नांदुरा शहरातील इतिहासाची साक्ष पोळा वेस नष्ट होण्याच्या मार्गावर लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देतील काय सामाजिक कार्यकर्ते सुरेश दादा पेठकर यांची मागणी

नांदुरा शहरातील इतिहासाची साक्ष पोळा वेस नष्ट होण्याच्या मार्गावर लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देतील काय 
सामाजिक कार्यकर्ते 
सुरेश दादा पेठकर यांची मागणी 

नांदुरा 

सुरेश खानचंदानी 
शहरातील इतिहासाची साक्ष जुना वारसा शहरातील प्रमुख मिरवणूक मार्गावरील मुस्लिम धर्म बांधवांचे तसेच हिंदू धर्मीय बांधवांचे प्रमुख देवस्थाने भावसार देवी मंदिर व जामा मजीद या मार्गावर जवळपास 1950 च्या दरम्यान बांधण्यात आलेल्या नांदुरा शहरातील  पवित्र ज्ञानगंगा नदीपात्रालगत ऐतिहासिक परकोट भिंतीसह भव्य वेस बांधण्यात आली तत्कालीन लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष स्वर्गीय सेठ नारायण भाईजी गोरले यांच्या कार्यकालात बांधण्यात आली या ठिकाणी नांदुरा शहरातील सर्वात मोठा हिंदू धर्मीय बांधवांचा बैलपोळा हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत होता परंतु सध्याच्या परिस्थितीत वर्तमान युगात अनेक तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याने बैलांची संख्या कमी झाल्यामुळे त्या ठिकाणी पोळा भरण्यात येत नाही आज नांदुरा शहराच्या वैभवात घालणारी पोळावेस ही जीर्ण अवस्थेत भगनावस्थेत नष्ट होण्याच्या मार्गावरआहे 

नांदुरा नगरपालिकेच्या स्थानिक लोकप्रतिनिधी नगरसेवक नगराध्यक्ष यांनी एक दमडीही खर्च केली नाही आज नांदुरा शहरातील या मार्गावरून सर्व धर्मीय मोठ्या थाटात या भागातून जातात परंतु नगरपालिकेच्या प्रशासन अधिकारी किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी ने शहरात कोट्यावधीचे विकास कामाचे निधी प्राप्त केलेले आहेत परंतु या भागात कोणत्याही प्रकारची एक दमडीही लोकप्रतिनिधी खर्च करू शकले नाहीत याची खंत व खेद नांदुरा शहरातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये व रहिवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या विषयी जनमानसात तीव्र स्वरूपाचा रोष व आक्रोश निर्माण झालेला आहे याबाबत नांदुरा शहरातील सामाजिक क्षेत्रातील चळवळीतील कार्यकर्ते व ज्येष्ठ पत्रकार सुरेशदादा पेठकर यांनी बरेच वेळा लोकप्रतिथी व नगरपालिकेच्या प्रशासन अधिकाऱ्याच्या निदर्शनास नांदुरा शहरातील ह्या ऐतिहासिक पोळावेस वास्तू बाबत बरेच वेळा विकास कामाबाबत जीर्णोदराबाबत निधी उपलब्ध करून देण्याबाबत विनंती केल्या परंतु स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकारी नगर परिषद नांदुरा यांनी हेतू पुरस्कार जाणीवपूर्वक या मागणीकडे दुर्लक्ष करण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे याचा नांदुरा शहरातील सर्वसामान्य तीव्र स्वरूपाची नाराजी पहावयास मिळत आहे याची दखल घेणे क्रम प्राप्त आहे व याचा जीर्णोद्धार विकास होणे नांदोरा शहराच्या वैभव याची साक्ष असलेली पोळावेस नष्ट होण्यापासून वाचेल असे सामाजिक कार्यकर्ते सुरेश दादा पेठकर यांनी प्रत्यक्ष स्थळ निरीक्षण करून त्या भागातील रहिवासी नागरिकांच्या भावना समजावून घेतल्या

Comments

Popular Posts

*नम्रता गणेशराव धोत्रे कौलखेड अकोला या लाडक्या बहिणी विरुद्ध मलकापूर पो. स्टे. ला महाराष्ट्रातून पहिली तक्रार दाखल. मलकापूर (दिव्यांग शक्ती प्रतिनिध)ी*नुकताच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहिर केली मात्र अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसत आहे.अर्जदार महीला नम्रता यांनी प्रथमतः दि. ३०-०८-२०२४ रोजी योजनेचा अर्ज केला व अंतिमतः दि. ०२-०९-२०२४ रोजी त्यांचा शासनाद्वारे अर्ज मंजुर करण्यात आला आहे व त्याप्रमाणे प्रस्तुत अर्जदार हिस दरमहा १५००/- रूपये प्रमाणे निधी तिचे खात्यात प्राप्त झाला आहे. खरे म्हणजे अर्जदार नम्रता हिने खोटे व बनावटी हमीपत्राचा दस्त तयार करून त्यात खोटी व बनावटी माहित दिली व तो खरा आहे असे भासवुना जाणीव पूर्वक सदर दस्त संबंधीत अधिकाऱ्यांकडे सादर केला.त्याद्वारे शासनाची फसवणुक करून स्वतःचा गैरहक्की आर्थिक लाभ प्राप्त केला आहे.याबाबत सविस्तर असे की सदर योजने करीता पात्रता निकष असे की,ज्या महिलेच्या एकत्रीत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० /- रूपयांपेक्षा अधिक आहे, ज्या कुटूंबातील सदस्य आयकर दाता आहे, ज्या कुटूंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी म्हणुन सेवानिवृत्ती नंतर सेवानिवृत्ती वेतन घेतात, ज्यांच्या कुटूंबात चारचाकी वाहन आहे किंवा ज्या कुटूंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरत नाही. पात्र अर्जदार लाडक्या बहिणीला तसे हमीपत्र सुद्धा द्यावे लागते.असे निकष असताना अर्जदार लाडकी बहिण नम्रता हिने तिचे लग्नानंतरचे नावाने अर्ज केला आहे. सदर अर्जदार हिचे सासर कडील एकत्र कुटूंबाचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त आहे, सदर अर्जदार हिचे सासरे सेवानिवृत्ती वेतन घेतात, त्यांचे पती दिपक चांभारे पाटील नावाने एकुण ६ एकर शेतजमिन आहे. म्हणजेच निकषाप्रमाणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे. असे असतांना देखील व सदरची बाब पुर्णतः माहिती व जाणीवेतील असतांना देखील प्रस्तुत अर्जदार हिने खोटे हमीपत्र निष्पादीत केले व सदर हमीपत्र व त्यातील मजकुर खोटा आहे याची माहिती व जाणीव असतांना गैरहक्की आर्थिक लाभाचे दुषित हेतुने त्याचा वापर करून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा आर्थिक लाभ प्राप्त करून घेतला आहे.प्रस्तुत अर्जदार ही तिचे पतीपासून गेल्या पाच ते सहा वर्षापासुन विभक्त राहत आहे. त्यांचेदरम्यान अकोला येथील न्यायालयात खावटीकरीता न्यायालयीन प्रकरणे सुरू असून सदर अर्जदार हिस तिचे पतीपासून एकत्रीतरित्या दरमहा ५०,००० /- रूपये खावटी मंजुर झाल्याची देखील तक्रारीत नमूद आहे. सबब निकषास पात्र नसतांना देखील खोटी माहिती देवून व खरी माहिती लपवून सदर अर्जदार हिने योजनेचा लाभ मिळविला आहे. सदर अर्जदार हिचे माहेरचे नांव नम्रता गणेश धोत्रे आहे व सदर धोत्रे परिवारात चारचाकी वाहन आहे व त्या परिवाराचे उत्पन्न देखील अडीच लाखापेक्षा जास्त आहे. असे असतांना स्वतःचे वैवाहिकस्थितीबाबत खोटी माहिती प्रस्तुत अर्जदाराने दिली असून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला आहे.सदर महिती जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसिलदार, मलकापूर यांचेकडून अर्ज व त्यासोबतची कागदपत्र यांची माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागणी केली असता. अर्जदार नम्रता यांनी खोटे हमीपत्र तयार करून त्यात खोटी माहिती देऊन शासनाची फसवणुक केल्याबाबतची व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला असल्याचे दिसले. नम्रता यांचे सदरचे कृत्य दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा असून त्याबाबत त्यांच्या विरूध्द मलकापूर पो. स्टे. ला फिर्याद श्री. राजेंद्र काजळे यांनी दिली आहे.