*धाराशीव जिल्ह्यात दिव्यांग मेळावा भव्य यशस्वी – शेतकरी प्रश्नांवर बच्चू कडूंचा हल्लाबोल, मयूर काकडेंना नगरसेवक करण्याचे आवाहन*
*धाराशीव जिल्ह्यात दिव्यांग मेळावा भव्य यशस्वी – शेतकरी प्रश्नांवर बच्चू कडूंचा हल्लाबोल, मयूर काकडेंना नगरसेवक करण्याचे आवाहन*
धाराशीव,
दिव्यांग शक्ती
दि. 28 सप्टेंबर 2025
धाराशीव नगर परिषदेच्या श्री. छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे दिव्यांग-शेतकरी-शेतमजूर हक्क यात्रा अंतर्गत भव्य दिव्यांग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
या मेळाव्याचे अध्यक्षस्थान राज्य मंत्री व प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. बच्चूभाऊ कडू यांनी भूषविले.
मान्यवरांची उपस्थिती
या मेळाव्यात मोठ्या प्रमाणावर मान्यवरांनी सहभाग नोंदवला. त्यामध्ये –
आमदार कैलास पाटील, प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्याध्यक्ष बल्लूभाऊ झांजवळ, राष्ट्रवादी काँग्रेस युवती संघटनेच्या अध्यक्ष सक्षणा सलगर, राष्ट्रवादी काँग्रेस (शप)चे नेते संजय दुधगावकर, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष प्रशांत पाटील, प्रहार पक्ष जिल्हा संपर्कप्रमुख अमोल जगदाळे, निरीक्षक मंगेश ठाकरे, राष्ट्रीय काँग्रेसचे शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, मराठा सेवक संघटनेचे बलराज रणदिवे, जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, प्रहार पक्ष बीड जिल्हाध्यक्ष विलास काळुंके, सातलिंग स्वामी, राकेश सूर्यवंशी तसेच विविध मान्यवर व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
दिव्यांग व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा
मेळाव्यात दिव्यांग बांधवांच्या समस्या, शासनाच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत कशा पोहोचतील, रोजगाराच्या संधी व स्वावलंबनाचे मार्ग कसे वाढतील यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यासोबतच शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवरही विचारमंथन करण्यात आले.
*व्यासपीठावरून बच्चू कडूंचे आवाहन*
कार्यक्रमादरम्यान बच्चू कडूंनी व्यासपीठावरून सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांना आवाहन केले –
“मयूर काकडे यांना नगरसेवक करा.”
*या आवाहनाला प्रतिसाद देताना आमदार कैलास पाटील म्हणाले –*
“मयूर काकडे हा आमच्या सर्वांचा मित्र आहे. अनेक वर्षांपासून आमचे जवळचे संबंध आहेत. त्याच्या कार्याची दखल घेऊन आम्ही निश्चित त्याला नगरसेवक करू. मग ते जनतेतून असो अथवा स्वीकृत कोट्यातून, हे पुढे आम्ही ठरवू. आज मी या व्यासपीठावरून शब्द देत आहे.”
त्यांच्या या वक्तव्याला व्यासपीठावरील अनेक मान्यवरांनी टाळ्यांचा कडकडाट करून प्रतिसाद दिला.
आयोजक व पदाधिकारी
या भव्य मेळाव्याचे प्रमुख आयोजन मयुर ज्ञानेश्वर काकडे (राज्याध्यक्ष, प्रहार अपंग संघटना, महाराष्ट्र राज्य) यांनी केले.
तर संपूर्ण नियोजन प्रहार पक्ष जिल्हाध्यक्ष महेश काकडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
आयोजन समितीमध्ये जिल्हा संघटक बाळासाहेब कसबे, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, जिल्हा सचिव महादेव चोपदार, जिल्हा उपाध्यक्ष महेश माळी, महादेव खंडाळकर, उपाध्यक्ष इसाक शेख, बाबासाहेब भोईटे, गणेश शिंदे, हेमंत उंदरे, दत्ता पवार, इंद्रजीत मिसाळ, भगवान होगले, नवनाथ कचार, संजय नाईकवाडी, बालाजी तांबे, कालू जाधव, कैलास यादव, दिनेश पोद्दार, शिवाजी पोद्दार,पैगंबर मुलाणी, नितीन शेळके, ललित कापरे, किशोर कांबळे, महावीर कोंडेकर, अमोल पाड़े, नितीन मुळे, व्यंकट कमळे, आशीफ शेख
तसेच जिल्हा व तालुका पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी योगदान दिले.
🌟 उत्स्फूर्त प्रतिसाद
या मेळाव्यास ७०० ते ८०० दिव्यांग बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग होता. त्यांच्या उपस्थितीमुळे मेळावा भव्यदिव्य झाला आणि सामाजिक ऐक्याचा उत्तम संदेश जनतेत पोहोचला.
Comments
Post a Comment