*पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा**अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे एसडीओंच्या मार्फत गृहमंत्र्यांना निवेदन*

*पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा*
*अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे एसडीओंच्या मार्फत गृहमंत्र्यांना निवेदन*
खामगाव, (संतोष आटोळे)- नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे वृत्तांकनासाठी गेलेल्या चार पत्रकारांना ए.एस. मल्टी सर्व्हिसेसच्या मालक आणि कर्मचाऱ्यांकडून टोल पॉईंटवर पत्रकारांशी हुज्जतबाजी करून त्यांना अमानुषपणे बेदम मारहाण करण्यात आली आहे. पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या या गुंट प्रवृत्तीच्या लोकांवर पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करावी. अशा आशयाचे निवेदन अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने 23 सप्टेंबर रोजी येथील एसडीओंच्या मार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेला मान्यता आहे. पत्रकार समाजाचे प्रश्न जनतेपर्यंत पोहोचवतात, त्यांच्यावरील हल्ले हे थेट लोकशाहीवरील हल्ले आहेत. नाशिक मधील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी तीन ते चार पत्रकारांना प्रवेश टोल पॉईंटवर अमानुष मारहाण करण्यात आली. पत्रकारांना मारहाणीचे व्हिडिओ फुटेज सोशल मीडियावर सुद्धा अनेकांनी पाहिले आहेत. सदर प्रकरणात नाशिक पोलिसांकडून आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु टोल वसुली करणाऱ्या ए. एस. मल्टी सर्विसेसच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे. सदर कंपनीला ब्लॅक लिस्टमध्ये टाकून सदर कंपनीला राज्यभरात कुठेही कुठलाही ठेका दिला जाऊ नये, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.  पत्रकार संरक्षण कायद्याची काटेकोरपणे आणि गंभीरपणे अंमलबजावणी करावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनावर सुरज यादव, राजू घाटे, अविनाश घोडके, रुपेश कलंत्री, गणेश भेरडे, शेख सलीम शेख फरीद, सुरज बोराखडे, मनोज जाधव, सिद्धार्थ निर्मळ, नामदेव टाले आदीसह खामगाव शहर व तालुक्यातील पत्रकारांच्या स्वासऱ्या आहेत.

Comments

Popular Posts

*नम्रता गणेशराव धोत्रे कौलखेड अकोला या लाडक्या बहिणी विरुद्ध मलकापूर पो. स्टे. ला महाराष्ट्रातून पहिली तक्रार दाखल. मलकापूर (दिव्यांग शक्ती प्रतिनिध)ी*नुकताच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहिर केली मात्र अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसत आहे.अर्जदार महीला नम्रता यांनी प्रथमतः दि. ३०-०८-२०२४ रोजी योजनेचा अर्ज केला व अंतिमतः दि. ०२-०९-२०२४ रोजी त्यांचा शासनाद्वारे अर्ज मंजुर करण्यात आला आहे व त्याप्रमाणे प्रस्तुत अर्जदार हिस दरमहा १५००/- रूपये प्रमाणे निधी तिचे खात्यात प्राप्त झाला आहे. खरे म्हणजे अर्जदार नम्रता हिने खोटे व बनावटी हमीपत्राचा दस्त तयार करून त्यात खोटी व बनावटी माहित दिली व तो खरा आहे असे भासवुना जाणीव पूर्वक सदर दस्त संबंधीत अधिकाऱ्यांकडे सादर केला.त्याद्वारे शासनाची फसवणुक करून स्वतःचा गैरहक्की आर्थिक लाभ प्राप्त केला आहे.याबाबत सविस्तर असे की सदर योजने करीता पात्रता निकष असे की,ज्या महिलेच्या एकत्रीत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० /- रूपयांपेक्षा अधिक आहे, ज्या कुटूंबातील सदस्य आयकर दाता आहे, ज्या कुटूंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी म्हणुन सेवानिवृत्ती नंतर सेवानिवृत्ती वेतन घेतात, ज्यांच्या कुटूंबात चारचाकी वाहन आहे किंवा ज्या कुटूंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरत नाही. पात्र अर्जदार लाडक्या बहिणीला तसे हमीपत्र सुद्धा द्यावे लागते.असे निकष असताना अर्जदार लाडकी बहिण नम्रता हिने तिचे लग्नानंतरचे नावाने अर्ज केला आहे. सदर अर्जदार हिचे सासर कडील एकत्र कुटूंबाचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त आहे, सदर अर्जदार हिचे सासरे सेवानिवृत्ती वेतन घेतात, त्यांचे पती दिपक चांभारे पाटील नावाने एकुण ६ एकर शेतजमिन आहे. म्हणजेच निकषाप्रमाणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे. असे असतांना देखील व सदरची बाब पुर्णतः माहिती व जाणीवेतील असतांना देखील प्रस्तुत अर्जदार हिने खोटे हमीपत्र निष्पादीत केले व सदर हमीपत्र व त्यातील मजकुर खोटा आहे याची माहिती व जाणीव असतांना गैरहक्की आर्थिक लाभाचे दुषित हेतुने त्याचा वापर करून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा आर्थिक लाभ प्राप्त करून घेतला आहे.प्रस्तुत अर्जदार ही तिचे पतीपासून गेल्या पाच ते सहा वर्षापासुन विभक्त राहत आहे. त्यांचेदरम्यान अकोला येथील न्यायालयात खावटीकरीता न्यायालयीन प्रकरणे सुरू असून सदर अर्जदार हिस तिचे पतीपासून एकत्रीतरित्या दरमहा ५०,००० /- रूपये खावटी मंजुर झाल्याची देखील तक्रारीत नमूद आहे. सबब निकषास पात्र नसतांना देखील खोटी माहिती देवून व खरी माहिती लपवून सदर अर्जदार हिने योजनेचा लाभ मिळविला आहे. सदर अर्जदार हिचे माहेरचे नांव नम्रता गणेश धोत्रे आहे व सदर धोत्रे परिवारात चारचाकी वाहन आहे व त्या परिवाराचे उत्पन्न देखील अडीच लाखापेक्षा जास्त आहे. असे असतांना स्वतःचे वैवाहिकस्थितीबाबत खोटी माहिती प्रस्तुत अर्जदाराने दिली असून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला आहे.सदर महिती जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसिलदार, मलकापूर यांचेकडून अर्ज व त्यासोबतची कागदपत्र यांची माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागणी केली असता. अर्जदार नम्रता यांनी खोटे हमीपत्र तयार करून त्यात खोटी माहिती देऊन शासनाची फसवणुक केल्याबाबतची व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला असल्याचे दिसले. नम्रता यांचे सदरचे कृत्य दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा असून त्याबाबत त्यांच्या विरूध्द मलकापूर पो. स्टे. ला फिर्याद श्री. राजेंद्र काजळे यांनी दिली आहे.