बापाच्या प्रेमाची आणि कर्तव्याची जाणीव म्हणजेच भगवंताची भक्ती : जयंत हिंगे.पितृ दिनानिमित्त आदर्श पालकांचा सन्मान कार्यक्रम संपन्न



बापाच्या प्रेमाची आणि कर्तव्याची जाणीव म्हणजेच भगवंताची भक्ती : जयंत हिंगे.

पितृ दिनानिमित्त आदर्श पालकांचा सन्मान कार्यक्रम संपन्न.

बुलढाणा:
संस्कृती धर्मापेक्षा प्रथम कर्तव्य म्हणून  मातापित्यांचा सर्वांगाने सन्मान करणे काळाची गरज आहे. मुलांच्या जन्मापासून प्रौढ अवस्थेपर्यंत बापाने केलेल्या प्रेमाची आणि कर्तव्याची जाणीव म्हणजेच भगवंताची भक्ती होय. मातापित्यांची भक्ती केल्यामुळेच पांडुरंग परमात्मा पुंडलिकाच्या भेटीला जातो. असे मत वन्यजीव सोयरे संस्थेचे संस्थापक जयंत हिंगे यांनी व्यक्त केले. 
बुलढाणा शहरामध्ये किसान ब्रिगेड, रमाई ब्रिगेड, ग्राम स्वराज्य समिती, राष्ट्रीय बजरंग दल,आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या संयुक्त विद्यमानाने पितृ दिनाचे अचैत्त्य साधत प्रशासकीय,सामाजिक आणि पारिवारिक जीवनात आदर्श निर्माण करणाऱ्या पालकांचा  सन्मान कार्यक्रमाचे आयोजन 15 जून ला सायंकाळी करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना  
माजी मंडळ अधिकारी जयंत हिंगे उपरोक्त मत व्यक्त केले. यावेळी ॲड.सतीशचंद्र रोठे पाटील, संजय येंडोले, अतुल सोनुने,सचिन शेलार, भूपेश पाटील,विशाल राणे, दिवाकर राणे, कमलाकर व्यवहारे, पुरुषोत्तम व्यवहारे, सतीश हीवरकर, सुरेखाताई निकाळजे, आशाताई गायकवाड, पंचफुलाबाई गवई,भारती अवचार, ताईबाई जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादनाने सन्मान कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.यावेळी प्रशासकीय, सामाजिक, शैक्षणिक,सांस्कृतिक  क्षेत्रांमध्ये सेवा देत पारिवारिक जबाबदारी, कर्तव्य सर्वोत्कृष्टपणे पार पाडणाऱ्या बुलढाणा शहरातील मातापित्यांचा स्मृतिचिन्ह, शाल,श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक सुशांत शेळके पाटील यांनी केले. संचालन गणेश राऊत यांनी तर आभार प्रदर्शन मोहन सोळंके यांनी व्यक्त केले. यशस्वीतेसाठी आयोजक संघटनांच्या पदाधिकारी प्रतिनिधींनी परिश्रम घेत बहुसंख्येने उपस्थिती दर्शविली

Comments

Popular Posts

*नम्रता गणेशराव धोत्रे कौलखेड अकोला या लाडक्या बहिणी विरुद्ध मलकापूर पो. स्टे. ला महाराष्ट्रातून पहिली तक्रार दाखल. मलकापूर (दिव्यांग शक्ती प्रतिनिध)ी*नुकताच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहिर केली मात्र अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसत आहे.अर्जदार महीला नम्रता यांनी प्रथमतः दि. ३०-०८-२०२४ रोजी योजनेचा अर्ज केला व अंतिमतः दि. ०२-०९-२०२४ रोजी त्यांचा शासनाद्वारे अर्ज मंजुर करण्यात आला आहे व त्याप्रमाणे प्रस्तुत अर्जदार हिस दरमहा १५००/- रूपये प्रमाणे निधी तिचे खात्यात प्राप्त झाला आहे. खरे म्हणजे अर्जदार नम्रता हिने खोटे व बनावटी हमीपत्राचा दस्त तयार करून त्यात खोटी व बनावटी माहित दिली व तो खरा आहे असे भासवुना जाणीव पूर्वक सदर दस्त संबंधीत अधिकाऱ्यांकडे सादर केला.त्याद्वारे शासनाची फसवणुक करून स्वतःचा गैरहक्की आर्थिक लाभ प्राप्त केला आहे.याबाबत सविस्तर असे की सदर योजने करीता पात्रता निकष असे की,ज्या महिलेच्या एकत्रीत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० /- रूपयांपेक्षा अधिक आहे, ज्या कुटूंबातील सदस्य आयकर दाता आहे, ज्या कुटूंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी म्हणुन सेवानिवृत्ती नंतर सेवानिवृत्ती वेतन घेतात, ज्यांच्या कुटूंबात चारचाकी वाहन आहे किंवा ज्या कुटूंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरत नाही. पात्र अर्जदार लाडक्या बहिणीला तसे हमीपत्र सुद्धा द्यावे लागते.असे निकष असताना अर्जदार लाडकी बहिण नम्रता हिने तिचे लग्नानंतरचे नावाने अर्ज केला आहे. सदर अर्जदार हिचे सासर कडील एकत्र कुटूंबाचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त आहे, सदर अर्जदार हिचे सासरे सेवानिवृत्ती वेतन घेतात, त्यांचे पती दिपक चांभारे पाटील नावाने एकुण ६ एकर शेतजमिन आहे. म्हणजेच निकषाप्रमाणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे. असे असतांना देखील व सदरची बाब पुर्णतः माहिती व जाणीवेतील असतांना देखील प्रस्तुत अर्जदार हिने खोटे हमीपत्र निष्पादीत केले व सदर हमीपत्र व त्यातील मजकुर खोटा आहे याची माहिती व जाणीव असतांना गैरहक्की आर्थिक लाभाचे दुषित हेतुने त्याचा वापर करून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा आर्थिक लाभ प्राप्त करून घेतला आहे.प्रस्तुत अर्जदार ही तिचे पतीपासून गेल्या पाच ते सहा वर्षापासुन विभक्त राहत आहे. त्यांचेदरम्यान अकोला येथील न्यायालयात खावटीकरीता न्यायालयीन प्रकरणे सुरू असून सदर अर्जदार हिस तिचे पतीपासून एकत्रीतरित्या दरमहा ५०,००० /- रूपये खावटी मंजुर झाल्याची देखील तक्रारीत नमूद आहे. सबब निकषास पात्र नसतांना देखील खोटी माहिती देवून व खरी माहिती लपवून सदर अर्जदार हिने योजनेचा लाभ मिळविला आहे. सदर अर्जदार हिचे माहेरचे नांव नम्रता गणेश धोत्रे आहे व सदर धोत्रे परिवारात चारचाकी वाहन आहे व त्या परिवाराचे उत्पन्न देखील अडीच लाखापेक्षा जास्त आहे. असे असतांना स्वतःचे वैवाहिकस्थितीबाबत खोटी माहिती प्रस्तुत अर्जदाराने दिली असून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला आहे.सदर महिती जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसिलदार, मलकापूर यांचेकडून अर्ज व त्यासोबतची कागदपत्र यांची माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागणी केली असता. अर्जदार नम्रता यांनी खोटे हमीपत्र तयार करून त्यात खोटी माहिती देऊन शासनाची फसवणुक केल्याबाबतची व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला असल्याचे दिसले. नम्रता यांचे सदरचे कृत्य दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा असून त्याबाबत त्यांच्या विरूध्द मलकापूर पो. स्टे. ला फिर्याद श्री. राजेंद्र काजळे यांनी दिली आहे.