श्री जहॉंरवीर गोगा नवमी उत्सवानिमित्त निघालेल्या शोभायात्रेचे माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले स्वागतशोभायात्रेमध्ये सहभागी झालेल्या भाविकांना सानंदा मित्र मंडळ व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शरबतचे वितरण



 श्री जहॉंरवीर गोगा नवमी उत्सवानिमित्त निघालेल्या शोभायात्रेचे  माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले स्वागत
शोभायात्रेमध्ये सहभागी झालेल्या भाविकांना सानंदा मित्र मंडळ व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शरबतचे वितरण

 खामगाव = रविवार दि.18 ऑगस्ट 2025 रोजी शहरात दरवष प्रमाणे याहीवष वाल्मीकी मेहतर व सुदर्शन समाज बांधव भगिणींच्या वतीने श्री जहारवीर बाबा गोगा देवजी नवमी उत्सव भक्तीभावपुर्ण व हर्ष्ाोल्हास वातावरणा उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमित्त सतीफैल  भागातुन मानाची छडी व शंकर नगर भागातुन मंडळाकडुन  शहरातुन शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेचे एकबोटे चौक येथे  आगमन झाले असता माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा,माजी नगराध्यक्ष राणा अशोकसिंह सानंदा यांनी शोभायात्रेचे स्वागत करुन गोगाजी महाराजांच्या पवित्र छडीचे दर्शन घेतले व वाल्मीकी मेहतर समाज व सुदर्शन समाज बांध्ावांना गोगानवमीच्या शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी राजुभाऊ सारवान,कैलास धेडुंदे,ईश्वर सारसर,प्रकाश सारसर,हेमराज सारसर,विजय सारवान, राज सारसर, जगदिश निंदाने  यांच्यासह  वाल्मीक समाज बांध्ाव उपस्थित होते.
  गोगानवमी निमित्त समाज बांध्ावांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. हा महिना वाल्मीकी मेहतर समाज बांध्ावांसाठी अत्यंत पवित्र महिना असतो. संपुर्ण महिना भर उपवास करुन ईश्वराची आराध्ाना केली जाती. श्री गोगाजी महाराज जयंतीच्या पावन पर्वावर दरवष शंकर नगर,बाळापुर फैल,सतीफैल  या भागातुन वाल्मीकी समाज बांध्ावांच्या वतीने भव्य शोभायात्रा काढण्यात  येतात.या शोभायात्रेमध्ये वाल्मीकी समाजाचे   प्रतिष्ठीत नागरिक,महिला भगिणी हजारोंच्या संख्येने सहभागी   होत असतात. परंतू यावर्षी सतीफैल आणि बाळापुर फैल भागामध्ये वाल्मीकी समाजामध्ये दुःखद  घटना घडल्यामुळे यावष दोनच मंडळांनी शोभायात्रा काढल्या.या दोन्ही मंडळाच्या शोभायात्रा खामगांव शहरातील विविध्ा मार्गाने मार्गक्रमण करीत एकबोटे चौक येथे आली असता सानंदा मित्र मंडळ  व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने  शोभायात्रेमध्ये सहभागी झालेल्या शेकडो भाविकांना शरबतचे वितरण करण्यात आले. यावेळी  माजी नगराध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने, पोशाख ड्रेसेसचे संचालक संजुभाऊ शर्मा, विजय काटोले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विलाससिंग इंगळे,शिवाजीराव पांढरे,लाखनवाडा ग्राम पंचायतचे सरपंच विलास पांढरे, माजी सरपंच विजय खंडारे, माजी सरपंच विजय रायगावकर ,डॉ.आकाश इंगळे, डॉ.आर.के.राजपुत, काळेगावचे माजी सरपंच विलाससिंग इंगळे, गोंधनापुर ग्राम पंचायतचे सरपंच राजेंद्र खंडारे, ग्राम पंचायत सदस्य नदीमभाई, जयराम मुंडाले,केशव खंडारे,पुरुषोत्तम शेजोळे, निवृत्ती धामनकार, वासुदेव चौभारे, मोहन हसंबे, गोपाल चौभारे,रोहित राजपुत,वैभव वानखडे,श्याम मोरे,संदिप शमी, सुनिल मानकर, अक्षय मिरगे, सुरेंद्र पवार, संतोष आटोळे,प्रशांत शर्मा यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते

Comments

Popular Posts

*नम्रता गणेशराव धोत्रे कौलखेड अकोला या लाडक्या बहिणी विरुद्ध मलकापूर पो. स्टे. ला महाराष्ट्रातून पहिली तक्रार दाखल. मलकापूर (दिव्यांग शक्ती प्रतिनिध)ी*नुकताच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहिर केली मात्र अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसत आहे.अर्जदार महीला नम्रता यांनी प्रथमतः दि. ३०-०८-२०२४ रोजी योजनेचा अर्ज केला व अंतिमतः दि. ०२-०९-२०२४ रोजी त्यांचा शासनाद्वारे अर्ज मंजुर करण्यात आला आहे व त्याप्रमाणे प्रस्तुत अर्जदार हिस दरमहा १५००/- रूपये प्रमाणे निधी तिचे खात्यात प्राप्त झाला आहे. खरे म्हणजे अर्जदार नम्रता हिने खोटे व बनावटी हमीपत्राचा दस्त तयार करून त्यात खोटी व बनावटी माहित दिली व तो खरा आहे असे भासवुना जाणीव पूर्वक सदर दस्त संबंधीत अधिकाऱ्यांकडे सादर केला.त्याद्वारे शासनाची फसवणुक करून स्वतःचा गैरहक्की आर्थिक लाभ प्राप्त केला आहे.याबाबत सविस्तर असे की सदर योजने करीता पात्रता निकष असे की,ज्या महिलेच्या एकत्रीत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० /- रूपयांपेक्षा अधिक आहे, ज्या कुटूंबातील सदस्य आयकर दाता आहे, ज्या कुटूंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी म्हणुन सेवानिवृत्ती नंतर सेवानिवृत्ती वेतन घेतात, ज्यांच्या कुटूंबात चारचाकी वाहन आहे किंवा ज्या कुटूंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरत नाही. पात्र अर्जदार लाडक्या बहिणीला तसे हमीपत्र सुद्धा द्यावे लागते.असे निकष असताना अर्जदार लाडकी बहिण नम्रता हिने तिचे लग्नानंतरचे नावाने अर्ज केला आहे. सदर अर्जदार हिचे सासर कडील एकत्र कुटूंबाचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त आहे, सदर अर्जदार हिचे सासरे सेवानिवृत्ती वेतन घेतात, त्यांचे पती दिपक चांभारे पाटील नावाने एकुण ६ एकर शेतजमिन आहे. म्हणजेच निकषाप्रमाणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे. असे असतांना देखील व सदरची बाब पुर्णतः माहिती व जाणीवेतील असतांना देखील प्रस्तुत अर्जदार हिने खोटे हमीपत्र निष्पादीत केले व सदर हमीपत्र व त्यातील मजकुर खोटा आहे याची माहिती व जाणीव असतांना गैरहक्की आर्थिक लाभाचे दुषित हेतुने त्याचा वापर करून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा आर्थिक लाभ प्राप्त करून घेतला आहे.प्रस्तुत अर्जदार ही तिचे पतीपासून गेल्या पाच ते सहा वर्षापासुन विभक्त राहत आहे. त्यांचेदरम्यान अकोला येथील न्यायालयात खावटीकरीता न्यायालयीन प्रकरणे सुरू असून सदर अर्जदार हिस तिचे पतीपासून एकत्रीतरित्या दरमहा ५०,००० /- रूपये खावटी मंजुर झाल्याची देखील तक्रारीत नमूद आहे. सबब निकषास पात्र नसतांना देखील खोटी माहिती देवून व खरी माहिती लपवून सदर अर्जदार हिने योजनेचा लाभ मिळविला आहे. सदर अर्जदार हिचे माहेरचे नांव नम्रता गणेश धोत्रे आहे व सदर धोत्रे परिवारात चारचाकी वाहन आहे व त्या परिवाराचे उत्पन्न देखील अडीच लाखापेक्षा जास्त आहे. असे असतांना स्वतःचे वैवाहिकस्थितीबाबत खोटी माहिती प्रस्तुत अर्जदाराने दिली असून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला आहे.सदर महिती जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसिलदार, मलकापूर यांचेकडून अर्ज व त्यासोबतची कागदपत्र यांची माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागणी केली असता. अर्जदार नम्रता यांनी खोटे हमीपत्र तयार करून त्यात खोटी माहिती देऊन शासनाची फसवणुक केल्याबाबतची व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला असल्याचे दिसले. नम्रता यांचे सदरचे कृत्य दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा असून त्याबाबत त्यांच्या विरूध्द मलकापूर पो. स्टे. ला फिर्याद श्री. राजेंद्र काजळे यांनी दिली आहे.