घाटपुरी नाका परिसरात रस्ता विस्तारी करणासाठी खोदलेल्या खड्ड्यांना मजबूत कठडे लावा ....... माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा

घाटपुरी नाका परिसरात रस्ता विस्तारी करणासाठी खोदलेल्या खड्ड्यांना मजबूत कठडे लावा ....... माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा

 खामगाव
(संतोष आटोळे)
 ः सध्या नवरात्री उत्सव सुरू असून अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या घाटपुरी येथील आई जगदंबा देवीच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक भक्त घाटपुरी येथील मंदिरामध्ये दर्शनासाठी जात असतात परंतु घाटपुरी नाका परिसरात रस्ता विस्तारीकरणासाठी केलेल्या खोदकामामुळे या ठिकाणी रस्ता अरुंद झाल्याने अनेक किरकोळ अपघात होत आहे. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सायंकाळच्या सुमारास दुचाकी चालक युवक गाडी घेवून नालीत पडल्याची घटना घडली होती. याच ठिकाणी काही वेळातच एक स्कुटी गाडी स्लीप झाल्याने एक महिला आपल्या लहान मुलीसह गाडीवरून पडली. सुदैवाने दोन्ही घटनेमध्ये मोठा अनर्थ टळला.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी दि.23 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी घाटपुरी नाका येथे जाऊन परिसरातील नागरिकांसोबत चर्चा केली. यावेळी माजी नगराध्यक्ष श्रीमती सरस्वतीताई खासने, माजी नगरसेवक ओम शर्मा, रवी भोवरे, सुरेंद्र पवार, धनंजय वानखडे,गोलु भेरडे आदी उपस्थित होते. नवरात्री उत्सवात देवीच्या दर्शनासाठी गद वाढत असून रस्त्याचे काम सुरु असल्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. रस्ता कामासाठी कंत्राटदाराने रस्त्याच्या बाजूला खोदकाम करतांना कोणतेही सूचना फलक , कठडे लावलेले नसल्याने या ठिकाणी अपघात होत असल्याचे सांगून नागरिकांनी संताप व्यक्त केला.या घटनेबाबत नगर परिषदेचे मुख्य प्रशासक यांना माहिती देऊन  संबंधीत कंत्राटदाराने तातडीने मजबूत कठडे लावावे आणि घाटपुरी नाका रस्ता वाहतुकीचा मुख्य रस्ता आहे. परंतू या ठिकाणी रस्त्यावर मुरुम टाकण्यात आल्यामुळे वाहने घसरुन किरकोळ अपघात होत आहे. म्हणून याठिकाणी असलेले मुरुम काढुन या ठिकाणी सपाटीकरण करुन वाहतुकीसाठी चांगला रस्ता तयार करण्यात यावा तसेच नगर पालीका प्रशासनाच्या हलगजपणामुळे घाटपुरी नाका परिसरात रस्त्यालगत केलेल्या खोदकामामुळे एखादी अनुचित घटना घडल्यास त्याला मुख्याधिकारी व संबंधीत अधिकारी जबाबदार राहतील व नागरीकांच्या विनंतीनुसार या रस्त्याचे विजयादशमी नंतर युध्दस्तरावर समयबध्द कालावधीत काम पुर्ण करावे,अशी मागणी सुध्दा माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केली आहे.
  

Comments

Popular Posts

*नम्रता गणेशराव धोत्रे कौलखेड अकोला या लाडक्या बहिणी विरुद्ध मलकापूर पो. स्टे. ला महाराष्ट्रातून पहिली तक्रार दाखल. मलकापूर (दिव्यांग शक्ती प्रतिनिध)ी*नुकताच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहिर केली मात्र अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसत आहे.अर्जदार महीला नम्रता यांनी प्रथमतः दि. ३०-०८-२०२४ रोजी योजनेचा अर्ज केला व अंतिमतः दि. ०२-०९-२०२४ रोजी त्यांचा शासनाद्वारे अर्ज मंजुर करण्यात आला आहे व त्याप्रमाणे प्रस्तुत अर्जदार हिस दरमहा १५००/- रूपये प्रमाणे निधी तिचे खात्यात प्राप्त झाला आहे. खरे म्हणजे अर्जदार नम्रता हिने खोटे व बनावटी हमीपत्राचा दस्त तयार करून त्यात खोटी व बनावटी माहित दिली व तो खरा आहे असे भासवुना जाणीव पूर्वक सदर दस्त संबंधीत अधिकाऱ्यांकडे सादर केला.त्याद्वारे शासनाची फसवणुक करून स्वतःचा गैरहक्की आर्थिक लाभ प्राप्त केला आहे.याबाबत सविस्तर असे की सदर योजने करीता पात्रता निकष असे की,ज्या महिलेच्या एकत्रीत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० /- रूपयांपेक्षा अधिक आहे, ज्या कुटूंबातील सदस्य आयकर दाता आहे, ज्या कुटूंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी म्हणुन सेवानिवृत्ती नंतर सेवानिवृत्ती वेतन घेतात, ज्यांच्या कुटूंबात चारचाकी वाहन आहे किंवा ज्या कुटूंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरत नाही. पात्र अर्जदार लाडक्या बहिणीला तसे हमीपत्र सुद्धा द्यावे लागते.असे निकष असताना अर्जदार लाडकी बहिण नम्रता हिने तिचे लग्नानंतरचे नावाने अर्ज केला आहे. सदर अर्जदार हिचे सासर कडील एकत्र कुटूंबाचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त आहे, सदर अर्जदार हिचे सासरे सेवानिवृत्ती वेतन घेतात, त्यांचे पती दिपक चांभारे पाटील नावाने एकुण ६ एकर शेतजमिन आहे. म्हणजेच निकषाप्रमाणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे. असे असतांना देखील व सदरची बाब पुर्णतः माहिती व जाणीवेतील असतांना देखील प्रस्तुत अर्जदार हिने खोटे हमीपत्र निष्पादीत केले व सदर हमीपत्र व त्यातील मजकुर खोटा आहे याची माहिती व जाणीव असतांना गैरहक्की आर्थिक लाभाचे दुषित हेतुने त्याचा वापर करून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा आर्थिक लाभ प्राप्त करून घेतला आहे.प्रस्तुत अर्जदार ही तिचे पतीपासून गेल्या पाच ते सहा वर्षापासुन विभक्त राहत आहे. त्यांचेदरम्यान अकोला येथील न्यायालयात खावटीकरीता न्यायालयीन प्रकरणे सुरू असून सदर अर्जदार हिस तिचे पतीपासून एकत्रीतरित्या दरमहा ५०,००० /- रूपये खावटी मंजुर झाल्याची देखील तक्रारीत नमूद आहे. सबब निकषास पात्र नसतांना देखील खोटी माहिती देवून व खरी माहिती लपवून सदर अर्जदार हिने योजनेचा लाभ मिळविला आहे. सदर अर्जदार हिचे माहेरचे नांव नम्रता गणेश धोत्रे आहे व सदर धोत्रे परिवारात चारचाकी वाहन आहे व त्या परिवाराचे उत्पन्न देखील अडीच लाखापेक्षा जास्त आहे. असे असतांना स्वतःचे वैवाहिकस्थितीबाबत खोटी माहिती प्रस्तुत अर्जदाराने दिली असून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला आहे.सदर महिती जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसिलदार, मलकापूर यांचेकडून अर्ज व त्यासोबतची कागदपत्र यांची माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागणी केली असता. अर्जदार नम्रता यांनी खोटे हमीपत्र तयार करून त्यात खोटी माहिती देऊन शासनाची फसवणुक केल्याबाबतची व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला असल्याचे दिसले. नम्रता यांचे सदरचे कृत्य दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा असून त्याबाबत त्यांच्या विरूध्द मलकापूर पो. स्टे. ला फिर्याद श्री. राजेंद्र काजळे यांनी दिली आहे.