खामगांव येथील श्री. अरजण खिमजी नॅशनल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव व गुणसौरभ कार्यक्रम संपन्न



खामगांव येथील श्री. अरजण खिमजी नॅशनल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव व गुणसौरभ कार्यक्रम संपन्न
खामगांव (संतोष आटोळे)

आज दि. ०६ ऑगष्ट २०२५ रोजी श्री अरजण खिमजी नॅशनल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मधील इयत्ता ५ वी ते १२ वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम संपन्न झाला. त्यामध्ये एस.एस.सी., एच.एस.सी (२०२५) मध्ये विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण विद्यार्थी, शिष्यवृत्ती, एम.टी.एस., एन.टी.एस., एन.एम.एम.एस., स्पर्धा परीक्षा, चित्रकला परीक्षा २०२४, विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थी, एलीमेंट्री ग्रेड परीक्षा, ए-श्रेणी उत्तीर्ण, एम.टी.एस. परीक्षा गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी, एन.सी.सी. विभाग, क्रीडा विभागातून राज्यस्तरावर खेळलेल्या अशा विविध क्षेत्रामध्ये नेत्रदिपक यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख बक्षिस व पारोतोषिक देवून गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्षपद श्री. दिनेशजी संघवी यांनी भुषवीले तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहूणे म्हणून मा.डॉ.श्री. रामेश्वर पुरी (उपविभागीय अधिकारी महसूल), खामगांव व मा.डॉ.श्री. प्रशांत चौधरी (मज्जा मनोविकार तज्ञ, मुंबई), संस्थेचे सचिव श्री. मनोजजी नागडा, संस्थेचे कोषाध्यक्ष श्री. विजयजी नागडा, शाळेच्या प्राचार्या सौ. नंदा उदापूरकर, डॉ.सौ. हेमा जवंजाळ (प्राचार्या- सु.रा. मोहता महिला महाविद्यालय) या सर्व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा विविध पारीतोषिक देवून त्यांचा गुणगौरव करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी व अध्यक्षांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या प्राचार्या सौ. नंदा उदापूरकर मॅडम यांनी केले.

प्रमुख पाहुण्यांचा परिचय श्री. गणेश भरगडे सर, श्री जतिन लोडाया सर यांनी दिला. आपल्या मनोगत व्यक्त करतांना मनोविकार तज्ञ डॉ. प्रशांत चौधरी यांनी माजी विद्यार्थी आपल्या शालेय जीवनातील अनुभवांना उजाळा दिला व विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. कार्यक्रमाचे दुसरे अतिथी डॉ. श्री. रामेश्वर पुरी यांनी विद्यार्थ्यांना ध्येय निश्चिती बद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन श्रीमती मनिषा भाटे, सौ. पुजा नारायणन, सौ. रुपाली टापरे, श्री अंकित शाह यांनी केले. अध्यक्षीय भाषण श्री दिनेशजी संघवी यांनी केले. याप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी, खामगांव शहरातील प्रतिष्ठित नागरीक, विद्यार्थी व पालक वर्ग, माजी विद्यार्थी, संपादक श्री राजेश राजोरे साहेब, विविध वृत्तपत्रांचे पत्रकार, माजी मुख्याध्यापक श्री. हुरसाड सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. क्षिरसागर सर यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले व हा कार्यक्रम दरवर्षी प्रमाणे याही वर्षी यशस्वीरीत्या पार पडला व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.


Comments

Popular Posts

*नम्रता गणेशराव धोत्रे कौलखेड अकोला या लाडक्या बहिणी विरुद्ध मलकापूर पो. स्टे. ला महाराष्ट्रातून पहिली तक्रार दाखल. मलकापूर (दिव्यांग शक्ती प्रतिनिध)ी*नुकताच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहिर केली मात्र अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसत आहे.अर्जदार महीला नम्रता यांनी प्रथमतः दि. ३०-०८-२०२४ रोजी योजनेचा अर्ज केला व अंतिमतः दि. ०२-०९-२०२४ रोजी त्यांचा शासनाद्वारे अर्ज मंजुर करण्यात आला आहे व त्याप्रमाणे प्रस्तुत अर्जदार हिस दरमहा १५००/- रूपये प्रमाणे निधी तिचे खात्यात प्राप्त झाला आहे. खरे म्हणजे अर्जदार नम्रता हिने खोटे व बनावटी हमीपत्राचा दस्त तयार करून त्यात खोटी व बनावटी माहित दिली व तो खरा आहे असे भासवुना जाणीव पूर्वक सदर दस्त संबंधीत अधिकाऱ्यांकडे सादर केला.त्याद्वारे शासनाची फसवणुक करून स्वतःचा गैरहक्की आर्थिक लाभ प्राप्त केला आहे.याबाबत सविस्तर असे की सदर योजने करीता पात्रता निकष असे की,ज्या महिलेच्या एकत्रीत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० /- रूपयांपेक्षा अधिक आहे, ज्या कुटूंबातील सदस्य आयकर दाता आहे, ज्या कुटूंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी म्हणुन सेवानिवृत्ती नंतर सेवानिवृत्ती वेतन घेतात, ज्यांच्या कुटूंबात चारचाकी वाहन आहे किंवा ज्या कुटूंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरत नाही. पात्र अर्जदार लाडक्या बहिणीला तसे हमीपत्र सुद्धा द्यावे लागते.असे निकष असताना अर्जदार लाडकी बहिण नम्रता हिने तिचे लग्नानंतरचे नावाने अर्ज केला आहे. सदर अर्जदार हिचे सासर कडील एकत्र कुटूंबाचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त आहे, सदर अर्जदार हिचे सासरे सेवानिवृत्ती वेतन घेतात, त्यांचे पती दिपक चांभारे पाटील नावाने एकुण ६ एकर शेतजमिन आहे. म्हणजेच निकषाप्रमाणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे. असे असतांना देखील व सदरची बाब पुर्णतः माहिती व जाणीवेतील असतांना देखील प्रस्तुत अर्जदार हिने खोटे हमीपत्र निष्पादीत केले व सदर हमीपत्र व त्यातील मजकुर खोटा आहे याची माहिती व जाणीव असतांना गैरहक्की आर्थिक लाभाचे दुषित हेतुने त्याचा वापर करून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा आर्थिक लाभ प्राप्त करून घेतला आहे.प्रस्तुत अर्जदार ही तिचे पतीपासून गेल्या पाच ते सहा वर्षापासुन विभक्त राहत आहे. त्यांचेदरम्यान अकोला येथील न्यायालयात खावटीकरीता न्यायालयीन प्रकरणे सुरू असून सदर अर्जदार हिस तिचे पतीपासून एकत्रीतरित्या दरमहा ५०,००० /- रूपये खावटी मंजुर झाल्याची देखील तक्रारीत नमूद आहे. सबब निकषास पात्र नसतांना देखील खोटी माहिती देवून व खरी माहिती लपवून सदर अर्जदार हिने योजनेचा लाभ मिळविला आहे. सदर अर्जदार हिचे माहेरचे नांव नम्रता गणेश धोत्रे आहे व सदर धोत्रे परिवारात चारचाकी वाहन आहे व त्या परिवाराचे उत्पन्न देखील अडीच लाखापेक्षा जास्त आहे. असे असतांना स्वतःचे वैवाहिकस्थितीबाबत खोटी माहिती प्रस्तुत अर्जदाराने दिली असून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला आहे.सदर महिती जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसिलदार, मलकापूर यांचेकडून अर्ज व त्यासोबतची कागदपत्र यांची माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागणी केली असता. अर्जदार नम्रता यांनी खोटे हमीपत्र तयार करून त्यात खोटी माहिती देऊन शासनाची फसवणुक केल्याबाबतची व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला असल्याचे दिसले. नम्रता यांचे सदरचे कृत्य दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा असून त्याबाबत त्यांच्या विरूध्द मलकापूर पो. स्टे. ला फिर्याद श्री. राजेंद्र काजळे यांनी दिली आहे.