*आपत्तीत आर्थिक मदतीचा वसा घेतलेले माररगाव चे श्रीगुरुदेव आपत्ती व्यवस्थापन मंडळ*

*आपत्तीत आर्थिक मदतीचा वसा घेतलेले माररगाव चे श्रीगुरुदेव आपत्ती व्यवस्थापन मंडळ* 
  
                                     *खामगाव( संतोष आटोळे)*
 समाजातील अपंग, निराधार, गरीब व गरजू लोकांना गरजेच्या वेळी आर्थिक मदत देण्याचे काम गत 5 वर्षापासून श्रीगुरुदेव आपत्ती व्यवस्थापन मंडळ माटरगाव बु तर्फे करण्यात येत आहे. गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वितरण, वव्यसनमुक्ती मध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या आणि व्यसनातून मुक्त झालेल्या व्यक्तींचा सत्कार व  विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर बक्षीस देण्याचे कार्य या मंडळातर्फे करण्यात येत आहे.मंडळाचे सदस्य हे कार्य करण्यासाठी कोणाच्याही समोर आर्थिक मदत स्वतःहून मागत  नाही.व्यवस्थापन मंडळातील सदस्य हे आपल्या कमाईतून दरमहा आर्थिक रक्कम आपल्या इच्छेप्रमाणे देत आहे. दर महिन्याला जमा होणाऱ्या रकमेतून हे कार्य करण्यात येत आहे.
                                       राष्ट्रसंत अध्यात्म केंद्र गुरुकुंज मोझरी येथील आचार्य वेरुळकर गुरुजी प्रेरणेने अनंतराव आळशी, राजेश भुतडा, रामभाऊ दळवी , जुगलकिशोर गांधी ,राम देशमुख व सहकाऱ्यांच्या संकल्पनेतून 20 ऑक्टोबर 2020 रोजी या मंडळाचा स्थापनेचा मुहूर्तमेढ श्रीगुरुदेव प्रार्थना मंदिर माटरगाव येथे रोवण्यात आली.यापूर्वी सुद्धा या मंडळातील लोक आपापल्या परीने वैयक्तिक मदत करत होते. खऱ्या अर्थाने संघटित रित्या हे काम 2020 पासून चालू झाले
                            
   जमा झालेली रक्कम बँकेत भरण्यात येते दर 3 महिन्यानंतर आपत्ती व्यवस्थापन मंडळाच्या सभेत जमाखर्चाचा हिशोब सादर करण्यात येतो.जमा झालेल्या रकमेतून गावातील आजारी व एखाद्या आजाराने ग्रासलेल्या रुग्णांबरोबरच अनाथ, अपंग, निराधार आणि ज्याची आर्थिक परिस्थिती चांगली नाही त्यांना त्यांच्या गरजेच्या नुसाकोणत्याही प्रकारचा जातीभेद न करता आर्थिक मदत देण्यात येत आहे.आतापर्यंत या आपत्ती व्यवस्थापन मंडळ तर्फे अनेक लोकांना आर्थिक मदतीचा हात दिला आहे.संकटकाळी कोणीतरी आपल्या पाठीशी उभे आहे याचा प्रत्यय या माध्यमातून त्यांना मिळत आहे.
    *शैक्षणिक किटचे वितरण* 
गत ४ वर्षापासून इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना दरवर्षी शैक्षणिक किटचे वितरण करण्यात येत आहे.दरवर्षी 15 ऑगस्ट व 26 जानेवारी रोजी शाळांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते त्या स्पर्धातील विजेत्या विद्यार्थ्यांना या मंडळातर्फे रोख बक्षिसे देण्यात येतात.व्यसनमुक्त झालेल्या व्यक्तींचा शाल श्रीफळ टोपी संस्कारप्रदीप व आरो पाण्याची कॅन भेट रूपाने प्रोत्साहन पर देण्यात येते.
निराधार व अपंग व्यक्तींना ब्लॅंकेट व स्वेटर चे वितरण करण्यात आले आहे. कोरोना काळात  आर्थिक परिस्थिती खालावलेल्या परिवारातील लोकांना किराणा सामान देण्यात आले.
*व्यसनमुक्त गाव करणारे मनीष गांधी यांचा सत्कार* 
 संग्रामपूर तालुक्यातील वानखेडे या गावातील शेकडो लोकांना व्यसनमुक्त करणारे मनीष गांधी यांचा 14 सप्टेंबर 25 रोजी श्रीगुरुदेव आपत्ती व्यवस्थापन मंडळाच्या वतीने शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.या वेडी आपत्ती व्यवस्थापन मंडळ, ग्रामत्थ उपस्थित होते                            *श्री गुरुदेव आपत्ती व्यवस्थापन मंडळाचे संचालक  असे*                                   श्री गुरूदेव आपत्ती व्यवस्थापन मंडाळा  मध्ये  अनंतराव आळशी, रामभाऊ दळवी , विश्वनाथ गायकी,  डॉ प्रमोद शुक्ला, राजेश भुतडा, गोपाळराव मिरगे,जुगलकिशोर गांधी,गजानन निखाडे, अशोक मोरे,प्रदीप मुंडे, अमोल सांगळे ठाणेदार, गोपाल राठी, देविदास जवरे,सुभाष निखाडे,श्रीकृष्ण कुलकर्णी,राम देशमुख यांचा समावेश आहे.

Comments

Popular Posts

*नम्रता गणेशराव धोत्रे कौलखेड अकोला या लाडक्या बहिणी विरुद्ध मलकापूर पो. स्टे. ला महाराष्ट्रातून पहिली तक्रार दाखल. मलकापूर (दिव्यांग शक्ती प्रतिनिध)ी*नुकताच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहिर केली मात्र अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसत आहे.अर्जदार महीला नम्रता यांनी प्रथमतः दि. ३०-०८-२०२४ रोजी योजनेचा अर्ज केला व अंतिमतः दि. ०२-०९-२०२४ रोजी त्यांचा शासनाद्वारे अर्ज मंजुर करण्यात आला आहे व त्याप्रमाणे प्रस्तुत अर्जदार हिस दरमहा १५००/- रूपये प्रमाणे निधी तिचे खात्यात प्राप्त झाला आहे. खरे म्हणजे अर्जदार नम्रता हिने खोटे व बनावटी हमीपत्राचा दस्त तयार करून त्यात खोटी व बनावटी माहित दिली व तो खरा आहे असे भासवुना जाणीव पूर्वक सदर दस्त संबंधीत अधिकाऱ्यांकडे सादर केला.त्याद्वारे शासनाची फसवणुक करून स्वतःचा गैरहक्की आर्थिक लाभ प्राप्त केला आहे.याबाबत सविस्तर असे की सदर योजने करीता पात्रता निकष असे की,ज्या महिलेच्या एकत्रीत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० /- रूपयांपेक्षा अधिक आहे, ज्या कुटूंबातील सदस्य आयकर दाता आहे, ज्या कुटूंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी म्हणुन सेवानिवृत्ती नंतर सेवानिवृत्ती वेतन घेतात, ज्यांच्या कुटूंबात चारचाकी वाहन आहे किंवा ज्या कुटूंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरत नाही. पात्र अर्जदार लाडक्या बहिणीला तसे हमीपत्र सुद्धा द्यावे लागते.असे निकष असताना अर्जदार लाडकी बहिण नम्रता हिने तिचे लग्नानंतरचे नावाने अर्ज केला आहे. सदर अर्जदार हिचे सासर कडील एकत्र कुटूंबाचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त आहे, सदर अर्जदार हिचे सासरे सेवानिवृत्ती वेतन घेतात, त्यांचे पती दिपक चांभारे पाटील नावाने एकुण ६ एकर शेतजमिन आहे. म्हणजेच निकषाप्रमाणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे. असे असतांना देखील व सदरची बाब पुर्णतः माहिती व जाणीवेतील असतांना देखील प्रस्तुत अर्जदार हिने खोटे हमीपत्र निष्पादीत केले व सदर हमीपत्र व त्यातील मजकुर खोटा आहे याची माहिती व जाणीव असतांना गैरहक्की आर्थिक लाभाचे दुषित हेतुने त्याचा वापर करून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा आर्थिक लाभ प्राप्त करून घेतला आहे.प्रस्तुत अर्जदार ही तिचे पतीपासून गेल्या पाच ते सहा वर्षापासुन विभक्त राहत आहे. त्यांचेदरम्यान अकोला येथील न्यायालयात खावटीकरीता न्यायालयीन प्रकरणे सुरू असून सदर अर्जदार हिस तिचे पतीपासून एकत्रीतरित्या दरमहा ५०,००० /- रूपये खावटी मंजुर झाल्याची देखील तक्रारीत नमूद आहे. सबब निकषास पात्र नसतांना देखील खोटी माहिती देवून व खरी माहिती लपवून सदर अर्जदार हिने योजनेचा लाभ मिळविला आहे. सदर अर्जदार हिचे माहेरचे नांव नम्रता गणेश धोत्रे आहे व सदर धोत्रे परिवारात चारचाकी वाहन आहे व त्या परिवाराचे उत्पन्न देखील अडीच लाखापेक्षा जास्त आहे. असे असतांना स्वतःचे वैवाहिकस्थितीबाबत खोटी माहिती प्रस्तुत अर्जदाराने दिली असून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला आहे.सदर महिती जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसिलदार, मलकापूर यांचेकडून अर्ज व त्यासोबतची कागदपत्र यांची माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागणी केली असता. अर्जदार नम्रता यांनी खोटे हमीपत्र तयार करून त्यात खोटी माहिती देऊन शासनाची फसवणुक केल्याबाबतची व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला असल्याचे दिसले. नम्रता यांचे सदरचे कृत्य दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा असून त्याबाबत त्यांच्या विरूध्द मलकापूर पो. स्टे. ला फिर्याद श्री. राजेंद्र काजळे यांनी दिली आहे.