सहा महिन्यापासून थकीत असलेले अनुदान संजय गांधी व श्रावण बाळ योजनेचे दिवाळीपूर्वी मिळावे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

सहा महिन्यापासून थकीत असलेले अनुदान संजय गांधी व श्रावण बाळ योजनेचे दिवाळीपूर्वी मिळावे
  राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे
 यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन 
 खामगाव 
प्रतिनिधी: 
निराधार स्त्रिया, अपंग बांधव व वयोवृद्धांना मिळणारे संजय गांधी व श्रावणबाळ योजनेचे थकित अनुदान दिवाळीपूर्वी मिळावे या मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविले आहे. सदर निवेदनात नमूद केले आहे की, राज्य शासनाने संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत व श्रावण बाळ योजना अंतर्गत लाभार्थ्यांना २०२५ पासून डीबीटी मार्फत लाभ हस्तांतरित करण्यास सुरुवात केली आहे. परंतु अनेक लाभार्थ्यांची अकाउंट डीबीटीला लिंक नसल्यामुळे त्यांचे सुमारे ६ महिन्याचे अनुदान थकले आहे. काही लाभार्थ्यांना अकाउंटला डीबीटी लिंक केल्यानंतर फक्त चालू महिन्याचे १५०० रुपयांचे अनुदान मिळाले आहे. थकित अनुदान मिळण्यासाठी संबंधित बँक व संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात लाभार्थ्यांनी चकरा मारल्या असता कोणत्याही समाधानकारक उत्तरे मिळत नाही. तरी या योजनांचा पैसा गेला कोठे याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. एकीकडे शासन कोट्यवधी रुपये जाहिरातीवर उधळत असताना प्रत्यक्ष लाभार्थ्यांना मात्र १५०० रुपयासाठी अनेक संकटाचा सामना करावा लागत आहे. सध्या सणासुदीचे दिवस असून येत्या काही दिवसात नवरात्र त्यानंतर दसरा व दिवाळी सण आहेत. लाभार्थ्यांना थकीत अनुदान न मिळाल्यास त्यांची दिवाळी अंधारात जाऊ शकते. तरी वरील दोन्ही योजनेचे थकीत अनुदान दिवाळीपूर्वी मिळण्याचे दृष्टीने आपले स्तरावरून संबंधितास योग्य ते आदेश द्यावेत अन्यथा राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल व त्यापासून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यांची संपूर्ण जबाबदारी शासन व प्रशासनावर राहील असेही जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे यांनी निवेदनात नमूद केले आहे. सदर निवेदनाच्या प्रती उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री मकरंद जाधव, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक, शहर पोलीस स्टेशन ठाणेदार,शिवाजीनगर पोलीस स्टेशन ठाणेदार, राष्ट्रीय ओबीसी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.बबनराव तायवाडे यांनाही पाठविण्यात आलेले आहे

Comments

Popular Posts

*नम्रता गणेशराव धोत्रे कौलखेड अकोला या लाडक्या बहिणी विरुद्ध मलकापूर पो. स्टे. ला महाराष्ट्रातून पहिली तक्रार दाखल. मलकापूर (दिव्यांग शक्ती प्रतिनिध)ी*नुकताच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहिर केली मात्र अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसत आहे.अर्जदार महीला नम्रता यांनी प्रथमतः दि. ३०-०८-२०२४ रोजी योजनेचा अर्ज केला व अंतिमतः दि. ०२-०९-२०२४ रोजी त्यांचा शासनाद्वारे अर्ज मंजुर करण्यात आला आहे व त्याप्रमाणे प्रस्तुत अर्जदार हिस दरमहा १५००/- रूपये प्रमाणे निधी तिचे खात्यात प्राप्त झाला आहे. खरे म्हणजे अर्जदार नम्रता हिने खोटे व बनावटी हमीपत्राचा दस्त तयार करून त्यात खोटी व बनावटी माहित दिली व तो खरा आहे असे भासवुना जाणीव पूर्वक सदर दस्त संबंधीत अधिकाऱ्यांकडे सादर केला.त्याद्वारे शासनाची फसवणुक करून स्वतःचा गैरहक्की आर्थिक लाभ प्राप्त केला आहे.याबाबत सविस्तर असे की सदर योजने करीता पात्रता निकष असे की,ज्या महिलेच्या एकत्रीत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० /- रूपयांपेक्षा अधिक आहे, ज्या कुटूंबातील सदस्य आयकर दाता आहे, ज्या कुटूंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी म्हणुन सेवानिवृत्ती नंतर सेवानिवृत्ती वेतन घेतात, ज्यांच्या कुटूंबात चारचाकी वाहन आहे किंवा ज्या कुटूंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरत नाही. पात्र अर्जदार लाडक्या बहिणीला तसे हमीपत्र सुद्धा द्यावे लागते.असे निकष असताना अर्जदार लाडकी बहिण नम्रता हिने तिचे लग्नानंतरचे नावाने अर्ज केला आहे. सदर अर्जदार हिचे सासर कडील एकत्र कुटूंबाचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त आहे, सदर अर्जदार हिचे सासरे सेवानिवृत्ती वेतन घेतात, त्यांचे पती दिपक चांभारे पाटील नावाने एकुण ६ एकर शेतजमिन आहे. म्हणजेच निकषाप्रमाणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे. असे असतांना देखील व सदरची बाब पुर्णतः माहिती व जाणीवेतील असतांना देखील प्रस्तुत अर्जदार हिने खोटे हमीपत्र निष्पादीत केले व सदर हमीपत्र व त्यातील मजकुर खोटा आहे याची माहिती व जाणीव असतांना गैरहक्की आर्थिक लाभाचे दुषित हेतुने त्याचा वापर करून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा आर्थिक लाभ प्राप्त करून घेतला आहे.प्रस्तुत अर्जदार ही तिचे पतीपासून गेल्या पाच ते सहा वर्षापासुन विभक्त राहत आहे. त्यांचेदरम्यान अकोला येथील न्यायालयात खावटीकरीता न्यायालयीन प्रकरणे सुरू असून सदर अर्जदार हिस तिचे पतीपासून एकत्रीतरित्या दरमहा ५०,००० /- रूपये खावटी मंजुर झाल्याची देखील तक्रारीत नमूद आहे. सबब निकषास पात्र नसतांना देखील खोटी माहिती देवून व खरी माहिती लपवून सदर अर्जदार हिने योजनेचा लाभ मिळविला आहे. सदर अर्जदार हिचे माहेरचे नांव नम्रता गणेश धोत्रे आहे व सदर धोत्रे परिवारात चारचाकी वाहन आहे व त्या परिवाराचे उत्पन्न देखील अडीच लाखापेक्षा जास्त आहे. असे असतांना स्वतःचे वैवाहिकस्थितीबाबत खोटी माहिती प्रस्तुत अर्जदाराने दिली असून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला आहे.सदर महिती जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसिलदार, मलकापूर यांचेकडून अर्ज व त्यासोबतची कागदपत्र यांची माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागणी केली असता. अर्जदार नम्रता यांनी खोटे हमीपत्र तयार करून त्यात खोटी माहिती देऊन शासनाची फसवणुक केल्याबाबतची व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला असल्याचे दिसले. नम्रता यांचे सदरचे कृत्य दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा असून त्याबाबत त्यांच्या विरूध्द मलकापूर पो. स्टे. ला फिर्याद श्री. राजेंद्र काजळे यांनी दिली आहे.