जागृती क्रीडा मंडळ व दत्तगुरु गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीने जगदंबा विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या भाविकांना माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते महाप्रसादाचे वितरण घाटपुरी नाका परिसरात हजारो भाविक भक्तांनी घ्ोतला महाप्रसादाचा लाभ

जागृती क्रीडा मंडळ व दत्तगुरु गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीने जगदंबा विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या भाविकांना  माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते महाप्रसादाचे वितरण  घाटपुरी नाका परिसरात हजारो भाविक भक्तांनी घ्ोतला महाप्रसादाचा लाभ.
खामगाव (संतोष आटोळे)
 जागृती क्रीडा मंडळ व दत्तगुरु गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीने जगदंबा विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या भाविकांना  माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते महाप्रसादाचे वितरण
 घाटपुरी नाका परिसरात हजारो भाविक भक्तांनी घ्ोतला महाप्रसादाचा लाभ.
खामगांव ः-शांती उत्सव म्हणून ओळखल्या जाणारा मोठया देवीचा जगदंबा उत्सव खामगाव शहर व परिसरात मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. मागील दहा दिवसापासुन ठिक-ठिकाणी मंडळांकडुन जगदंबा देवीची  स्थापना करुन मोठया भक्तीभावात पुजा-अर्चा करण्यात आली. जगदंबा उत्सवाच्या शेवटच्या दिवशी गुरुवार दि.17 ऑक्टोंबर 2025 रोजी आई राध्ाा उदो-उदो च्या गजरात मोठया देवीची विसर्जन मिरवणुक काढुन देवीला  भावपूर्ण निरोप देण्यात आला. यावेळी हजारो भाविक भक्त विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते.
जलालपुरा भागातून दुपारी 12 वाजताच्या सुमारास मोठया देवीची पुजा-अर्चा करुन आरती करण्यात आल्यानंतर देवीची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. ही विसर्जन मिरवणूक पुरवार गल्ली, शिवाजी वेस भागातून घ्ााटपुरी नाका परिसरात पोहोचली असता याठिकाणी दरवर्ष्ाी प्रमाणे याहीवर्ष्ाी जागृती क्रीडा व व्यायाम प्रसारक मंडळ व दत्तगुरु गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीने जगदंबा विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या भाविक भक्तांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष राणा अशोकसिंह सानंदा,सौ.सवितादेवी सानंदा, केमिस्ट ॲन्ड ड्रगिस्टचे असो.चे सचिव अनिलभाऊ नावंदर,माजी नगराध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मनोज वानखडे,राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंजाबरावदादा देशमुख,माजी नगरसेवक ओमभाऊ शर्मा,विदर्भ हौशी कबडड्ी असो.चे अशोकबाप्पु देशमुख,सुरेंद्र पवार,सुनिल मानकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सर्वप्रथम घ्ााटपुरी नाका परिसरात मोठया देवीचे आगमन झाले असता जागृती क्रिडा मंडळाच्या वतीने फटाक्यांची भव्य आतिषबाजी करण्यात आली यावेळी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते मोठया देवीची आरती करण्यात आली.तद्नंतर जागृती क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित महाप्रसाद वाटपाचा माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. अतिशय नियोजनबध्द व शिस्तीमध्ये देवीच्या मिरवणुकी सहभागी झालेल्या हजारो भाविकांना पोळी-भाजी व मसाला भात चे वितरण करण्यात आले.
यावेळी जागृती क्रिडा मंडळाच्या वतीने माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा व उपस्थित सर्व मान्यवरांचा शाल व पुष्पहाराने सत्कार करण्यात आला. यावेळी बोलतांना माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी जागृती क्रिडा मंडळ व दत्तगुरु मंडळाच्या वतीने मागील अनेक वर्षापासुन जगदंबा विसर्जन मिरवणुकीमध्ये हजारो भाविकांना महाप्रसाद वितरणाचा विध्ाायक उपक्रम राबविला जात आहे. या महाप्रसादाच्या कार्यक्रमातुन मंडळाचे कार्यकर्ते हे लोकसहभाग आणि सहकार्याने महाप्रसादाचा उपक्रम राबवितात असे सांगुन त्यांनी मंडळाच्या पदाध्ािकाऱ्यांचे कौतुक केले व  हा उपक्रम इतर मंडळांसाठी सुध्दा अनुकरणीय उपक्रम आहे  असे त्यांनी सांगितले.
महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ओम भाऊ शर्मा ,सुनील मानकर ,सुरेंद्र पवार, दिलीप पातुरकर, दिनेश गोडाळे, अनिल चव्हाण, गोलू तायडे ,बंटी वानखडे, नाना चिकटे, संदीप भरडक राजेश हुरसाळ, रवि भोवरे,अजय जैन,प्रशांत खर्चे ,गोकुळ मोरखडे ,राहुल सापदरे, अंकुश हेड पाटील यांच्यासह जागृती क्रिडा मंडळ व दत्तगुरु मंडळाच्या पदाध्ािकारी,कार्यकर्ते व जोशी नगर भागातील नागरीकांनी परिश्रम घ्ोतले

Comments

Popular Posts

*नम्रता गणेशराव धोत्रे कौलखेड अकोला या लाडक्या बहिणी विरुद्ध मलकापूर पो. स्टे. ला महाराष्ट्रातून पहिली तक्रार दाखल. मलकापूर (दिव्यांग शक्ती प्रतिनिध)ी*नुकताच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहिर केली मात्र अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसत आहे.अर्जदार महीला नम्रता यांनी प्रथमतः दि. ३०-०८-२०२४ रोजी योजनेचा अर्ज केला व अंतिमतः दि. ०२-०९-२०२४ रोजी त्यांचा शासनाद्वारे अर्ज मंजुर करण्यात आला आहे व त्याप्रमाणे प्रस्तुत अर्जदार हिस दरमहा १५००/- रूपये प्रमाणे निधी तिचे खात्यात प्राप्त झाला आहे. खरे म्हणजे अर्जदार नम्रता हिने खोटे व बनावटी हमीपत्राचा दस्त तयार करून त्यात खोटी व बनावटी माहित दिली व तो खरा आहे असे भासवुना जाणीव पूर्वक सदर दस्त संबंधीत अधिकाऱ्यांकडे सादर केला.त्याद्वारे शासनाची फसवणुक करून स्वतःचा गैरहक्की आर्थिक लाभ प्राप्त केला आहे.याबाबत सविस्तर असे की सदर योजने करीता पात्रता निकष असे की,ज्या महिलेच्या एकत्रीत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० /- रूपयांपेक्षा अधिक आहे, ज्या कुटूंबातील सदस्य आयकर दाता आहे, ज्या कुटूंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी म्हणुन सेवानिवृत्ती नंतर सेवानिवृत्ती वेतन घेतात, ज्यांच्या कुटूंबात चारचाकी वाहन आहे किंवा ज्या कुटूंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरत नाही. पात्र अर्जदार लाडक्या बहिणीला तसे हमीपत्र सुद्धा द्यावे लागते.असे निकष असताना अर्जदार लाडकी बहिण नम्रता हिने तिचे लग्नानंतरचे नावाने अर्ज केला आहे. सदर अर्जदार हिचे सासर कडील एकत्र कुटूंबाचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त आहे, सदर अर्जदार हिचे सासरे सेवानिवृत्ती वेतन घेतात, त्यांचे पती दिपक चांभारे पाटील नावाने एकुण ६ एकर शेतजमिन आहे. म्हणजेच निकषाप्रमाणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे. असे असतांना देखील व सदरची बाब पुर्णतः माहिती व जाणीवेतील असतांना देखील प्रस्तुत अर्जदार हिने खोटे हमीपत्र निष्पादीत केले व सदर हमीपत्र व त्यातील मजकुर खोटा आहे याची माहिती व जाणीव असतांना गैरहक्की आर्थिक लाभाचे दुषित हेतुने त्याचा वापर करून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा आर्थिक लाभ प्राप्त करून घेतला आहे.प्रस्तुत अर्जदार ही तिचे पतीपासून गेल्या पाच ते सहा वर्षापासुन विभक्त राहत आहे. त्यांचेदरम्यान अकोला येथील न्यायालयात खावटीकरीता न्यायालयीन प्रकरणे सुरू असून सदर अर्जदार हिस तिचे पतीपासून एकत्रीतरित्या दरमहा ५०,००० /- रूपये खावटी मंजुर झाल्याची देखील तक्रारीत नमूद आहे. सबब निकषास पात्र नसतांना देखील खोटी माहिती देवून व खरी माहिती लपवून सदर अर्जदार हिने योजनेचा लाभ मिळविला आहे. सदर अर्जदार हिचे माहेरचे नांव नम्रता गणेश धोत्रे आहे व सदर धोत्रे परिवारात चारचाकी वाहन आहे व त्या परिवाराचे उत्पन्न देखील अडीच लाखापेक्षा जास्त आहे. असे असतांना स्वतःचे वैवाहिकस्थितीबाबत खोटी माहिती प्रस्तुत अर्जदाराने दिली असून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला आहे.सदर महिती जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसिलदार, मलकापूर यांचेकडून अर्ज व त्यासोबतची कागदपत्र यांची माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागणी केली असता. अर्जदार नम्रता यांनी खोटे हमीपत्र तयार करून त्यात खोटी माहिती देऊन शासनाची फसवणुक केल्याबाबतची व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला असल्याचे दिसले. नम्रता यांचे सदरचे कृत्य दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा असून त्याबाबत त्यांच्या विरूध्द मलकापूर पो. स्टे. ला फिर्याद श्री. राजेंद्र काजळे यांनी दिली आहे.