सा. ग्रामक्रांती पुरस्काराने पहुरजीरा येथील जि. प.कें.उच्च प्राथमिक मुलांची शाळा सन्मानितगावाचा सर्वांगीण विकास म्हणजेच गामक्रांती .. ज्येष्ठ पत्रकार राजेश राजोरेशोध पत्रकारितेच्या माध्यमातून पुरस्कार निवड ... ज्येष्ठ पत्रकार जगदीश अग्रवाल

सा. ग्रामक्रांती पुरस्काराने पहुरजीरा येथील जि. प.कें.उच्च प्राथमिक मुलांची शाळा  सन्मानित
गावाचा सर्वांगीण विकास म्हणजेच गामक्रांती .. ज्येष्ठ पत्रकार राजेश राजोरे
शोध पत्रकारितेच्या माध्यमातून पुरस्कार निवड ... ज्येष्ठ पत्रकार जगदीश अग्रवाल
 शेगाव
 (सागर शिरसाट ) 
शेगाव तालुक्यातील पहुरजिरा गावातील इ. सन 1873 ची स्थापना असलेली  जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक मुलांची शाळा जी आजही अतिशय चांगली कार्यरत असून या शाळेला दीडशे वर्ष होऊन गेली आहे स्वातंत्र्यपूर्व शैक्षणिक क्रांती मध्ये सदर शाळेचे अमूल्य योगदान आहे. त्याकाळी स्वदेशी जागरण,  हातमाग,  कृषी  व सामाजिक, सांस्कृतिक तसेच राष्ट्रसेवाभाव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण  करण्याचे बहुमूल्य कार्य या शाळेने केले आहे.  
          त्या  कार्याची दखल घेऊन '9 ऑगस्ट क्रांती दिन सा. ग्राम क्रांती वृत्तपत्र वर्धापन दिनानिमित्त 13 ऑगस्ट रोजी सा.ग्रामक्रांती हा  पुरस्कार दै.देशोन्नती आवृत्ती संपादक मा. श्री. राजेशजी राजोरे व ज्येष्ठ संपादक या .श्री. जगदीशजी अग्रवाल यांच्या हस्ते  हा पुरस्कार प्रदान करुन या शाळेला सन्मानित करण्यात आले आहे या पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी शाळा समितीच्या अध्यक्ष सौ. गीताबाई तुळशीराम पारस्कर तर प्रमुख अतिथी म्हणून दैनिक देशोन्नती जिल्हा आवृत्ती संपादक राजेशजी राजोरे ज्येष्ठ पत्रकार जगदीशजी अग्रवाल राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष नितेश मानकर सा. ग्रामक्रांती
संपादक.   श्री मंगेश तोमर कार्यकारी संपादक. संभाजीराव टाले गावाच्या सरपंच  सौ.शारदाताई मंगेश पारस्कर. मा.पं.स. सदस्य ब्रह्मानंद पारस्कर ग्राम विस्तार अधिकारी देशमुख साहेब केंद्रप्रमुख झनके शाळेच्या मुख्याध्यापिका बोपले मॅडम कन्या शाळेच्या मुख्याध्यापक अंभोरे मॅडम सातपुडा हायस्कूलचे मुख्याध्यापक वानखडे सर उर्दू शाळेचे मुख्याध्यापक मुस्ताक सर शाळा समिती माजी अध्यक्ष निलेश पारस्कर ग्रामपंचायत सदस्य शिवा पारस्कर व तायडे सर हे होते तर श्री राजेशजी राजोरे यांनीआपले मनोगत व्यक्त करताना व मार्गदर्शन करताना सांगितले की भारत हा देश ग्रामीण भागात वसलेला असून ग्रामीण भागातील क्रांती  म्हणजेच ग्राम क्रांती होय गावात चांगली शिक्षण. व्यवस्था स्वच्छता वआरोग्य व्यवस्था. गावात शेतीवर अवलंबून असलेल्या छोट्या मोठ्या उद्योग धंद्यांना चालना  शेतीमालाला आयात निर्यात करण्यासाठी चांगले रस्ते असले पाहिजे व गावाचा सर्वांगीण विकास म्हणजेच ग्रामक्रांती  तर ग्राम क्रांती पुरस्कार हा या शाळेच्या पुढील शैक्षणिक   वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरेल असे सांगितले तर ज्येष्ठ संपादक जगदीश अग्रवाल यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की शोध पत्रकारिताच्या माध्यमातून सा. ग्रामक्रांतीचे संपादक मंगेश तोमर व कार्यकारी संपादक संभाजीराव टाले यांनी पुरस्कारासाठी योग्य शाळेची निवड केली आहे असं सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संभाजीराव टाले यांनी तर सूत्रसंचालन व आभार अनंता पारस्कर सर यांनी केले वेळी समस्त शिक्षिका कर्मचारी विद्यार्थी पालक व गावकऱ्यांची उपस्थिती होती

Comments

Popular Posts

*नम्रता गणेशराव धोत्रे कौलखेड अकोला या लाडक्या बहिणी विरुद्ध मलकापूर पो. स्टे. ला महाराष्ट्रातून पहिली तक्रार दाखल. मलकापूर (दिव्यांग शक्ती प्रतिनिध)ी*नुकताच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहिर केली मात्र अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसत आहे.अर्जदार महीला नम्रता यांनी प्रथमतः दि. ३०-०८-२०२४ रोजी योजनेचा अर्ज केला व अंतिमतः दि. ०२-०९-२०२४ रोजी त्यांचा शासनाद्वारे अर्ज मंजुर करण्यात आला आहे व त्याप्रमाणे प्रस्तुत अर्जदार हिस दरमहा १५००/- रूपये प्रमाणे निधी तिचे खात्यात प्राप्त झाला आहे. खरे म्हणजे अर्जदार नम्रता हिने खोटे व बनावटी हमीपत्राचा दस्त तयार करून त्यात खोटी व बनावटी माहित दिली व तो खरा आहे असे भासवुना जाणीव पूर्वक सदर दस्त संबंधीत अधिकाऱ्यांकडे सादर केला.त्याद्वारे शासनाची फसवणुक करून स्वतःचा गैरहक्की आर्थिक लाभ प्राप्त केला आहे.याबाबत सविस्तर असे की सदर योजने करीता पात्रता निकष असे की,ज्या महिलेच्या एकत्रीत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० /- रूपयांपेक्षा अधिक आहे, ज्या कुटूंबातील सदस्य आयकर दाता आहे, ज्या कुटूंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी म्हणुन सेवानिवृत्ती नंतर सेवानिवृत्ती वेतन घेतात, ज्यांच्या कुटूंबात चारचाकी वाहन आहे किंवा ज्या कुटूंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरत नाही. पात्र अर्जदार लाडक्या बहिणीला तसे हमीपत्र सुद्धा द्यावे लागते.असे निकष असताना अर्जदार लाडकी बहिण नम्रता हिने तिचे लग्नानंतरचे नावाने अर्ज केला आहे. सदर अर्जदार हिचे सासर कडील एकत्र कुटूंबाचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त आहे, सदर अर्जदार हिचे सासरे सेवानिवृत्ती वेतन घेतात, त्यांचे पती दिपक चांभारे पाटील नावाने एकुण ६ एकर शेतजमिन आहे. म्हणजेच निकषाप्रमाणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे. असे असतांना देखील व सदरची बाब पुर्णतः माहिती व जाणीवेतील असतांना देखील प्रस्तुत अर्जदार हिने खोटे हमीपत्र निष्पादीत केले व सदर हमीपत्र व त्यातील मजकुर खोटा आहे याची माहिती व जाणीव असतांना गैरहक्की आर्थिक लाभाचे दुषित हेतुने त्याचा वापर करून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा आर्थिक लाभ प्राप्त करून घेतला आहे.प्रस्तुत अर्जदार ही तिचे पतीपासून गेल्या पाच ते सहा वर्षापासुन विभक्त राहत आहे. त्यांचेदरम्यान अकोला येथील न्यायालयात खावटीकरीता न्यायालयीन प्रकरणे सुरू असून सदर अर्जदार हिस तिचे पतीपासून एकत्रीतरित्या दरमहा ५०,००० /- रूपये खावटी मंजुर झाल्याची देखील तक्रारीत नमूद आहे. सबब निकषास पात्र नसतांना देखील खोटी माहिती देवून व खरी माहिती लपवून सदर अर्जदार हिने योजनेचा लाभ मिळविला आहे. सदर अर्जदार हिचे माहेरचे नांव नम्रता गणेश धोत्रे आहे व सदर धोत्रे परिवारात चारचाकी वाहन आहे व त्या परिवाराचे उत्पन्न देखील अडीच लाखापेक्षा जास्त आहे. असे असतांना स्वतःचे वैवाहिकस्थितीबाबत खोटी माहिती प्रस्तुत अर्जदाराने दिली असून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला आहे.सदर महिती जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसिलदार, मलकापूर यांचेकडून अर्ज व त्यासोबतची कागदपत्र यांची माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागणी केली असता. अर्जदार नम्रता यांनी खोटे हमीपत्र तयार करून त्यात खोटी माहिती देऊन शासनाची फसवणुक केल्याबाबतची व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला असल्याचे दिसले. नम्रता यांचे सदरचे कृत्य दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा असून त्याबाबत त्यांच्या विरूध्द मलकापूर पो. स्टे. ला फिर्याद श्री. राजेंद्र काजळे यांनी दिली आहे.