा सांस्कृतिक कार्यक्रम सुंदर आयोजन..
खामगाव .
श्री ओम जगदंबा उत्सव मंडळ अमृत नगर जलम रोड खामगाव या परिसरात मागील 25 वर्षापासून मोठी देवी शांती उत्सव मोठ्या हर्ष उल्हासाने साजरा केल्या जात असतो  त्यामध्ये मुख्य म्हणजे शहरातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या हस्ते रोज मातीची आरती होत असते आरती खूपच महत्त्व असल्याने शहरातील अगदी दूर दूर परिसरातून भाविक भक्तांची मोठी गर्दी असते तसेच नऊ दिवस सांस्कृतिक क्रीडा कार्यक्रम, भजन कीर्तन प्रवचन याचेआयोजन असते यावर्षी दरवर्षीप्रमाणे   भव्य रक्तदान शिबिर दि. 12-10 रोजी पार पडले यावेळी  कॅबिनेट कामगार मंत्री आकाश दादा फुंडकर हे प्रामुख्याने उपस्थित होते 
तसेच रोटरी क्लब खामगाव सिल्वर सिटी खामगाव व श्री ओम जगदंबा उत्सव मंडळ यांच्या संयुक्त उपक्रमाने भव्य आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले यामध्ये दहा वरून अधिक व्यक्तींचे मोतीया बिंदूचे ऑपरेशन फक्त चारशे रुपये करण्यात येणार आहे तसेच 13 ता.होम पूजन व भव्य महाप्रसाद वितरण करण्यात आले यावेळी भावी भक्तांची प्रचंड गर्दीत होती मंडळाचे सर्व सेवाभावी सांस्कृतिक महाप्रसाद वितरण कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मंडळाच्या सर्वच कार्यकर्त्यांची परिसरातील भावी भक्तांचे अमूल्य असे योगदान असते श्री ओम जगदंबा उत्सव मंडळ एक सामाजिक सेवाभाव जोपासणारे मंडळ असून मंडळाचे सर्व दूरपर्यंत नाव लौकिक आहे         

Comments

Popular Posts

*नम्रता गणेशराव धोत्रे कौलखेड अकोला या लाडक्या बहिणी विरुद्ध मलकापूर पो. स्टे. ला महाराष्ट्रातून पहिली तक्रार दाखल. मलकापूर (दिव्यांग शक्ती प्रतिनिध)ी*नुकताच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहिर केली मात्र अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसत आहे.अर्जदार महीला नम्रता यांनी प्रथमतः दि. ३०-०८-२०२४ रोजी योजनेचा अर्ज केला व अंतिमतः दि. ०२-०९-२०२४ रोजी त्यांचा शासनाद्वारे अर्ज मंजुर करण्यात आला आहे व त्याप्रमाणे प्रस्तुत अर्जदार हिस दरमहा १५००/- रूपये प्रमाणे निधी तिचे खात्यात प्राप्त झाला आहे. खरे म्हणजे अर्जदार नम्रता हिने खोटे व बनावटी हमीपत्राचा दस्त तयार करून त्यात खोटी व बनावटी माहित दिली व तो खरा आहे असे भासवुना जाणीव पूर्वक सदर दस्त संबंधीत अधिकाऱ्यांकडे सादर केला.त्याद्वारे शासनाची फसवणुक करून स्वतःचा गैरहक्की आर्थिक लाभ प्राप्त केला आहे.याबाबत सविस्तर असे की सदर योजने करीता पात्रता निकष असे की,ज्या महिलेच्या एकत्रीत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० /- रूपयांपेक्षा अधिक आहे, ज्या कुटूंबातील सदस्य आयकर दाता आहे, ज्या कुटूंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी म्हणुन सेवानिवृत्ती नंतर सेवानिवृत्ती वेतन घेतात, ज्यांच्या कुटूंबात चारचाकी वाहन आहे किंवा ज्या कुटूंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरत नाही. पात्र अर्जदार लाडक्या बहिणीला तसे हमीपत्र सुद्धा द्यावे लागते.असे निकष असताना अर्जदार लाडकी बहिण नम्रता हिने तिचे लग्नानंतरचे नावाने अर्ज केला आहे. सदर अर्जदार हिचे सासर कडील एकत्र कुटूंबाचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त आहे, सदर अर्जदार हिचे सासरे सेवानिवृत्ती वेतन घेतात, त्यांचे पती दिपक चांभारे पाटील नावाने एकुण ६ एकर शेतजमिन आहे. म्हणजेच निकषाप्रमाणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे. असे असतांना देखील व सदरची बाब पुर्णतः माहिती व जाणीवेतील असतांना देखील प्रस्तुत अर्जदार हिने खोटे हमीपत्र निष्पादीत केले व सदर हमीपत्र व त्यातील मजकुर खोटा आहे याची माहिती व जाणीव असतांना गैरहक्की आर्थिक लाभाचे दुषित हेतुने त्याचा वापर करून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा आर्थिक लाभ प्राप्त करून घेतला आहे.प्रस्तुत अर्जदार ही तिचे पतीपासून गेल्या पाच ते सहा वर्षापासुन विभक्त राहत आहे. त्यांचेदरम्यान अकोला येथील न्यायालयात खावटीकरीता न्यायालयीन प्रकरणे सुरू असून सदर अर्जदार हिस तिचे पतीपासून एकत्रीतरित्या दरमहा ५०,००० /- रूपये खावटी मंजुर झाल्याची देखील तक्रारीत नमूद आहे. सबब निकषास पात्र नसतांना देखील खोटी माहिती देवून व खरी माहिती लपवून सदर अर्जदार हिने योजनेचा लाभ मिळविला आहे. सदर अर्जदार हिचे माहेरचे नांव नम्रता गणेश धोत्रे आहे व सदर धोत्रे परिवारात चारचाकी वाहन आहे व त्या परिवाराचे उत्पन्न देखील अडीच लाखापेक्षा जास्त आहे. असे असतांना स्वतःचे वैवाहिकस्थितीबाबत खोटी माहिती प्रस्तुत अर्जदाराने दिली असून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला आहे.सदर महिती जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसिलदार, मलकापूर यांचेकडून अर्ज व त्यासोबतची कागदपत्र यांची माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागणी केली असता. अर्जदार नम्रता यांनी खोटे हमीपत्र तयार करून त्यात खोटी माहिती देऊन शासनाची फसवणुक केल्याबाबतची व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला असल्याचे दिसले. नम्रता यांचे सदरचे कृत्य दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा असून त्याबाबत त्यांच्या विरूध्द मलकापूर पो. स्टे. ला फिर्याद श्री. राजेंद्र काजळे यांनी दिली आहे.