*नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे शेगांव येथे जल्लोषात स्वागत ; केंद्रीय आयुष मंत्री ना.प्रतापराव जाधव यांनी हिरवी झेंडी दाखवून केले मार्गस्थ*

*नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे शेगांव येथे जल्लोषात स्वागत ; केंद्रीय आयुष मंत्री ना.प्रतापराव जाधव यांनी हिरवी झेंडी दाखवून केले मार्गस्थ*
बुलढाणा,दि.१० (जिमाका) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे शेगांव येथे केंद्रीय आयुष मंत्री ना. प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी ना. प्रतापराव जाधव यांनी या एक्स्प्रेसला हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ केले. 

या वंदे भारत एक्स्प्रेसच्या स्वागतानिमित्त शेगाव रेल्वे स्थानक परिसरात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला केंद्रीय आयुष मंत्री ना.प्रतापराव जाधव आणि आमदार डॅा. संजय कुटे हे प्रामुख्याने उपस्थित होत.

यावेळी ना. प्रतापराव जाधव मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, “शेगाव नगरी ही संत श्री गजानन महाराजांच्या वास्तव्यांने पावन झालेली नगरी आहे. देशविदेशातून भाविक शेगाव येथे संत श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे शेगाव येथे वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेचा थांबा मिळविण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा केला. त्यांनी ताबडतोब कार्यवाही करुन शेगावचा थांबा समाविष्ट केला. आज त्याचे उद्घाटन होत आहे. याशिवाय गेल्या पंधरा वर्षांमध्ये शेगाव रेल्वे स्थानकात सोयीसुविधा, विकासकामे झाली व होत आहेत. पूर्वीपेक्षा या रेल्वे स्थानकाचा कायापालट होतांना दिसत आहे. येणाऱ्या काळामध्ये आणखी विकासाची कामे केली जाणार आहेत. इतर रेल्वेचा थांबा देखील मिळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत,” असे  केंद्रीय आयुष मंत्री ना. प्रतापराव जाधव यावेळी म्हणाले.

आमदार डॅा. संजय कुटे मनोगत व्यक्त करतांना म्हणाले, “जगात सर्वाधिक रेल्वे प्रकल्प असलेल्या भारत देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या क्रमांकावर आणले आहे. आज सर्वांना आतुरता असलेल्या नागपूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेचे उद्घाटन झाले आहे. शेगाव ही संत नगरी व अध्यात्मिक नगरी आहे. या नगरीमध्ये मुंबई, पुणेवरुन अनेक भाविक मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळे वंदे भारत एक्स्प्रेसचा शेगांव येथे थांबा आवश्यक होता. यासाठी प्रयत्न करणारे केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव, रेल्वे प्रशासनातील अधिकारी यांचे आभार मानतो. भविष्यात शेगावच्या विकासामध्ये योगदान देणारे काम होत आहेत. आज जे रेल्वेचा कायापालट होत आहे, त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हिजन महत्त्वाचे ठरत आहे,” असे ते म्हणाले.

वंदे भारत एक्स्प्रेस विषयी …
अजनी (नागपूर) ते पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा अपडाऊन गाडी क्रमांक २६१०१ व २०१०२ असून ही एक्सप्रेस सकाळी ९.३० वाजता  अजनी (नागपूर) येथून सुटणार असून रात्री ९.३० वाजता पुणे येथे पोहोचेल. आणि पुणे येथून सकाळी ६.२५ वाजता निघून संध्याकाळी ६.२५ वाजता अजनी येथे पोहोचेल. या रेल्वेचा वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहिल्यानगर, दौंड कार्ड लाईन व पुणे या रेल्वे स्थानकांवर थांबा राहणार आहे, अशी माहिती या कार्यक्रमात देण्यात आली.

Comments

Popular Posts

*नम्रता गणेशराव धोत्रे कौलखेड अकोला या लाडक्या बहिणी विरुद्ध मलकापूर पो. स्टे. ला महाराष्ट्रातून पहिली तक्रार दाखल. मलकापूर (दिव्यांग शक्ती प्रतिनिध)ी*नुकताच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहिर केली मात्र अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसत आहे.अर्जदार महीला नम्रता यांनी प्रथमतः दि. ३०-०८-२०२४ रोजी योजनेचा अर्ज केला व अंतिमतः दि. ०२-०९-२०२४ रोजी त्यांचा शासनाद्वारे अर्ज मंजुर करण्यात आला आहे व त्याप्रमाणे प्रस्तुत अर्जदार हिस दरमहा १५००/- रूपये प्रमाणे निधी तिचे खात्यात प्राप्त झाला आहे. खरे म्हणजे अर्जदार नम्रता हिने खोटे व बनावटी हमीपत्राचा दस्त तयार करून त्यात खोटी व बनावटी माहित दिली व तो खरा आहे असे भासवुना जाणीव पूर्वक सदर दस्त संबंधीत अधिकाऱ्यांकडे सादर केला.त्याद्वारे शासनाची फसवणुक करून स्वतःचा गैरहक्की आर्थिक लाभ प्राप्त केला आहे.याबाबत सविस्तर असे की सदर योजने करीता पात्रता निकष असे की,ज्या महिलेच्या एकत्रीत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० /- रूपयांपेक्षा अधिक आहे, ज्या कुटूंबातील सदस्य आयकर दाता आहे, ज्या कुटूंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी म्हणुन सेवानिवृत्ती नंतर सेवानिवृत्ती वेतन घेतात, ज्यांच्या कुटूंबात चारचाकी वाहन आहे किंवा ज्या कुटूंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरत नाही. पात्र अर्जदार लाडक्या बहिणीला तसे हमीपत्र सुद्धा द्यावे लागते.असे निकष असताना अर्जदार लाडकी बहिण नम्रता हिने तिचे लग्नानंतरचे नावाने अर्ज केला आहे. सदर अर्जदार हिचे सासर कडील एकत्र कुटूंबाचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त आहे, सदर अर्जदार हिचे सासरे सेवानिवृत्ती वेतन घेतात, त्यांचे पती दिपक चांभारे पाटील नावाने एकुण ६ एकर शेतजमिन आहे. म्हणजेच निकषाप्रमाणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे. असे असतांना देखील व सदरची बाब पुर्णतः माहिती व जाणीवेतील असतांना देखील प्रस्तुत अर्जदार हिने खोटे हमीपत्र निष्पादीत केले व सदर हमीपत्र व त्यातील मजकुर खोटा आहे याची माहिती व जाणीव असतांना गैरहक्की आर्थिक लाभाचे दुषित हेतुने त्याचा वापर करून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा आर्थिक लाभ प्राप्त करून घेतला आहे.प्रस्तुत अर्जदार ही तिचे पतीपासून गेल्या पाच ते सहा वर्षापासुन विभक्त राहत आहे. त्यांचेदरम्यान अकोला येथील न्यायालयात खावटीकरीता न्यायालयीन प्रकरणे सुरू असून सदर अर्जदार हिस तिचे पतीपासून एकत्रीतरित्या दरमहा ५०,००० /- रूपये खावटी मंजुर झाल्याची देखील तक्रारीत नमूद आहे. सबब निकषास पात्र नसतांना देखील खोटी माहिती देवून व खरी माहिती लपवून सदर अर्जदार हिने योजनेचा लाभ मिळविला आहे. सदर अर्जदार हिचे माहेरचे नांव नम्रता गणेश धोत्रे आहे व सदर धोत्रे परिवारात चारचाकी वाहन आहे व त्या परिवाराचे उत्पन्न देखील अडीच लाखापेक्षा जास्त आहे. असे असतांना स्वतःचे वैवाहिकस्थितीबाबत खोटी माहिती प्रस्तुत अर्जदाराने दिली असून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला आहे.सदर महिती जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसिलदार, मलकापूर यांचेकडून अर्ज व त्यासोबतची कागदपत्र यांची माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागणी केली असता. अर्जदार नम्रता यांनी खोटे हमीपत्र तयार करून त्यात खोटी माहिती देऊन शासनाची फसवणुक केल्याबाबतची व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला असल्याचे दिसले. नम्रता यांचे सदरचे कृत्य दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा असून त्याबाबत त्यांच्या विरूध्द मलकापूर पो. स्टे. ला फिर्याद श्री. राजेंद्र काजळे यांनी दिली आहे.