श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव पालखीचे आगमन खामगांव शहरात येण्यापुर्वी पालखी मार्गातील रस्त्यांची डागडुजी व साफ सफाई इतर कामासाठी काँग्रेस पक्षाचे निवेदन

 
श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव पालखीचे आगमन खामगांव शहरात होण्या पुर्वी पालखी मार्गातील रस्त्यांची डागडुजी व साफ सफाई करण्या बाबत व पालखीच्या आगमनाच्या दिवशी निर्जंतुकीकरण करण्याकरिता औषधाची फवारणी तसेच पावडरची फवारणी करणे बाबत आज नगरपरिषदेचे उपमुख्य अधिकारी देवकते सर नगर परिषद खामगाव यांना
निवेदन  स्वप्निल संजय ठाकरे शहर अध्यक्ष व किशोर बाबासाहेब भोसले कार्याध्यक्ष खामगांव शहर काँग्रेस कमिटी खामगांव यांच्या वतीने निवेदन देण्यात आले  दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा श्री संत गजानन महाराजांची पालखी खामगाव शहरात येणार आहे.आपल्या शेगाव येथील श्री संत गजनान महाराज संस्थांनच्या पालखीने परतीच्या प्रवासाला सुरुवात केली असुन ही पालखीचे आपल्या खामगांव शहरात दिनांक 30 जुलै 2025 वार बुधवार रोजी आगमन होणार आहे या पालखीमध्ये सहभागी वारकरी व पालखीचे दर्शन करण्याकरता भक्त जणांची मोठ्या प्रमाणात मादीयाळी असते.अश्या वेळेस आपण आपल्या खामगांव शहरातील रस्त्यांची परिस्थीती पाहिल्यास या रस्त्यांची पार दुरवस्था झालेली असुन रस्त्यात ठीक ठिकाणी मोठ मोठाले खड्डे पडुन त्यात पाणी साचुन कुठे डबके तर कुठे चिखल निर्माण झालेला आहे.या मुळे पालखीतील वारकऱ्यांना व पालखीच्या दर्शनास येणाऱ्या भक्तांना त्रास होईल हा त्रास दुर करण्या करिता संपुर्ण खामगांव शहरातील ज्या ज्या मार्गाने पालखी जाणार आहे त्या सर्व मार्गातील रस्त्यांची तत्काळ डागडुजी करण्यात यावी तसेच या सर्व मार्गाची साफ सफाई करुण निर्जंतुकीकरण करण्याकरिता औषधाची फवारणी तसेच पावडरचा छडकाव कऱण्यात यावा आपण अमच्या या मागणीचा सहानुभूती पूर्वक विचार करून योग्य ती कार्यवाही करावी 

तर
सार्वजनिक बांधकाम विभागनाही रस्ता दुरुस्ती करावी चे पण निवेदन
--
मा.श्री.मुख्यकार्यकारी अभियंता साहेब. 
सार्वजनिक बांधकाम विभाग खामगांव. यांना ही निवेदन सादर करण्यात आले 
 श्री संत गजानन महाराज पालखीचे खामगांव येथुन शेगाव कडे प्रस्थान होण्या पुर्वी पर्यायी मार्गाची म्हणजे शेलोडी,तिंत्रव,जवळा,या मार्गाची डागडुजी करण्या बाबत.तसेच पालखी च्या मुख्य मार्गावर ठीक ठिकाणी महीलान करिता फिरते शोचालय व टॉयलेट ची व्यवस्था करन्यात यावी असे
 स्वप्निल संजय ठाकरे शहर अध्यक्ष व किशोर बाबासाहेब भोसले कार्याध्यक्ष श्री संत गजानन महाराजांची पालखी खामगाव शहरात येणार आहे.आपल्या शेगाव येथील श्री संत गजनान महाराज संस्थांनच्या पालखीने परतीच्या प्रवासाला सुरुवात केली असुन ह्या पालखीचे आपल्या खामगांव शहरात दिनांक 30 जुलै 2025 वार बुधवार रोजी आगमन होणार आहे.खामगांव येथे एक दिवसाचा मुक्काम करुण ही पालखी दुसऱ्या दिवशी शेगाव कडे प्रस्थान करणार असुन या वेळेस पालखी सोबत लाखो भाविक शेगाव कडे मुख्य मार्गाने जात असतात या मुळे मुख्य रस्ता पूर्णतः बंद झाल्याने बऱ्याच मोठ्या प्रमाणात भाविक शेगाव कडे जाणाऱ्या पर्यायी मार्गाचा म्हणजे शेलोडी,तींत्रव,जवळा या मार्गाचा वापर करित असतात अश्या वेळेस आपण या पर्यायी मार्गाच्या रस्त्यांची परिस्थीती पाहिल्यास ह्या रस्त्यांची पार दुरवस्था झालेली असुन या रस्त्यात ठीक ठिकाणी मोठ मोठाले खड्डे पडुन त्यात पाणी साचुन कुठे डबके तर कुठे चिखल निर्माण झालेला आहे.या मुळे दर्शनास जाणाऱ्या व दर्शन करुण येणाऱ्या भक्तांना खुप त्रास होईल हा त्रास दुर करण्या करिता शेलोडी,तींत्रव,जवळा,शेगाव कडे जाणाऱ्या या पर्यायी मार्गाची तत्काळ डागडुजी करण्यात यावी तसेच शेगाव कडे जाणाऱ्या पालखीच्या मुख्य मार्गावर ठीक ठिकाणी महीलान करिता फिरते शौचालय व टॉयलेटची व्यवस्था करण्यात यावी.तरी आपण अमच्या या मागणीचा सहानुभूती पूर्वक विचार करून योग्य ती कार्यवाही करावी अशी विनंती या निवेदनातून केली आहे 
यावेळी काँग्रेस पक्षाचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते 

Comments

Popular Posts

*नम्रता गणेशराव धोत्रे कौलखेड अकोला या लाडक्या बहिणी विरुद्ध मलकापूर पो. स्टे. ला महाराष्ट्रातून पहिली तक्रार दाखल. मलकापूर (दिव्यांग शक्ती प्रतिनिध)ी*नुकताच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहिर केली मात्र अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसत आहे.अर्जदार महीला नम्रता यांनी प्रथमतः दि. ३०-०८-२०२४ रोजी योजनेचा अर्ज केला व अंतिमतः दि. ०२-०९-२०२४ रोजी त्यांचा शासनाद्वारे अर्ज मंजुर करण्यात आला आहे व त्याप्रमाणे प्रस्तुत अर्जदार हिस दरमहा १५००/- रूपये प्रमाणे निधी तिचे खात्यात प्राप्त झाला आहे. खरे म्हणजे अर्जदार नम्रता हिने खोटे व बनावटी हमीपत्राचा दस्त तयार करून त्यात खोटी व बनावटी माहित दिली व तो खरा आहे असे भासवुना जाणीव पूर्वक सदर दस्त संबंधीत अधिकाऱ्यांकडे सादर केला.त्याद्वारे शासनाची फसवणुक करून स्वतःचा गैरहक्की आर्थिक लाभ प्राप्त केला आहे.याबाबत सविस्तर असे की सदर योजने करीता पात्रता निकष असे की,ज्या महिलेच्या एकत्रीत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० /- रूपयांपेक्षा अधिक आहे, ज्या कुटूंबातील सदस्य आयकर दाता आहे, ज्या कुटूंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी म्हणुन सेवानिवृत्ती नंतर सेवानिवृत्ती वेतन घेतात, ज्यांच्या कुटूंबात चारचाकी वाहन आहे किंवा ज्या कुटूंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरत नाही. पात्र अर्जदार लाडक्या बहिणीला तसे हमीपत्र सुद्धा द्यावे लागते.असे निकष असताना अर्जदार लाडकी बहिण नम्रता हिने तिचे लग्नानंतरचे नावाने अर्ज केला आहे. सदर अर्जदार हिचे सासर कडील एकत्र कुटूंबाचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त आहे, सदर अर्जदार हिचे सासरे सेवानिवृत्ती वेतन घेतात, त्यांचे पती दिपक चांभारे पाटील नावाने एकुण ६ एकर शेतजमिन आहे. म्हणजेच निकषाप्रमाणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे. असे असतांना देखील व सदरची बाब पुर्णतः माहिती व जाणीवेतील असतांना देखील प्रस्तुत अर्जदार हिने खोटे हमीपत्र निष्पादीत केले व सदर हमीपत्र व त्यातील मजकुर खोटा आहे याची माहिती व जाणीव असतांना गैरहक्की आर्थिक लाभाचे दुषित हेतुने त्याचा वापर करून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा आर्थिक लाभ प्राप्त करून घेतला आहे.प्रस्तुत अर्जदार ही तिचे पतीपासून गेल्या पाच ते सहा वर्षापासुन विभक्त राहत आहे. त्यांचेदरम्यान अकोला येथील न्यायालयात खावटीकरीता न्यायालयीन प्रकरणे सुरू असून सदर अर्जदार हिस तिचे पतीपासून एकत्रीतरित्या दरमहा ५०,००० /- रूपये खावटी मंजुर झाल्याची देखील तक्रारीत नमूद आहे. सबब निकषास पात्र नसतांना देखील खोटी माहिती देवून व खरी माहिती लपवून सदर अर्जदार हिने योजनेचा लाभ मिळविला आहे. सदर अर्जदार हिचे माहेरचे नांव नम्रता गणेश धोत्रे आहे व सदर धोत्रे परिवारात चारचाकी वाहन आहे व त्या परिवाराचे उत्पन्न देखील अडीच लाखापेक्षा जास्त आहे. असे असतांना स्वतःचे वैवाहिकस्थितीबाबत खोटी माहिती प्रस्तुत अर्जदाराने दिली असून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला आहे.सदर महिती जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसिलदार, मलकापूर यांचेकडून अर्ज व त्यासोबतची कागदपत्र यांची माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागणी केली असता. अर्जदार नम्रता यांनी खोटे हमीपत्र तयार करून त्यात खोटी माहिती देऊन शासनाची फसवणुक केल्याबाबतची व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला असल्याचे दिसले. नम्रता यांचे सदरचे कृत्य दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा असून त्याबाबत त्यांच्या विरूध्द मलकापूर पो. स्टे. ला फिर्याद श्री. राजेंद्र काजळे यांनी दिली आहे.