यश अखेर चिखली येथे दिव्यांग 👩🏼‍🦽बोर्ड सुरू करण्याची मिळाली मान्यता💥**तर बोर्डाचे विकेंद्रीकरण करत दिव्यांगांना न्याय देऊ* - डॉक्टर बिराजदार🩺💥

*💥💥दिव्यांग शक्तीच्या मागणीला यश अखेर चिखली येथे दिव्यांग 👩🏼‍🦽बोर्ड सुरू करण्याची मिळाली मान्यता💥*
*तर बोर्डाचे विकेंद्रीकरण करत दिव्यांगांना न्याय देऊ* - डॉक्टर बिराजदार🩺💥
चिखली {विशाल ईवरकर}:- 
चिखली तालुक्यातील अपंग बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिव्यांग शक्तीसाठी घेण्यात आला असून आता चिखली उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग बोर्डची सुविधा सुरु करण्यात आली आहे. यामुळे दिव्यांगत्व  प्रमाणपत्राकरिता जिल्हा स्तरावर म्हणजे जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे  गरज  नाही.
  शासकीय सुविधांसाठी आवश्यक असलेले दिव्यांग प्रमाणपत्र आता थेट चिखलीतच मिळणार आहे. या करिता आमदार सौ. श्वेता महाले मा.आमदार विजयराज शिंदे यांचे सह दिव्यांग सेवा संस्था असलेल्या विराट मल्टीपर्पज फाउंडेशन व साप्ताहिक दिव्यांग शक्तीच्या माध्यमातून पाठपुरावा करीत  जिल्हा शल्यचिकित्सकांना लेखी पत्र देऊन ही मागणी केली होती.
नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीची जाणीव ठेवून  अखेर या निर्णयाला मंजुरी मिळाली आहे. स्थानिक अपंग बांधवांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले असून दिव्यांग कल्याण आयुक्त विभाग पुणे व जिल्हा शल्य चिकित्सक बुलढाणा यांनी   दाखवलेल्या सकारात्मक पुढाकारामुळेच आज ही सुविधा चिखलीत उपलब्ध झाली," अशा भावना व्यक्त होत आहेत.  दिव्यांग बोर्ड सह इतर आरोग्यदायी सुविधा प्राप्त झाल्यामुळे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सैय्यद उमर,
वैद्यकीय अधिकारी डॉ. रामानंद इंगळे, यांच्या मार्गदर्शनाखाली 
 आरोग्य  कर्मचारी व निष्णाद वैद्यकीय चिकित्सक लवकरच या बोर्डावर कार्यरत होतील चिखली उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध झालेली ही नवी सुविधा दिव्यांग बांधवांच्या 
सुविधेसाठी  मानसिक, शारीरिक व आर्थिक लाभ यातून मिळणार आहे 
तर या तपासणी बोर्डामध्ये अस्थिरोग नेत्र मानसिक कर्णबधिर मूकबधिर आदींची तपासणी होणार आहे सतत आपल्या लेखणीतून पाठपुरावा करीत दिव्यांग शक्तीच्या माध्यमातून हे बोर्ड उपलब्ध झाल्यामुळे अनेक दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले आहे
तर यावर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर बिराजदार यांना अभिनंदन करीत घाटावरील बोर्डाचं विकेंद्रीकरण केल्यामुळे सर्वात जास्त असलेल्या बोगस अपंगांच्या तक्रारी यांचं निरसन होण्यास फार मोठी मदत होईल व वास्तविक दिव्यांगाना न्याय मिळेल असे दिव्यांग शक्ती संपादक मनोज नगरनाईक यांनी त्यांचे अभिनंदन केले

Comments

Popular Posts

*नम्रता गणेशराव धोत्रे कौलखेड अकोला या लाडक्या बहिणी विरुद्ध मलकापूर पो. स्टे. ला महाराष्ट्रातून पहिली तक्रार दाखल. मलकापूर (दिव्यांग शक्ती प्रतिनिध)ी*नुकताच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहिर केली मात्र अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसत आहे.अर्जदार महीला नम्रता यांनी प्रथमतः दि. ३०-०८-२०२४ रोजी योजनेचा अर्ज केला व अंतिमतः दि. ०२-०९-२०२४ रोजी त्यांचा शासनाद्वारे अर्ज मंजुर करण्यात आला आहे व त्याप्रमाणे प्रस्तुत अर्जदार हिस दरमहा १५००/- रूपये प्रमाणे निधी तिचे खात्यात प्राप्त झाला आहे. खरे म्हणजे अर्जदार नम्रता हिने खोटे व बनावटी हमीपत्राचा दस्त तयार करून त्यात खोटी व बनावटी माहित दिली व तो खरा आहे असे भासवुना जाणीव पूर्वक सदर दस्त संबंधीत अधिकाऱ्यांकडे सादर केला.त्याद्वारे शासनाची फसवणुक करून स्वतःचा गैरहक्की आर्थिक लाभ प्राप्त केला आहे.याबाबत सविस्तर असे की सदर योजने करीता पात्रता निकष असे की,ज्या महिलेच्या एकत्रीत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० /- रूपयांपेक्षा अधिक आहे, ज्या कुटूंबातील सदस्य आयकर दाता आहे, ज्या कुटूंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी म्हणुन सेवानिवृत्ती नंतर सेवानिवृत्ती वेतन घेतात, ज्यांच्या कुटूंबात चारचाकी वाहन आहे किंवा ज्या कुटूंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरत नाही. पात्र अर्जदार लाडक्या बहिणीला तसे हमीपत्र सुद्धा द्यावे लागते.असे निकष असताना अर्जदार लाडकी बहिण नम्रता हिने तिचे लग्नानंतरचे नावाने अर्ज केला आहे. सदर अर्जदार हिचे सासर कडील एकत्र कुटूंबाचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त आहे, सदर अर्जदार हिचे सासरे सेवानिवृत्ती वेतन घेतात, त्यांचे पती दिपक चांभारे पाटील नावाने एकुण ६ एकर शेतजमिन आहे. म्हणजेच निकषाप्रमाणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे. असे असतांना देखील व सदरची बाब पुर्णतः माहिती व जाणीवेतील असतांना देखील प्रस्तुत अर्जदार हिने खोटे हमीपत्र निष्पादीत केले व सदर हमीपत्र व त्यातील मजकुर खोटा आहे याची माहिती व जाणीव असतांना गैरहक्की आर्थिक लाभाचे दुषित हेतुने त्याचा वापर करून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा आर्थिक लाभ प्राप्त करून घेतला आहे.प्रस्तुत अर्जदार ही तिचे पतीपासून गेल्या पाच ते सहा वर्षापासुन विभक्त राहत आहे. त्यांचेदरम्यान अकोला येथील न्यायालयात खावटीकरीता न्यायालयीन प्रकरणे सुरू असून सदर अर्जदार हिस तिचे पतीपासून एकत्रीतरित्या दरमहा ५०,००० /- रूपये खावटी मंजुर झाल्याची देखील तक्रारीत नमूद आहे. सबब निकषास पात्र नसतांना देखील खोटी माहिती देवून व खरी माहिती लपवून सदर अर्जदार हिने योजनेचा लाभ मिळविला आहे. सदर अर्जदार हिचे माहेरचे नांव नम्रता गणेश धोत्रे आहे व सदर धोत्रे परिवारात चारचाकी वाहन आहे व त्या परिवाराचे उत्पन्न देखील अडीच लाखापेक्षा जास्त आहे. असे असतांना स्वतःचे वैवाहिकस्थितीबाबत खोटी माहिती प्रस्तुत अर्जदाराने दिली असून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला आहे.सदर महिती जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसिलदार, मलकापूर यांचेकडून अर्ज व त्यासोबतची कागदपत्र यांची माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागणी केली असता. अर्जदार नम्रता यांनी खोटे हमीपत्र तयार करून त्यात खोटी माहिती देऊन शासनाची फसवणुक केल्याबाबतची व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला असल्याचे दिसले. नम्रता यांचे सदरचे कृत्य दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा असून त्याबाबत त्यांच्या विरूध्द मलकापूर पो. स्टे. ला फिर्याद श्री. राजेंद्र काजळे यांनी दिली आहे.