*राज्य सैनिक फेडरेशनच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदावर रामराव देशमुख*

*राज्य सैनिक फेडरेशनच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदावर रामराव देशमुख*

 *खामगांव तालूक्याची बैठक संपन्न...विविध विषयांवर चर्चा*
 *खामगाव* - महाराष्ट्र राज्य सैनिक फेडरेशनची खामगांव  तालूका  बैठक लक्ष अकॅडमी, खामगाव येथे संपन्न झाली. या सभेत खामगांव येथील माजी सैनिक श्री रामराव बाप्पू देशमुख गारडगावकर यांची सैनिक फेडरेशनचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली.त्यांचे नेतृत्वाखाली फेडरेशनच्या माध्यमातून सैनिकांच्या समस्या सोडवून त्यांच्या कल्याणासाठी व अन्याय निवारण कार्यासाठी प्रभावी काम होईल असा मनोदय पदाधिकाऱ्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.श्री रामराव बाप्पू हे एक कुशल समाजसेवक,यशस्वी उद्योजक,शेतकरी असून, त्यांनी  सैन्यदलातील निवृत्तीनंतर स्टेट बॕंकेत रोखपाल म्हणून सेवा दिलेली आहे.ते लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचे सुध्दा  मार्गदर्शक तथा जिल्हा संघटक आहेत.त्यांची स्नेहशिल वृत्ती आणि सर्वसमावेशक कार्यामुळे ते सेवाभावी आणि सहकारी वृत्तीचे एक व्यक्तिमत्व म्हणून खामगांव आणि बुलढाणा जिल्ह्यात सुपरिचित आहेत. त्यांच्या निवडीचे विविध सामाजिक संस्था आणि त्यांच्या माजी सैनिक आणि ईतर सामाजिक मित्रांनी अभिनंदन केले आहे.

       खामगांव तालूक्याच्या या संपन्न झालेल्या महत्वपूर्ण बैठकीस तालुक्यातील सैनिक बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जिल्ह्यातील तसेच तालुक्यातील विविध अडचणींवर चर्चा केली.

बैठकीमध्ये विशेषतः सीएसडी कॅन्टीन, ईसीएचएस सुविधा, सैनिक स्मारक उभारणी या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या प्रसंगी सैनिक फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी डी. एफ. निंबाळकर, सैनिक फेडरेशन उद्योग विभाग सचिव श्री. रवींद्र घनबहादुर, अमरावती विभाग उपाध्यक्ष श्री. अर्जुन गवई, अकोला जिल्हा कार्याध्यक्ष श्री. समाधान तायडे, अकोला जिल्हा सचिव श्री. शेख खाजा आदी मान्यवर उपस्थित होते.

खामगाव तालुका फेडरेशनचे पदाधिकारी श्री. रामराव देशमुख, श्री. जगन्नाथ कळसकर, श्री. भास्कर बोराडे, तालुका अध्यक्ष श्री. रवी पवार ,श्री, प्रभाकर बुराडे श्री पहुरकर रवींद्र सावंग,  श्री. हेलोडे तसेच सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.

तसेच लक्ष अकॅडमीचे विद्यार्थी देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
आमच्या दादाना  हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा

Comments

Popular Posts

*नम्रता गणेशराव धोत्रे कौलखेड अकोला या लाडक्या बहिणी विरुद्ध मलकापूर पो. स्टे. ला महाराष्ट्रातून पहिली तक्रार दाखल. मलकापूर (दिव्यांग शक्ती प्रतिनिध)ी*नुकताच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहिर केली मात्र अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसत आहे.अर्जदार महीला नम्रता यांनी प्रथमतः दि. ३०-०८-२०२४ रोजी योजनेचा अर्ज केला व अंतिमतः दि. ०२-०९-२०२४ रोजी त्यांचा शासनाद्वारे अर्ज मंजुर करण्यात आला आहे व त्याप्रमाणे प्रस्तुत अर्जदार हिस दरमहा १५००/- रूपये प्रमाणे निधी तिचे खात्यात प्राप्त झाला आहे. खरे म्हणजे अर्जदार नम्रता हिने खोटे व बनावटी हमीपत्राचा दस्त तयार करून त्यात खोटी व बनावटी माहित दिली व तो खरा आहे असे भासवुना जाणीव पूर्वक सदर दस्त संबंधीत अधिकाऱ्यांकडे सादर केला.त्याद्वारे शासनाची फसवणुक करून स्वतःचा गैरहक्की आर्थिक लाभ प्राप्त केला आहे.याबाबत सविस्तर असे की सदर योजने करीता पात्रता निकष असे की,ज्या महिलेच्या एकत्रीत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० /- रूपयांपेक्षा अधिक आहे, ज्या कुटूंबातील सदस्य आयकर दाता आहे, ज्या कुटूंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी म्हणुन सेवानिवृत्ती नंतर सेवानिवृत्ती वेतन घेतात, ज्यांच्या कुटूंबात चारचाकी वाहन आहे किंवा ज्या कुटूंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरत नाही. पात्र अर्जदार लाडक्या बहिणीला तसे हमीपत्र सुद्धा द्यावे लागते.असे निकष असताना अर्जदार लाडकी बहिण नम्रता हिने तिचे लग्नानंतरचे नावाने अर्ज केला आहे. सदर अर्जदार हिचे सासर कडील एकत्र कुटूंबाचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त आहे, सदर अर्जदार हिचे सासरे सेवानिवृत्ती वेतन घेतात, त्यांचे पती दिपक चांभारे पाटील नावाने एकुण ६ एकर शेतजमिन आहे. म्हणजेच निकषाप्रमाणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे. असे असतांना देखील व सदरची बाब पुर्णतः माहिती व जाणीवेतील असतांना देखील प्रस्तुत अर्जदार हिने खोटे हमीपत्र निष्पादीत केले व सदर हमीपत्र व त्यातील मजकुर खोटा आहे याची माहिती व जाणीव असतांना गैरहक्की आर्थिक लाभाचे दुषित हेतुने त्याचा वापर करून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा आर्थिक लाभ प्राप्त करून घेतला आहे.प्रस्तुत अर्जदार ही तिचे पतीपासून गेल्या पाच ते सहा वर्षापासुन विभक्त राहत आहे. त्यांचेदरम्यान अकोला येथील न्यायालयात खावटीकरीता न्यायालयीन प्रकरणे सुरू असून सदर अर्जदार हिस तिचे पतीपासून एकत्रीतरित्या दरमहा ५०,००० /- रूपये खावटी मंजुर झाल्याची देखील तक्रारीत नमूद आहे. सबब निकषास पात्र नसतांना देखील खोटी माहिती देवून व खरी माहिती लपवून सदर अर्जदार हिने योजनेचा लाभ मिळविला आहे. सदर अर्जदार हिचे माहेरचे नांव नम्रता गणेश धोत्रे आहे व सदर धोत्रे परिवारात चारचाकी वाहन आहे व त्या परिवाराचे उत्पन्न देखील अडीच लाखापेक्षा जास्त आहे. असे असतांना स्वतःचे वैवाहिकस्थितीबाबत खोटी माहिती प्रस्तुत अर्जदाराने दिली असून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला आहे.सदर महिती जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसिलदार, मलकापूर यांचेकडून अर्ज व त्यासोबतची कागदपत्र यांची माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागणी केली असता. अर्जदार नम्रता यांनी खोटे हमीपत्र तयार करून त्यात खोटी माहिती देऊन शासनाची फसवणुक केल्याबाबतची व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला असल्याचे दिसले. नम्रता यांचे सदरचे कृत्य दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा असून त्याबाबत त्यांच्या विरूध्द मलकापूर पो. स्टे. ला फिर्याद श्री. राजेंद्र काजळे यांनी दिली आहे.