भीमातीर ते तापीतीर आदिशक्तीचा परतीचा प्रवास.रिमझिम पावसांच्या सरीत ज्ञानोबा तुकोबाचा गजर..बुलढाणा, राजुर भक्त गणांच्या वतीने भव्य स्वागत, महाप्रसादाचे आयोजन



भीमातीर ते तापीतीर आदिशक्तीचा परतीचा प्रवास.
रिमझिम पावसांच्या सरीत ज्ञानोबा तुकोबाचा गजर..
बुलढाणा, राजुर भक्त गणांच्या वतीने भव्य स्वागत, महाप्रसादाचे आयोजन.
बुलढाणा:
भेटी लागे जीवा पांढरीश पांडुरंग परमात्म्याची आषाढी वारी पूर्ण करून आदिशक्ती मुक्ताई माता आपल्या मूळ स्थानी मुक्ताईनगर साठी परतीच्या प्रवासाला निघाली आहे. भीमातीर ते तापीतीर दिंडी सोहळा प्रमुख वारकरी भूषण हभप रविंद्र महाराज हरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत 26 जुलैला बुलढाण्यात आदिशक्तीचे आगमन झाले. यावेळी मुक्ताईच्या पालखी सोहळ्याचे भव्य स्वागत बुलढाणा राजुर येथील आदिशक्ती भक्तगण,श्री सद्गुरु विष्णूमाऊली प्रतिष्ठान,आझाद हिंद शेतकरी संघटना,ग्राम स्वराज्य समिती,राष्ट्रीय बजरंग दल यांच्या वतीने करण्यात आले.
बुलढाण्यावरून मोताळ्याकडे आदिशक्ती पालखी सोहळा प्रस्थान करीत असताना राजुर घाटातील संकट मोचन हनुमंताच्या मंदिरात पालखीचा दुपारचा विसावा आणि महाप्रसादाची सेवा दरवर्षीप्रमाणे श्री सद्गुरु विष्णूमाऊली प्रतिष्ठान व रोठे पाटील परिवार राजुर बुलढाणा यांच्याकडे नियोजित प्रसाद स्वरूप देण्यात आली.
ज्ञानोबा माऊली तुकाराम च्या गजरात आदिशक्ती पालखी सोहळा रिमझिम पावसामध्ये बुलढाण्यात दाखल झाला असताना पावसांच्या सरीचा आनंद घेत मुक्ताई भक्तगणांनी पालखी सोहळ्यात पायी चालत आदिशक्तीला घाटातील विसाव्यापर्यंत निरोप दिला. बुलढाणा राजुर येथील आदिशक्तीचे भक्तगण, श्री सद्गुरु विष्णू माऊली प्रतिष्ठान, ग्राम स्वराज्य समिती, आझाद हिंद शेतकरी संघटना यांच्या सेवाभावातून आदिशक्तीच्या दिंडी सोहळ्यातील वारकरी आणि भक्तगणांना महाप्रसादाचा विसावा संकटमोचन हनुमंताच्या प्रांगणात देण्यात आला. त्यानंतर आदिशक्तीने वाघजाळ फाटा येथील विठ्ठल रुक्मिणी आश्रमात मुक्कामी विसाव्यासाठी प्रस्थान केले.

Comments

Popular Posts

*नम्रता गणेशराव धोत्रे कौलखेड अकोला या लाडक्या बहिणी विरुद्ध मलकापूर पो. स्टे. ला महाराष्ट्रातून पहिली तक्रार दाखल. मलकापूर (दिव्यांग शक्ती प्रतिनिध)ी*नुकताच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहिर केली मात्र अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसत आहे.अर्जदार महीला नम्रता यांनी प्रथमतः दि. ३०-०८-२०२४ रोजी योजनेचा अर्ज केला व अंतिमतः दि. ०२-०९-२०२४ रोजी त्यांचा शासनाद्वारे अर्ज मंजुर करण्यात आला आहे व त्याप्रमाणे प्रस्तुत अर्जदार हिस दरमहा १५००/- रूपये प्रमाणे निधी तिचे खात्यात प्राप्त झाला आहे. खरे म्हणजे अर्जदार नम्रता हिने खोटे व बनावटी हमीपत्राचा दस्त तयार करून त्यात खोटी व बनावटी माहित दिली व तो खरा आहे असे भासवुना जाणीव पूर्वक सदर दस्त संबंधीत अधिकाऱ्यांकडे सादर केला.त्याद्वारे शासनाची फसवणुक करून स्वतःचा गैरहक्की आर्थिक लाभ प्राप्त केला आहे.याबाबत सविस्तर असे की सदर योजने करीता पात्रता निकष असे की,ज्या महिलेच्या एकत्रीत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० /- रूपयांपेक्षा अधिक आहे, ज्या कुटूंबातील सदस्य आयकर दाता आहे, ज्या कुटूंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी म्हणुन सेवानिवृत्ती नंतर सेवानिवृत्ती वेतन घेतात, ज्यांच्या कुटूंबात चारचाकी वाहन आहे किंवा ज्या कुटूंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरत नाही. पात्र अर्जदार लाडक्या बहिणीला तसे हमीपत्र सुद्धा द्यावे लागते.असे निकष असताना अर्जदार लाडकी बहिण नम्रता हिने तिचे लग्नानंतरचे नावाने अर्ज केला आहे. सदर अर्जदार हिचे सासर कडील एकत्र कुटूंबाचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त आहे, सदर अर्जदार हिचे सासरे सेवानिवृत्ती वेतन घेतात, त्यांचे पती दिपक चांभारे पाटील नावाने एकुण ६ एकर शेतजमिन आहे. म्हणजेच निकषाप्रमाणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे. असे असतांना देखील व सदरची बाब पुर्णतः माहिती व जाणीवेतील असतांना देखील प्रस्तुत अर्जदार हिने खोटे हमीपत्र निष्पादीत केले व सदर हमीपत्र व त्यातील मजकुर खोटा आहे याची माहिती व जाणीव असतांना गैरहक्की आर्थिक लाभाचे दुषित हेतुने त्याचा वापर करून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा आर्थिक लाभ प्राप्त करून घेतला आहे.प्रस्तुत अर्जदार ही तिचे पतीपासून गेल्या पाच ते सहा वर्षापासुन विभक्त राहत आहे. त्यांचेदरम्यान अकोला येथील न्यायालयात खावटीकरीता न्यायालयीन प्रकरणे सुरू असून सदर अर्जदार हिस तिचे पतीपासून एकत्रीतरित्या दरमहा ५०,००० /- रूपये खावटी मंजुर झाल्याची देखील तक्रारीत नमूद आहे. सबब निकषास पात्र नसतांना देखील खोटी माहिती देवून व खरी माहिती लपवून सदर अर्जदार हिने योजनेचा लाभ मिळविला आहे. सदर अर्जदार हिचे माहेरचे नांव नम्रता गणेश धोत्रे आहे व सदर धोत्रे परिवारात चारचाकी वाहन आहे व त्या परिवाराचे उत्पन्न देखील अडीच लाखापेक्षा जास्त आहे. असे असतांना स्वतःचे वैवाहिकस्थितीबाबत खोटी माहिती प्रस्तुत अर्जदाराने दिली असून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला आहे.सदर महिती जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसिलदार, मलकापूर यांचेकडून अर्ज व त्यासोबतची कागदपत्र यांची माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागणी केली असता. अर्जदार नम्रता यांनी खोटे हमीपत्र तयार करून त्यात खोटी माहिती देऊन शासनाची फसवणुक केल्याबाबतची व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला असल्याचे दिसले. नम्रता यांचे सदरचे कृत्य दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा असून त्याबाबत त्यांच्या विरूध्द मलकापूर पो. स्टे. ला फिर्याद श्री. राजेंद्र काजळे यांनी दिली आहे.