*अतिक्रमणाच्या पावसात**खामगावात आला बेरोजगारीचा महापुर!*

*अतिक्रमणाच्या पावसात*
*खामगावात आला बेरोजगारीचा महापुर!*
खामगाव 
संतोष आटोळे 
खामगाव नगरपरिषदेने आज आपल्या सर्व शक्तीनिशी पोलीस विभाग महसूल विभाग भूमि अभिलेख विभाग विद्युत विभाग आरोग्य विभागात विभागांसह खामगाव शहरांमध्ये सामूहिक अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली या मोहिमेमध्ये आधीच बेरोजगारीच्या संकटात सापडलेल्या युवकांना बेरोजगारीच्या खाई मध्ये लोटण्यासारखाच प्रकार अतिक्रमण काढताना अतिक्रमण धारकांच्या तोंडातून निघून आला आहे
आधीच बेरोजगारीचे महासंकट वाढलेली महागाई यावर माफ करीत छोट्या छोट्या 
टपऱ्या उभारी त आपल्याला साजेसा व्यवसाय ऊभारत आपल्या आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाला हातभार लावण्याकरिता या बेरोजगारांनी व्यवसायाच्या माध्यमातून आपली उपजीविका त्यांनी चालवली होती 
आज झालेल्या या अतिक्रमण च्या कार्यवाहीमुळे यांच्या कुटुंबाला फार मोठा धक्का बसला आहे 
नेहरू मार्केट परिसरात झालेल्या कार्यवाही विषयी दर्शनी भागावर लावलेल्या दुकानांच्या प्रसिद्धीसाठी आकर्षक बॅनर ची सजावट कुठल्याच प्रकारच्या अडचणी नसतानाही तोडल्यामुळे या मार्केटमधील व्यवसायिकांनी नगरपालिके विषयी तिखट रोष व्यक्त केला आहे
*तर काहींचा अतिक्रमण हा धंदा*
संपूर्ण खामगाव शहरामध्ये राजकीय व गुंडशाहीचं पाठबळ असलेल्या अतिक्रमण धारकांनी 
अनेक ठिकाणी आपल्या टपऱ्या उभारून शंभर रुपये, दोनशे रुपये, तीनशे रुपये रोजाप्रमाणे ठरवून त्या भाड्याने सुद्धा दिल्याचे समोर आले आहे

*गाळे विकण्याकरिता केलेली कार्यवाही!*
नगरपरिषदेने व्यवसायिक असलेल्या ठिकाणी उभारून ती विकायची असल्यामुळे तसेच लाखो रुपये किंमत असलेल्या त्या त्या दुकानांना  गिऱ्हाईक उपलब्ध नसल्याचेही लक्षात आल्यामुळे नगरपालिकेने ही कार्यवाही केल्याचे ही समोर आले आहे 

*राजकारणी लोकांनी फिरवली पाठ!*
सकाळपासून सुरू झालेल्या अतिक्रमणाच्या या कारवाईमध्ये ज्यांची दुकाने उद्ध्वस्त होत होती त्यांनी आपल्या चीर परिचित असलेल्या राजकिय  नेत्यांना संपर्क करीत होत असलेल्या कार्यवाहीसाठी काही मदत करता येईल का, तर काही मोठे नेते फोन बंद करून संपर्काच्या बाहेर असल्याचे यावेळी काही अतिक्रमणधारकांनी सांगितले 

*येत्या काळात वाढणार प्रशासनाच्या डोकी समस्या*
 लोकांच्या अतिक्रमणाचे वाटोळे लावणाऱ्या नगरपालिके विषयी संपूर्ण शहरात असंतोष ची भावना निर्माण होत असताना यातून शहरात भयावह स्थितीत निर्माण होणारी बेरोजगारी यातूनच अप्रिय घटना घडतील याचं भान ही प्रशासनाने ठेवणे गरजेचे अशी ही आता चर्चिले जात आहे

Comments

Popular Posts

*नम्रता गणेशराव धोत्रे कौलखेड अकोला या लाडक्या बहिणी विरुद्ध मलकापूर पो. स्टे. ला महाराष्ट्रातून पहिली तक्रार दाखल. मलकापूर (दिव्यांग शक्ती प्रतिनिध)ी*नुकताच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहिर केली मात्र अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसत आहे.अर्जदार महीला नम्रता यांनी प्रथमतः दि. ३०-०८-२०२४ रोजी योजनेचा अर्ज केला व अंतिमतः दि. ०२-०९-२०२४ रोजी त्यांचा शासनाद्वारे अर्ज मंजुर करण्यात आला आहे व त्याप्रमाणे प्रस्तुत अर्जदार हिस दरमहा १५००/- रूपये प्रमाणे निधी तिचे खात्यात प्राप्त झाला आहे. खरे म्हणजे अर्जदार नम्रता हिने खोटे व बनावटी हमीपत्राचा दस्त तयार करून त्यात खोटी व बनावटी माहित दिली व तो खरा आहे असे भासवुना जाणीव पूर्वक सदर दस्त संबंधीत अधिकाऱ्यांकडे सादर केला.त्याद्वारे शासनाची फसवणुक करून स्वतःचा गैरहक्की आर्थिक लाभ प्राप्त केला आहे.याबाबत सविस्तर असे की सदर योजने करीता पात्रता निकष असे की,ज्या महिलेच्या एकत्रीत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० /- रूपयांपेक्षा अधिक आहे, ज्या कुटूंबातील सदस्य आयकर दाता आहे, ज्या कुटूंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी म्हणुन सेवानिवृत्ती नंतर सेवानिवृत्ती वेतन घेतात, ज्यांच्या कुटूंबात चारचाकी वाहन आहे किंवा ज्या कुटूंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरत नाही. पात्र अर्जदार लाडक्या बहिणीला तसे हमीपत्र सुद्धा द्यावे लागते.असे निकष असताना अर्जदार लाडकी बहिण नम्रता हिने तिचे लग्नानंतरचे नावाने अर्ज केला आहे. सदर अर्जदार हिचे सासर कडील एकत्र कुटूंबाचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त आहे, सदर अर्जदार हिचे सासरे सेवानिवृत्ती वेतन घेतात, त्यांचे पती दिपक चांभारे पाटील नावाने एकुण ६ एकर शेतजमिन आहे. म्हणजेच निकषाप्रमाणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे. असे असतांना देखील व सदरची बाब पुर्णतः माहिती व जाणीवेतील असतांना देखील प्रस्तुत अर्जदार हिने खोटे हमीपत्र निष्पादीत केले व सदर हमीपत्र व त्यातील मजकुर खोटा आहे याची माहिती व जाणीव असतांना गैरहक्की आर्थिक लाभाचे दुषित हेतुने त्याचा वापर करून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा आर्थिक लाभ प्राप्त करून घेतला आहे.प्रस्तुत अर्जदार ही तिचे पतीपासून गेल्या पाच ते सहा वर्षापासुन विभक्त राहत आहे. त्यांचेदरम्यान अकोला येथील न्यायालयात खावटीकरीता न्यायालयीन प्रकरणे सुरू असून सदर अर्जदार हिस तिचे पतीपासून एकत्रीतरित्या दरमहा ५०,००० /- रूपये खावटी मंजुर झाल्याची देखील तक्रारीत नमूद आहे. सबब निकषास पात्र नसतांना देखील खोटी माहिती देवून व खरी माहिती लपवून सदर अर्जदार हिने योजनेचा लाभ मिळविला आहे. सदर अर्जदार हिचे माहेरचे नांव नम्रता गणेश धोत्रे आहे व सदर धोत्रे परिवारात चारचाकी वाहन आहे व त्या परिवाराचे उत्पन्न देखील अडीच लाखापेक्षा जास्त आहे. असे असतांना स्वतःचे वैवाहिकस्थितीबाबत खोटी माहिती प्रस्तुत अर्जदाराने दिली असून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला आहे.सदर महिती जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसिलदार, मलकापूर यांचेकडून अर्ज व त्यासोबतची कागदपत्र यांची माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागणी केली असता. अर्जदार नम्रता यांनी खोटे हमीपत्र तयार करून त्यात खोटी माहिती देऊन शासनाची फसवणुक केल्याबाबतची व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला असल्याचे दिसले. नम्रता यांचे सदरचे कृत्य दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा असून त्याबाबत त्यांच्या विरूध्द मलकापूर पो. स्टे. ला फिर्याद श्री. राजेंद्र काजळे यांनी दिली आहे.