*छत्रपती शिवाजी महाराज* *महाराजस्व समाधान शिबिर* *उत्साहात संपन्न* *उपविभागीय अधिकारी डॉ.* *रामेश्वर पुरी यांचा विशेष* *सन्मान

*छत्रपती शिवाजी महाराज* *महाराजस्व समाधान शिबिर* *उत्साहात संपन्न* 
 *उपविभागीय अधिकारी डॉ.* *रामेश्वर पुरी यांचा विशेष* *सन्मान* 
 *खामगाव:- ०५* (उमाका) छत्रपती शिवाजी महाराज महाराजास्व समाधान शिबिर महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत आयोजित महसूल सप्ताह अंतर्गत दिनांक ५ ऑगस्ट २०२५ रोजी खामगाव तालुक्यातील वर्णा गावात महाराणा प्रताप सभागृह येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर तसेच ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वर्णा गावच्या सरपंच  स्वाती उमेश इंगळे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी व नायब तहसिलदार  निखिल पाटील उपस्थित होते.

सदर शिबिरात महसूल विभागामार्फत सातबारा, आठ अ फेरफाराचे एकूण ३८ दाखले वितरित करण्यात आले. तसेच संजय गांधी व श्रावण बाळ योजनेचे एकूण २२ आदेश लाभार्थ्यांना प्रदान करण्यात आले. संजय गांधी योजनेंतर्गत ७ नवीन अर्ज स्वीकारण्यात आले. आधार कार्ड अद्ययावतीकरण व ई-केवायसी सेवा अंतर्गत ३१ लाभार्थ्यांना सेवा पुरविण्यात आली. जिवंत ७/१२ प्रमाणपत्रासाठी ८ अर्ज स्वीकृत करण्यात आले, तर उत्पन्न प्रमाणपत्र व इतर दाखले यासाठी १६ लाभार्थ्यांना सेवा दिली गेली.

कृषी विभागामार्फत काळेगाव येथील दोन शेतकऱ्यांना कांदा चाळ मंजुरी आदेश देण्यात आले, सहा शेतकऱ्यांना फळबाग लागवड मंजुरी पत्र तर वर्णा येथील चार शेतकऱ्यांना ठिबक सिंचन योजना मंजूर करण्यात आली. हुमणी अळी नियंत्रणाबाबत ग्राम कृषी अधिकारी सौ. जाधव यांनी लाभार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी ग्राम महसूल अधिकारी अनिल शिंदे काळेगाव यांनी यशस्वीरित्या पार पाडली, तर प्रास्ताविक ग्राम महसूल अधिकारी कुमारी स्वाती वाडेकर यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने लाभार्थी व ग्रामस्थांनी उपस्थिती लावली.

या कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांना महसुली वर्ष २०२४-२५ मधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा मार्फत देण्यात आलेल्या ‘उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी पुरस्कार’ प्राप्त झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने नागरिक सत्कार करण्यात आला. तसेच ‘राजीव गांधी गतिमानता पुरस्कार’ प्राप्त नायब तहसिलदार  निखिल पाटील यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांमध्ये मंडळ अधिकारी  रामदास चौधरी, पोलीस पाटील  सुरेंद्र प्रतापसिंग इंगळे, तंटामुक्ती अध्यक्ष चंदू इंगळे, तालुका अध्यक्ष महादेव अवचार, माजी उपसभापती भगवानसिंग सोलंके, कृषी तंत्र अधिकारी  विजय कंदील यांच्यासह महसूल व कृषी विभागातील विविध अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्राम महसूल अधिकारी  पी. बी. वंजारी ढोरपगाव,  ज्ञानेश्वर नागरे भालेगाव,  अनिल शिंदे काळेगाव, कुमारी स्नेहा वाडेकर हिवरा बुद्रुक, कुमारी पल्लवी खंडारे नांद्री, व ग्राम महसूल अधिकारी टेकाळे मॅडम वर्णा यांचे योगदान उल्लेखनीय ठरले.

महसूल विभागाच्या योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहचविण्याचा उद्देश या शिबिराच्या माध्यमातून साध्य झाला.

Comments

Popular Posts

*नम्रता गणेशराव धोत्रे कौलखेड अकोला या लाडक्या बहिणी विरुद्ध मलकापूर पो. स्टे. ला महाराष्ट्रातून पहिली तक्रार दाखल. मलकापूर (दिव्यांग शक्ती प्रतिनिध)ी*नुकताच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहिर केली मात्र अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसत आहे.अर्जदार महीला नम्रता यांनी प्रथमतः दि. ३०-०८-२०२४ रोजी योजनेचा अर्ज केला व अंतिमतः दि. ०२-०९-२०२४ रोजी त्यांचा शासनाद्वारे अर्ज मंजुर करण्यात आला आहे व त्याप्रमाणे प्रस्तुत अर्जदार हिस दरमहा १५००/- रूपये प्रमाणे निधी तिचे खात्यात प्राप्त झाला आहे. खरे म्हणजे अर्जदार नम्रता हिने खोटे व बनावटी हमीपत्राचा दस्त तयार करून त्यात खोटी व बनावटी माहित दिली व तो खरा आहे असे भासवुना जाणीव पूर्वक सदर दस्त संबंधीत अधिकाऱ्यांकडे सादर केला.त्याद्वारे शासनाची फसवणुक करून स्वतःचा गैरहक्की आर्थिक लाभ प्राप्त केला आहे.याबाबत सविस्तर असे की सदर योजने करीता पात्रता निकष असे की,ज्या महिलेच्या एकत्रीत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० /- रूपयांपेक्षा अधिक आहे, ज्या कुटूंबातील सदस्य आयकर दाता आहे, ज्या कुटूंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी म्हणुन सेवानिवृत्ती नंतर सेवानिवृत्ती वेतन घेतात, ज्यांच्या कुटूंबात चारचाकी वाहन आहे किंवा ज्या कुटूंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरत नाही. पात्र अर्जदार लाडक्या बहिणीला तसे हमीपत्र सुद्धा द्यावे लागते.असे निकष असताना अर्जदार लाडकी बहिण नम्रता हिने तिचे लग्नानंतरचे नावाने अर्ज केला आहे. सदर अर्जदार हिचे सासर कडील एकत्र कुटूंबाचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त आहे, सदर अर्जदार हिचे सासरे सेवानिवृत्ती वेतन घेतात, त्यांचे पती दिपक चांभारे पाटील नावाने एकुण ६ एकर शेतजमिन आहे. म्हणजेच निकषाप्रमाणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे. असे असतांना देखील व सदरची बाब पुर्णतः माहिती व जाणीवेतील असतांना देखील प्रस्तुत अर्जदार हिने खोटे हमीपत्र निष्पादीत केले व सदर हमीपत्र व त्यातील मजकुर खोटा आहे याची माहिती व जाणीव असतांना गैरहक्की आर्थिक लाभाचे दुषित हेतुने त्याचा वापर करून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा आर्थिक लाभ प्राप्त करून घेतला आहे.प्रस्तुत अर्जदार ही तिचे पतीपासून गेल्या पाच ते सहा वर्षापासुन विभक्त राहत आहे. त्यांचेदरम्यान अकोला येथील न्यायालयात खावटीकरीता न्यायालयीन प्रकरणे सुरू असून सदर अर्जदार हिस तिचे पतीपासून एकत्रीतरित्या दरमहा ५०,००० /- रूपये खावटी मंजुर झाल्याची देखील तक्रारीत नमूद आहे. सबब निकषास पात्र नसतांना देखील खोटी माहिती देवून व खरी माहिती लपवून सदर अर्जदार हिने योजनेचा लाभ मिळविला आहे. सदर अर्जदार हिचे माहेरचे नांव नम्रता गणेश धोत्रे आहे व सदर धोत्रे परिवारात चारचाकी वाहन आहे व त्या परिवाराचे उत्पन्न देखील अडीच लाखापेक्षा जास्त आहे. असे असतांना स्वतःचे वैवाहिकस्थितीबाबत खोटी माहिती प्रस्तुत अर्जदाराने दिली असून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला आहे.सदर महिती जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसिलदार, मलकापूर यांचेकडून अर्ज व त्यासोबतची कागदपत्र यांची माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागणी केली असता. अर्जदार नम्रता यांनी खोटे हमीपत्र तयार करून त्यात खोटी माहिती देऊन शासनाची फसवणुक केल्याबाबतची व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला असल्याचे दिसले. नम्रता यांचे सदरचे कृत्य दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा असून त्याबाबत त्यांच्या विरूध्द मलकापूर पो. स्टे. ला फिर्याद श्री. राजेंद्र काजळे यांनी दिली आहे.