ग्रामसेवक संघटनेचा अध्यादेश शासना पेक्षा मोठा नाही. ग्रामसेवक संघटनेच्या अध्यादेशाला त्वरित पाय बंद घालावा.*कामगारांना प्रमाणपत्र न दिल्यास ग्रामसेवकांच्या तोंडाला काळेफासू..* ॲड.सतीशचंद्र रोठे जिल्हा परिषद सीईओ गुलाबराव खरात यांच्या कारवाईकडे लक्ष.




ग्रामसेवक संघटनेचा अध्यादेश शासना पेक्षा मोठा नाही. 

ग्रामसेवक संघटनेच्या अध्यादेशाला त्वरित पाय बंद घालावा.

*कामगारांना प्रमाणपत्र न दिल्यास  ग्रामसेवकांच्या तोंडाला काळेफासू..* 
       ॲड.सतीशचंद्र रोठे 

जिल्हा परिषद सीईओ गुलाबराव खरात यांच्या कारवाईकडे लक्ष..

बुलढाणा :
शासन नियमानुसार संपूर्ण जिल्ह्यात ग्रामसेवकाकडून कामगारांना नव्वद दिवसाच्या कामाचे प्रमाणपत्र देणे बंधनकारक असताना ग्रामसेवक संघटनेकडून प्रमाणपत्र न देण्याचा काढलेला अघोषित अध्यादेश संघटनेचे पत्र शासन अध्यादेशाच्या नियमांची पायमल्ली करणारे आहे. तर काही ग्रामसेवकांनी कार्यालया बाहेर कामगारांनी बांधकाम प्रमाणपत्र मिळण्यासाठी भेटू नये. असे बोर्ड लावले. त्यावर आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आक्षेप घेत जिल्हा परिषद सीईओ गुलाबराव खरात यांची भेट घेत संबंधित सर्वांवर नियमानुसार कारवाई  करावी.

या अनुषंगाने आज 30 सप्टेंबरला सायंकाळी आझाद हिंदच्या पदाधिकाऱ्यांनी  पुन्हा संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेत त्वरित परिपत्रक काढत संबंधित  ग्रामसेवकांवर  कारवाई करण्याचे अध्यादेश पारित करण्या करिता स्मरण देण्यासाठी बैठक घेण्यात आली. 48 तासात कारवाई करावी अन्यथा आझाद हिंद च्या वतीने ग्रामसेवकांच्या तोंडाला काळे फासण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. 
____
शासन प्रशासनाच्या अध्यादेशांची बुलढाणा जिल्ह्यात पायमल्ली..

शासन परिपत्रक क्र. व्हीपीएम 2015 /प्र.क्र. 237/ 3 ,ग्रामविकास विभाग 22/09/2017, 16/09/2015 या प्रमुख दोन अध्यादेशासह उद्योग ऊर्जा व कामगार विभाग यांचे दिनांक 13/08/ 2014 रोजी ची अधिसूचना,13/08/2017 अधिसूचना, कामगार मंत्री यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीचे इतिवृत्त दिनांक 8/04/2025 , महाराष्ट्र शासन उद्योग,ऊर्जा ,कामगार व खणीकर्म विभाग मुंबई यांचे पत्र क्रमांक 0325/प्र.क्र. कामगार- 7, दि.14/05/2025, महाराष्ट्र बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन वर्कर्स (Reg.of Emp and C.S. Rules 2007Chater vi 33 (C))  यासह इतरही शासन प्रशासन अध्यादेशांची पायमल्ली महाराष्ट्रातील एकमेव बुलढाणा जिल्ह्यात राजे रोसपणे होत आहे. 
____
दलाला मार्फतच मिळते प्रमाणपत्र..
कामगारांची आर्थिक लूट. 

ग्रामसेवकांच्या अडेल तट्टू धोरणामुळे बुलढाणा जिल्ह्यातील गरजवंत कामगारांच्या मुला मुलींचे शिक्षण,लग्न थांबले आहे. तर बहुतांश कामगारांच्या परिवारातील सदस्यांचे आरोग्य सुविधा सुद्धा थांबले आहेत.ज्या ग्रामसेवकांनी यापूर्वी कामगारांना ९० दिवसाचे प्रमाणपत्र दिले. त्यांना सदर प्रमाणपत्र पून्हा नोंदणी करण्यासाठी  हेतू पुरस्कार टाळाटाळ करण्यात येत आहे. तर बहुतांश ठिकाणी दलाल मार्फत आलेले प्रमाणपत्र नोंदणीकृत होऊन कामगार कार्यालयातून नोंदणीकृत झाल्याचीही गंभीर बाब या निमित्ताने समोर येत आहे.
सदर गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष द्यावे. या अनुषंगाने त्वरीत आदेश परिपत्रक काढावे. अन्यथा आझाद हिंद च्या वतीने आंदोलनात्मक पवित्रा घेत अशा भ्रष्ट ग्रामसेवकांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा यावेळी आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड सतीशचंद्र रोठे पाटील यांनी बैठकीदरम्यान प्रशासनाला दिला आहे.

Comments

Popular Posts

*नम्रता गणेशराव धोत्रे कौलखेड अकोला या लाडक्या बहिणी विरुद्ध मलकापूर पो. स्टे. ला महाराष्ट्रातून पहिली तक्रार दाखल. मलकापूर (दिव्यांग शक्ती प्रतिनिध)ी*नुकताच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहिर केली मात्र अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसत आहे.अर्जदार महीला नम्रता यांनी प्रथमतः दि. ३०-०८-२०२४ रोजी योजनेचा अर्ज केला व अंतिमतः दि. ०२-०९-२०२४ रोजी त्यांचा शासनाद्वारे अर्ज मंजुर करण्यात आला आहे व त्याप्रमाणे प्रस्तुत अर्जदार हिस दरमहा १५००/- रूपये प्रमाणे निधी तिचे खात्यात प्राप्त झाला आहे. खरे म्हणजे अर्जदार नम्रता हिने खोटे व बनावटी हमीपत्राचा दस्त तयार करून त्यात खोटी व बनावटी माहित दिली व तो खरा आहे असे भासवुना जाणीव पूर्वक सदर दस्त संबंधीत अधिकाऱ्यांकडे सादर केला.त्याद्वारे शासनाची फसवणुक करून स्वतःचा गैरहक्की आर्थिक लाभ प्राप्त केला आहे.याबाबत सविस्तर असे की सदर योजने करीता पात्रता निकष असे की,ज्या महिलेच्या एकत्रीत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० /- रूपयांपेक्षा अधिक आहे, ज्या कुटूंबातील सदस्य आयकर दाता आहे, ज्या कुटूंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी म्हणुन सेवानिवृत्ती नंतर सेवानिवृत्ती वेतन घेतात, ज्यांच्या कुटूंबात चारचाकी वाहन आहे किंवा ज्या कुटूंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरत नाही. पात्र अर्जदार लाडक्या बहिणीला तसे हमीपत्र सुद्धा द्यावे लागते.असे निकष असताना अर्जदार लाडकी बहिण नम्रता हिने तिचे लग्नानंतरचे नावाने अर्ज केला आहे. सदर अर्जदार हिचे सासर कडील एकत्र कुटूंबाचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त आहे, सदर अर्जदार हिचे सासरे सेवानिवृत्ती वेतन घेतात, त्यांचे पती दिपक चांभारे पाटील नावाने एकुण ६ एकर शेतजमिन आहे. म्हणजेच निकषाप्रमाणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे. असे असतांना देखील व सदरची बाब पुर्णतः माहिती व जाणीवेतील असतांना देखील प्रस्तुत अर्जदार हिने खोटे हमीपत्र निष्पादीत केले व सदर हमीपत्र व त्यातील मजकुर खोटा आहे याची माहिती व जाणीव असतांना गैरहक्की आर्थिक लाभाचे दुषित हेतुने त्याचा वापर करून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा आर्थिक लाभ प्राप्त करून घेतला आहे.प्रस्तुत अर्जदार ही तिचे पतीपासून गेल्या पाच ते सहा वर्षापासुन विभक्त राहत आहे. त्यांचेदरम्यान अकोला येथील न्यायालयात खावटीकरीता न्यायालयीन प्रकरणे सुरू असून सदर अर्जदार हिस तिचे पतीपासून एकत्रीतरित्या दरमहा ५०,००० /- रूपये खावटी मंजुर झाल्याची देखील तक्रारीत नमूद आहे. सबब निकषास पात्र नसतांना देखील खोटी माहिती देवून व खरी माहिती लपवून सदर अर्जदार हिने योजनेचा लाभ मिळविला आहे. सदर अर्जदार हिचे माहेरचे नांव नम्रता गणेश धोत्रे आहे व सदर धोत्रे परिवारात चारचाकी वाहन आहे व त्या परिवाराचे उत्पन्न देखील अडीच लाखापेक्षा जास्त आहे. असे असतांना स्वतःचे वैवाहिकस्थितीबाबत खोटी माहिती प्रस्तुत अर्जदाराने दिली असून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला आहे.सदर महिती जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसिलदार, मलकापूर यांचेकडून अर्ज व त्यासोबतची कागदपत्र यांची माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागणी केली असता. अर्जदार नम्रता यांनी खोटे हमीपत्र तयार करून त्यात खोटी माहिती देऊन शासनाची फसवणुक केल्याबाबतची व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला असल्याचे दिसले. नम्रता यांचे सदरचे कृत्य दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा असून त्याबाबत त्यांच्या विरूध्द मलकापूर पो. स्टे. ला फिर्याद श्री. राजेंद्र काजळे यांनी दिली आहे.