मराठी पत्रकार परिषद तालुका कार्यालयाचे उद्घाटन आणि वृक्षारोपण

मराठी पत्रकार परिषद तालुका कार्यालयाचे उद्घाटन आणि वृक्षारोपण
प्रतिनिधी | संग्रामपूर
तालुक्यातील पत्रकारांना आपसी संवाद करण्यासाठी हक्काची जागा म्हणून तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या वरवट बकाल येथे कार्यालय उघडण्यात आले.
मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्नीत संग्रामपुर तालुका पत्रकार संघाच्या वतीने शनिवार 19 जुलै रोजी वृक्षारोपण करून कार्यालयाचे उदघाट्न करण्यात आले.
याप्रसंगी बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजितभाई राजपुत,कार्याध्यक्ष प्रशांत देशमुख,वसिम शेख आणि जिल्हासचिव शिवाजीराव मामनकर,जिल्हा समन्वयक पंजाबराव ठाकरे,सत्यशोधन समिती जिल्हा कार्याध्यक्ष अझहर अली यांची प्रमुख उपस्थिती होती. संग्रामपुर तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील दांदळे यांनी प्रस्तावना करतांना कार्यालय स्थापनेचा उद्देश आणि संघटनेच्या पुढील कामाची रुपरेषा विषद केली. जेष्ठ पत्रकार वासुदेवराव दामधर यांनी पत्रकारीतेतील आवाहनांवर पत्रकारांना संबोधित केले तर जिल्हा समन्वयक पंजाबराव ठाकरे यांनी पत्रकारांनी संघटीत राहणे व आवाहने पेलत तळागाळातील सामाजिक समस्या समर्थपणे मांडत पत्रकारीता करण्याचे आवाहन केले. जिल्हाध्यक्ष रणजितभाई राजपुत यांनी पत्रकारांच्या आरोग्य विषयक समस्यांसाठी संघटनेकडुन सहकार्याच्या योजने विषयी आपले विचार मांडले तर पुढे त्यांनी पत्रकारीतेतील पुरस्कारांविषयी विचार मंथन सुरु असल्याचे सांगतानाच तालुका पत्रकार संघाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचा विश्वास व्यक्त केला तर आपल्या मार्गदर्शनात जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत देशमुख आणि वसिम शेख यांनी संग्रामपुर तालुका पत्रकार संघाच्या कार्याचा आढावा घेतांना एकजुटीचा गौरवपुर्ण शब्दात उल्लेख केला.या कार्यक्रमाचे सुयोग्य सुत्रसंचालन जिल्हा समिती सदस्य श्यामभाऊ देशमुख यांनी केले तर आभार तालुका सचिव विवेक राऊत यांनी व्यक्त केले.कार्यालयाचे उद्घाटना नंतर जवळील विश्वकर्मा मंदिराच्या पटांगणावर आणि तालुका कार्यालयाचे समोर वृक्षारोपण करण्यात आले.
यापुढेही समाज उपयोगी विविध उपक्रम तालुका पत्रकार संघाकडून राबविण्यात येतील अशी ग्वाही तालुका पत्रकार संघाच्या वतीने ज्ञानेश्वर पाटील यांनी दिली. 
 व चहा फराळाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रमासाठी जिल्हास्तरीय समितीतील आकाश पालीवाल, जिल्हा पत्रकार हल्ला विरोधी समिती सदस्य स्वप्निल देशमुख,
तालुका कार्याध्यक्ष राजेंद्र धर्माधिकारी,तालुका सहसचिव शेख रफिकभाई यांचेसह डिजीटल मिडीया तालुकाध्यक्ष गोपाल धर्माळ,उपाध्यक्ष भगवान पाखरे, तालुका सचिव निलेश तायडे, संघटक श्यामभाऊ ईंगळे, मोहन सोनोने यांचे सह संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular Posts

*नम्रता गणेशराव धोत्रे कौलखेड अकोला या लाडक्या बहिणी विरुद्ध मलकापूर पो. स्टे. ला महाराष्ट्रातून पहिली तक्रार दाखल. मलकापूर (दिव्यांग शक्ती प्रतिनिध)ी*नुकताच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहिर केली मात्र अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसत आहे.अर्जदार महीला नम्रता यांनी प्रथमतः दि. ३०-०८-२०२४ रोजी योजनेचा अर्ज केला व अंतिमतः दि. ०२-०९-२०२४ रोजी त्यांचा शासनाद्वारे अर्ज मंजुर करण्यात आला आहे व त्याप्रमाणे प्रस्तुत अर्जदार हिस दरमहा १५००/- रूपये प्रमाणे निधी तिचे खात्यात प्राप्त झाला आहे. खरे म्हणजे अर्जदार नम्रता हिने खोटे व बनावटी हमीपत्राचा दस्त तयार करून त्यात खोटी व बनावटी माहित दिली व तो खरा आहे असे भासवुना जाणीव पूर्वक सदर दस्त संबंधीत अधिकाऱ्यांकडे सादर केला.त्याद्वारे शासनाची फसवणुक करून स्वतःचा गैरहक्की आर्थिक लाभ प्राप्त केला आहे.याबाबत सविस्तर असे की सदर योजने करीता पात्रता निकष असे की,ज्या महिलेच्या एकत्रीत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० /- रूपयांपेक्षा अधिक आहे, ज्या कुटूंबातील सदस्य आयकर दाता आहे, ज्या कुटूंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी म्हणुन सेवानिवृत्ती नंतर सेवानिवृत्ती वेतन घेतात, ज्यांच्या कुटूंबात चारचाकी वाहन आहे किंवा ज्या कुटूंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरत नाही. पात्र अर्जदार लाडक्या बहिणीला तसे हमीपत्र सुद्धा द्यावे लागते.असे निकष असताना अर्जदार लाडकी बहिण नम्रता हिने तिचे लग्नानंतरचे नावाने अर्ज केला आहे. सदर अर्जदार हिचे सासर कडील एकत्र कुटूंबाचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त आहे, सदर अर्जदार हिचे सासरे सेवानिवृत्ती वेतन घेतात, त्यांचे पती दिपक चांभारे पाटील नावाने एकुण ६ एकर शेतजमिन आहे. म्हणजेच निकषाप्रमाणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे. असे असतांना देखील व सदरची बाब पुर्णतः माहिती व जाणीवेतील असतांना देखील प्रस्तुत अर्जदार हिने खोटे हमीपत्र निष्पादीत केले व सदर हमीपत्र व त्यातील मजकुर खोटा आहे याची माहिती व जाणीव असतांना गैरहक्की आर्थिक लाभाचे दुषित हेतुने त्याचा वापर करून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा आर्थिक लाभ प्राप्त करून घेतला आहे.प्रस्तुत अर्जदार ही तिचे पतीपासून गेल्या पाच ते सहा वर्षापासुन विभक्त राहत आहे. त्यांचेदरम्यान अकोला येथील न्यायालयात खावटीकरीता न्यायालयीन प्रकरणे सुरू असून सदर अर्जदार हिस तिचे पतीपासून एकत्रीतरित्या दरमहा ५०,००० /- रूपये खावटी मंजुर झाल्याची देखील तक्रारीत नमूद आहे. सबब निकषास पात्र नसतांना देखील खोटी माहिती देवून व खरी माहिती लपवून सदर अर्जदार हिने योजनेचा लाभ मिळविला आहे. सदर अर्जदार हिचे माहेरचे नांव नम्रता गणेश धोत्रे आहे व सदर धोत्रे परिवारात चारचाकी वाहन आहे व त्या परिवाराचे उत्पन्न देखील अडीच लाखापेक्षा जास्त आहे. असे असतांना स्वतःचे वैवाहिकस्थितीबाबत खोटी माहिती प्रस्तुत अर्जदाराने दिली असून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला आहे.सदर महिती जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसिलदार, मलकापूर यांचेकडून अर्ज व त्यासोबतची कागदपत्र यांची माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागणी केली असता. अर्जदार नम्रता यांनी खोटे हमीपत्र तयार करून त्यात खोटी माहिती देऊन शासनाची फसवणुक केल्याबाबतची व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला असल्याचे दिसले. नम्रता यांचे सदरचे कृत्य दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा असून त्याबाबत त्यांच्या विरूध्द मलकापूर पो. स्टे. ला फिर्याद श्री. राजेंद्र काजळे यांनी दिली आहे.