शासना कडून पगार घेणारे शिक्षकांचे शिकवणी क्लासेस बंद करा अन्यथा निलंबीत करा.......सुरज यादव



शासना कडून पगार घेणारे शिक्षकांचे शिकवणी क्लासेस बंद करा अन्यथा निलंबीत करा.......सुरज यादव

खामगांव : 
(का प्र)
अ. भा. ग्रा. पत्रकार संघ द्वारा आरोग्य समिती विदर्भ आरोग्य प्रमुख सुरज यादव यांनी दिनांक 30 जुलै 2025 रोजी दुपारी 3 वाजता अश्या आश्याचे निवेदन गट शिक्षण अधिकारी यांच्या मार्फत शिक्षण अधिकारी माध्यमिक शिक्षण केंद्र  बुलढाणा यांना पत्राद्वारे सादर करून निदर्शनास आणून दिलेले आहे की मागील काही आठवड्या पूर्वी वसाडी, नांदुरा तालुक्यातील दहावीच्या एका विद्यार्थ्याने शाळेतील शिक्षकाच्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केलेली आहे. हे खूप गंभीर बाब आहे. या प्रकरणाचे मागचे मुळ कारण काय हे पोलीस तपासात समोर येऊ शकते पण अशी परिस्थिती कोणत्याही दुसऱ्या विद्यार्थ्यावर येऊ नये म्हणून सर्व शाळेतील शिक्षकांना सर्व विद्यार्थ्यांशी सौजन्याने वागण्याची आणि योग्य वागणूक देण्याची विनंती करावी. काही शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांच्या शिकवणी वर्गात (tuition class) मध्ये सामील होण्यासाठी त्रास देतात. अश्या प्रकारची काही तक्रारी आम्हाला मिळाल्या आहेत. शासनासकडून पगार मिळवणारे शिक्षक शिकवणी वर्ग चालवत आहेत हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. शासन मान्यता प्राप्त शाळांमधील काही कर्मचारी असलेले काही शिक्षक / शिक्षिका त्यांच्या पत्नी / पतीच्या नावाने शिकवणी वर्ग चालवत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. स्वयंअर्थसहाय्य शाळांमधील (private English medium school) काही शिक्षक विद्यार्थ्यांना सतत त्रास देत आहेत आणि त्यांना त्यांच्या शिकवणी वर्गात सामील होण्यास भाग पाडत आहेत. जर कोणताही विद्यार्थी त्यांच्या शिकवणी वर्गात सामील झाला नाही तर ते त्यांना आंतरिक गुण (internal marks) देणार नाही याचा धाक दाखवून आणि अपशब्द बोलून अपमानित करून त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास देतात हे देखील आमच्या निदर्शनास आले आहे. हे अत्यंत गंभीर बाब आहे. शासनाकडून - शाळा व्यवस्थापनाकडून चांगली पगार मिळत असल्यावरही  बेकायदेशीर शिकवणी वर्ग (tuition class) चालवून सदर लोक शासनाची आणि व्यवस्थापनाची फसवणूक करत आहे आणि पालकांचा आर्थिक शोषण ही करत आहे. म्हणून आपणांस विनंती की शिकवणी वर्ग चालवणाऱ्या शाळेतील शिक्षकांवर कठोर कारवाई करा, त्यांचे शिकवणी वर्ग पूर्णपणे बंद करावे अन्यथा त्यांना त्यांच्या सेवेतून निलंबित करावे जेणेकरून हजारों विद्यार्थ्यांना होणाऱ्या मानसिक व शारीरिक त्रासापासून वाचवता येईल. कृपया या पत्राची गंभीर दखल घ्यावी आणि आवश्यक ती कारवाई करावी अन्यथा बुलढाणा येथील जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांसमोर लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्यात येईल ज्याची सर्वस्व जबाबदारी शासनाची राहील. असा ईशारा सुद्धा या निवेदनाद्वारा देण्यात आलेला आहे या निवेदनावर सुरज यादव , राजु घाटे , रुपेश कलंत्री , सिद्धेश्वर निर्मळ , प्रदीप शमी , सुमित शर्मा आदि पत्रकार लोकांच्या स्वाक्षऱ्या आहे अशी माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे रुपेश कलंत्री यांनी दिली 


Comments

Popular Posts

*नम्रता गणेशराव धोत्रे कौलखेड अकोला या लाडक्या बहिणी विरुद्ध मलकापूर पो. स्टे. ला महाराष्ट्रातून पहिली तक्रार दाखल. मलकापूर (दिव्यांग शक्ती प्रतिनिध)ी*नुकताच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहिर केली मात्र अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसत आहे.अर्जदार महीला नम्रता यांनी प्रथमतः दि. ३०-०८-२०२४ रोजी योजनेचा अर्ज केला व अंतिमतः दि. ०२-०९-२०२४ रोजी त्यांचा शासनाद्वारे अर्ज मंजुर करण्यात आला आहे व त्याप्रमाणे प्रस्तुत अर्जदार हिस दरमहा १५००/- रूपये प्रमाणे निधी तिचे खात्यात प्राप्त झाला आहे. खरे म्हणजे अर्जदार नम्रता हिने खोटे व बनावटी हमीपत्राचा दस्त तयार करून त्यात खोटी व बनावटी माहित दिली व तो खरा आहे असे भासवुना जाणीव पूर्वक सदर दस्त संबंधीत अधिकाऱ्यांकडे सादर केला.त्याद्वारे शासनाची फसवणुक करून स्वतःचा गैरहक्की आर्थिक लाभ प्राप्त केला आहे.याबाबत सविस्तर असे की सदर योजने करीता पात्रता निकष असे की,ज्या महिलेच्या एकत्रीत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० /- रूपयांपेक्षा अधिक आहे, ज्या कुटूंबातील सदस्य आयकर दाता आहे, ज्या कुटूंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी म्हणुन सेवानिवृत्ती नंतर सेवानिवृत्ती वेतन घेतात, ज्यांच्या कुटूंबात चारचाकी वाहन आहे किंवा ज्या कुटूंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरत नाही. पात्र अर्जदार लाडक्या बहिणीला तसे हमीपत्र सुद्धा द्यावे लागते.असे निकष असताना अर्जदार लाडकी बहिण नम्रता हिने तिचे लग्नानंतरचे नावाने अर्ज केला आहे. सदर अर्जदार हिचे सासर कडील एकत्र कुटूंबाचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त आहे, सदर अर्जदार हिचे सासरे सेवानिवृत्ती वेतन घेतात, त्यांचे पती दिपक चांभारे पाटील नावाने एकुण ६ एकर शेतजमिन आहे. म्हणजेच निकषाप्रमाणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे. असे असतांना देखील व सदरची बाब पुर्णतः माहिती व जाणीवेतील असतांना देखील प्रस्तुत अर्जदार हिने खोटे हमीपत्र निष्पादीत केले व सदर हमीपत्र व त्यातील मजकुर खोटा आहे याची माहिती व जाणीव असतांना गैरहक्की आर्थिक लाभाचे दुषित हेतुने त्याचा वापर करून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा आर्थिक लाभ प्राप्त करून घेतला आहे.प्रस्तुत अर्जदार ही तिचे पतीपासून गेल्या पाच ते सहा वर्षापासुन विभक्त राहत आहे. त्यांचेदरम्यान अकोला येथील न्यायालयात खावटीकरीता न्यायालयीन प्रकरणे सुरू असून सदर अर्जदार हिस तिचे पतीपासून एकत्रीतरित्या दरमहा ५०,००० /- रूपये खावटी मंजुर झाल्याची देखील तक्रारीत नमूद आहे. सबब निकषास पात्र नसतांना देखील खोटी माहिती देवून व खरी माहिती लपवून सदर अर्जदार हिने योजनेचा लाभ मिळविला आहे. सदर अर्जदार हिचे माहेरचे नांव नम्रता गणेश धोत्रे आहे व सदर धोत्रे परिवारात चारचाकी वाहन आहे व त्या परिवाराचे उत्पन्न देखील अडीच लाखापेक्षा जास्त आहे. असे असतांना स्वतःचे वैवाहिकस्थितीबाबत खोटी माहिती प्रस्तुत अर्जदाराने दिली असून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला आहे.सदर महिती जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसिलदार, मलकापूर यांचेकडून अर्ज व त्यासोबतची कागदपत्र यांची माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागणी केली असता. अर्जदार नम्रता यांनी खोटे हमीपत्र तयार करून त्यात खोटी माहिती देऊन शासनाची फसवणुक केल्याबाबतची व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला असल्याचे दिसले. नम्रता यांचे सदरचे कृत्य दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा असून त्याबाबत त्यांच्या विरूध्द मलकापूर पो. स्टे. ला फिर्याद श्री. राजेंद्र काजळे यांनी दिली आहे.