*राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग बांधवांचे विविध मागण्यासाठी जन आंदोलन**शासनाने दिव्यांगांचा मागण्या लक्षात घेत तातडीने मार्गी लावाव्या आणि दिव्यांगांना न्याय द्यावा..... अतुल वांदिले प्रदेश सरचिटणीस रा. काँग्रेस पार्टी श. प.*


*राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग बांधवांचे विविध मागण्यासाठी जन आंदोलन*
*शासनाने दिव्यांगांचा मागण्या लक्षात घेत तातडीने मार्गी लावाव्या आणि दिव्यांगांना न्याय द्यावा..... अतुल वांदिले प्रदेश सरचिटणीस रा. काँग्रेस पार्टी श. प.*
हिंगणघाट  : - दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे *प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले* यांच्या मार्गदर्शनाखाली  *दिव्यांग सेल जिल्हाध्यक्ष मारोती महाकाळकर यांच्या नेतृत्वात* आज राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग बांधव यांचे उपविभागीय अधिकारी यांना विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले.
       या निवेदनात शहरात दिव्यांग बांधवांना शासनाद्वारे दिव्यांग महिला आणि पुरुष यांच्यासाठी स्वच्छतागृह द्यावे त्याचबरोबर दिव्यांगाच्या पाल्यांना मोफत शिक्षण देऊन त्यांना नोकरी देण्यात यावी. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये दिव्यांग बांधवांना एक स्वीकृत प्रतिनिधी शासनातर्फे नियुक्त करण्यात यावा. तसेच विधान  परिषदेमध्येही मा. राज्यपाल नियुक्त सदस्यांमध्ये एक दिव्यांगाचा प्रतिनिधी घेण्यात यावा तसेच दिव्यांग निराधारांना दरमहा रुपये दहा हजार संजय गांधी योजनेत पेन्शन देण्यात यावे. शासनाने दिव्यांग नागरिकांना व्यवसायासाठी विनाअठ दोनशे स्क्वेअर फुट ची जागा व्यवसायासाठी देण्यात यावी. तसेच शासनाने दिव्यांग बांधवांना नवीन गॅस कनेक्शन मोफत देण्यात यावे. त्याचबरोबर दिव्यांगांना शहरात व ग्रामीण भागामध्ये घरटॅक्स, पाणीपट्टीमध्ये शंभर टक्के सूट देण्यात यावी. गुंठेवारी मध्ये दिव्यांगांना शंभर टक्के सूट देण्यात यावी. अंतोदय धान्य योजने अंतर्गत दिव्यांगाना धान्य त्वरित देण्यात यावी. अशा विविध मागण्या घेऊन आज राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेलचे पदाधिकारी तसेच सदस्य यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर जनआंदोलन केले.
प्रसंगी प्रदेश सरचिटणीस अतुल  वांदिले, दिव्यांग सेल जिल्हाध्यक्ष मारोती महाकाळकर, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, काँग्रेस तालुकाध्यक्ष गुणवंता कोठेकर, हि. शहराध्यक्ष बालूभाऊ वानखेडे, समाजसेवक सुनील डोंगरे, शहर कार्याध्यक्ष अमोल बोरकर दिव्यांग सेलचे पदाधिकारी सचिन भजभुजे, जगदीश देवतळे, सतीश गोळकर, पांडुरंग मोहाड, अभिलाष कांबळे, अमोल कांडे अनिल क्षीरसागर, सुनील जुमडे, देवराव चापले, महेंद्र वैद्य,  शुभांगी आठवले, वनिता भजभुजे, वनिता ब्राह्मणे, मीना पुनासे, नंदा गेडाम, सुनिता बावने, शितल सहारे, उज्वला महाकाळकर , मीनाक्षी पेरमे,  संदीप डोळस, गणेश घुंगरूड, राजू सराटे, मुकिंद शास्त्रकर,  सुनील खेडकर, संजय दरबेसवार , संतोष ठाकरे व समस्त दिव्यांग बांधव  पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular Posts

*नम्रता गणेशराव धोत्रे कौलखेड अकोला या लाडक्या बहिणी विरुद्ध मलकापूर पो. स्टे. ला महाराष्ट्रातून पहिली तक्रार दाखल. मलकापूर (दिव्यांग शक्ती प्रतिनिध)ी*नुकताच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहिर केली मात्र अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसत आहे.अर्जदार महीला नम्रता यांनी प्रथमतः दि. ३०-०८-२०२४ रोजी योजनेचा अर्ज केला व अंतिमतः दि. ०२-०९-२०२४ रोजी त्यांचा शासनाद्वारे अर्ज मंजुर करण्यात आला आहे व त्याप्रमाणे प्रस्तुत अर्जदार हिस दरमहा १५००/- रूपये प्रमाणे निधी तिचे खात्यात प्राप्त झाला आहे. खरे म्हणजे अर्जदार नम्रता हिने खोटे व बनावटी हमीपत्राचा दस्त तयार करून त्यात खोटी व बनावटी माहित दिली व तो खरा आहे असे भासवुना जाणीव पूर्वक सदर दस्त संबंधीत अधिकाऱ्यांकडे सादर केला.त्याद्वारे शासनाची फसवणुक करून स्वतःचा गैरहक्की आर्थिक लाभ प्राप्त केला आहे.याबाबत सविस्तर असे की सदर योजने करीता पात्रता निकष असे की,ज्या महिलेच्या एकत्रीत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० /- रूपयांपेक्षा अधिक आहे, ज्या कुटूंबातील सदस्य आयकर दाता आहे, ज्या कुटूंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी म्हणुन सेवानिवृत्ती नंतर सेवानिवृत्ती वेतन घेतात, ज्यांच्या कुटूंबात चारचाकी वाहन आहे किंवा ज्या कुटूंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरत नाही. पात्र अर्जदार लाडक्या बहिणीला तसे हमीपत्र सुद्धा द्यावे लागते.असे निकष असताना अर्जदार लाडकी बहिण नम्रता हिने तिचे लग्नानंतरचे नावाने अर्ज केला आहे. सदर अर्जदार हिचे सासर कडील एकत्र कुटूंबाचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त आहे, सदर अर्जदार हिचे सासरे सेवानिवृत्ती वेतन घेतात, त्यांचे पती दिपक चांभारे पाटील नावाने एकुण ६ एकर शेतजमिन आहे. म्हणजेच निकषाप्रमाणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे. असे असतांना देखील व सदरची बाब पुर्णतः माहिती व जाणीवेतील असतांना देखील प्रस्तुत अर्जदार हिने खोटे हमीपत्र निष्पादीत केले व सदर हमीपत्र व त्यातील मजकुर खोटा आहे याची माहिती व जाणीव असतांना गैरहक्की आर्थिक लाभाचे दुषित हेतुने त्याचा वापर करून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा आर्थिक लाभ प्राप्त करून घेतला आहे.प्रस्तुत अर्जदार ही तिचे पतीपासून गेल्या पाच ते सहा वर्षापासुन विभक्त राहत आहे. त्यांचेदरम्यान अकोला येथील न्यायालयात खावटीकरीता न्यायालयीन प्रकरणे सुरू असून सदर अर्जदार हिस तिचे पतीपासून एकत्रीतरित्या दरमहा ५०,००० /- रूपये खावटी मंजुर झाल्याची देखील तक्रारीत नमूद आहे. सबब निकषास पात्र नसतांना देखील खोटी माहिती देवून व खरी माहिती लपवून सदर अर्जदार हिने योजनेचा लाभ मिळविला आहे. सदर अर्जदार हिचे माहेरचे नांव नम्रता गणेश धोत्रे आहे व सदर धोत्रे परिवारात चारचाकी वाहन आहे व त्या परिवाराचे उत्पन्न देखील अडीच लाखापेक्षा जास्त आहे. असे असतांना स्वतःचे वैवाहिकस्थितीबाबत खोटी माहिती प्रस्तुत अर्जदाराने दिली असून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला आहे.सदर महिती जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसिलदार, मलकापूर यांचेकडून अर्ज व त्यासोबतची कागदपत्र यांची माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागणी केली असता. अर्जदार नम्रता यांनी खोटे हमीपत्र तयार करून त्यात खोटी माहिती देऊन शासनाची फसवणुक केल्याबाबतची व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला असल्याचे दिसले. नम्रता यांचे सदरचे कृत्य दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा असून त्याबाबत त्यांच्या विरूध्द मलकापूर पो. स्टे. ला फिर्याद श्री. राजेंद्र काजळे यांनी दिली आहे.