भाजपा दिव्यांग आघाडीचा जन संवाद कार्यक्रम संपन्न

भाजपा दिव्यांग आघाडीचा जन संवाद कार्यक्रमाचे आयोजन संपन्न
नागपूर 
(दिव्यांग शक्ती) 

दिनांक 22-6-2025 रोजी लवकुश नगर मानेवाडा येथील वाळके सेलिब्रेशन येथे दिव्यांगजन संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
आज या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. श्री. सुधाकर जी कोहळे साहेब माजी आमदार दक्षिण नागपूर व मा. श्री. अजय बोधरे साहेब, सरचिटणीस भाजपा ग्रामीण नागपूर प्रमुख उपस्थित होते. 
या कार्यक्रमाचे मार्गदर्शन या पूर्वी  मा. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब महसुल मंत्री महाराष्ट्र राज्य, मा. श्री. दयाशंकरजी तिवारी भाजपा नागपूर शहर अध्यक्ष, माजी भाजपा ग्रामीण अध्यक्ष श्री सुधाकर जी कोहले, भाजपा नागपूर ग्रामीण अध्यक्ष श्री मनोहर जी कुंभारे काटोल व भाजपा नागपूर ग्रामीण अध्यक्ष श्री अनंतराव राऊत उमरेड. 
श्री. यांच्या नेतृत्वाखाली दर रविवारी हा कार्यक्रम घेतला आहे घेतला  जातो. अमोल देवाजी वाळके, विदर्भ प्रभारी, भाजपा दिव्यांग विकास आघाडी  महाराष्ट्र राज्य., मा. श्री सुधाकर कोहळे साहेब आमच्या कार्यक्रमात आले आणि त्यांनी आमच्या दिव्यांग लोकांना प्रोत्साहन दिले आणि मार्गदर्शन केले आणि त्यांना व्यवसाय करण्यासाठी बॅटरीवर चालणारी वाहने देण्याबद्दल बोलले.
आज आमच्या कार्यक्रमात १०६ हून अधिक दिव्यांग लोकांनी त्यांच्या समस्या सांगितल्या, ज्यामध्ये उमरेड, सावनेर, मोहपा, वाडी, कामठी, भिवपूर, कामठी, कुही, अमरावती नागपूर शहर आणि ग्रामीण भागातून असंख्य दिव्यांग  आले होते.
या कार्यक्रमात भारतीय जनता पार्टी दिव्यांग विकास आघाडीने सुलभ कर्ण योजना, यूडीआयडी कार्ड, रेल्वे पास, स्वयंरोजगार, ई-रिक्षा, बॅटरीवर चालणारी सायकल, रेशन कार्ड, संजय गांधी निराधार योजना, स्वयंरोजगारासाठी सरकारकडून दिव्यांग बंधू-भगिनींना देण्यात येणाऱ्या वैद्यकीय सुविधांबद्दल माहिती दिली.
या कार्यक्रमाचे संचालन डॉ. राजू राऊत जी, प्रमोद राऊत जी, सूर्यकांत वारजुरकर जी, मोहन दिकोंडवार आणि श्री धनंजय उपासनी, श्री मनोज धोटे, हिरालाल जी गुप्ता यांनी केले, या कार्यक्रमासाठी त्यांचे नेहमीच सहकार्य आहे. आणि मोठ्या संख्येने दिव्यांग मित्रांनी मार्गदर्शन केले आणि बरेच दिव्यांग मित्र उपस्थित होते,
दिव्यांगजनांना मार्गदर्शन करण्यासाठी
सर्व दिव्यांग बांधवांना विनंती आहे की सर्व दिव्यांग बांधवांनी या कराराचा लाभ घ्यावा असे .
अमोल वाळके विदर्भ रूपाली भाजपा दिव्यांग विकास आघाडी महाराष्ट्र राज्य यांनी कळविले आहे


,

Comments

Popular Posts

*नम्रता गणेशराव धोत्रे कौलखेड अकोला या लाडक्या बहिणी विरुद्ध मलकापूर पो. स्टे. ला महाराष्ट्रातून पहिली तक्रार दाखल. मलकापूर (दिव्यांग शक्ती प्रतिनिध)ी*नुकताच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहिर केली मात्र अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसत आहे.अर्जदार महीला नम्रता यांनी प्रथमतः दि. ३०-०८-२०२४ रोजी योजनेचा अर्ज केला व अंतिमतः दि. ०२-०९-२०२४ रोजी त्यांचा शासनाद्वारे अर्ज मंजुर करण्यात आला आहे व त्याप्रमाणे प्रस्तुत अर्जदार हिस दरमहा १५००/- रूपये प्रमाणे निधी तिचे खात्यात प्राप्त झाला आहे. खरे म्हणजे अर्जदार नम्रता हिने खोटे व बनावटी हमीपत्राचा दस्त तयार करून त्यात खोटी व बनावटी माहित दिली व तो खरा आहे असे भासवुना जाणीव पूर्वक सदर दस्त संबंधीत अधिकाऱ्यांकडे सादर केला.त्याद्वारे शासनाची फसवणुक करून स्वतःचा गैरहक्की आर्थिक लाभ प्राप्त केला आहे.याबाबत सविस्तर असे की सदर योजने करीता पात्रता निकष असे की,ज्या महिलेच्या एकत्रीत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० /- रूपयांपेक्षा अधिक आहे, ज्या कुटूंबातील सदस्य आयकर दाता आहे, ज्या कुटूंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी म्हणुन सेवानिवृत्ती नंतर सेवानिवृत्ती वेतन घेतात, ज्यांच्या कुटूंबात चारचाकी वाहन आहे किंवा ज्या कुटूंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरत नाही. पात्र अर्जदार लाडक्या बहिणीला तसे हमीपत्र सुद्धा द्यावे लागते.असे निकष असताना अर्जदार लाडकी बहिण नम्रता हिने तिचे लग्नानंतरचे नावाने अर्ज केला आहे. सदर अर्जदार हिचे सासर कडील एकत्र कुटूंबाचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त आहे, सदर अर्जदार हिचे सासरे सेवानिवृत्ती वेतन घेतात, त्यांचे पती दिपक चांभारे पाटील नावाने एकुण ६ एकर शेतजमिन आहे. म्हणजेच निकषाप्रमाणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे. असे असतांना देखील व सदरची बाब पुर्णतः माहिती व जाणीवेतील असतांना देखील प्रस्तुत अर्जदार हिने खोटे हमीपत्र निष्पादीत केले व सदर हमीपत्र व त्यातील मजकुर खोटा आहे याची माहिती व जाणीव असतांना गैरहक्की आर्थिक लाभाचे दुषित हेतुने त्याचा वापर करून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा आर्थिक लाभ प्राप्त करून घेतला आहे.प्रस्तुत अर्जदार ही तिचे पतीपासून गेल्या पाच ते सहा वर्षापासुन विभक्त राहत आहे. त्यांचेदरम्यान अकोला येथील न्यायालयात खावटीकरीता न्यायालयीन प्रकरणे सुरू असून सदर अर्जदार हिस तिचे पतीपासून एकत्रीतरित्या दरमहा ५०,००० /- रूपये खावटी मंजुर झाल्याची देखील तक्रारीत नमूद आहे. सबब निकषास पात्र नसतांना देखील खोटी माहिती देवून व खरी माहिती लपवून सदर अर्जदार हिने योजनेचा लाभ मिळविला आहे. सदर अर्जदार हिचे माहेरचे नांव नम्रता गणेश धोत्रे आहे व सदर धोत्रे परिवारात चारचाकी वाहन आहे व त्या परिवाराचे उत्पन्न देखील अडीच लाखापेक्षा जास्त आहे. असे असतांना स्वतःचे वैवाहिकस्थितीबाबत खोटी माहिती प्रस्तुत अर्जदाराने दिली असून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला आहे.सदर महिती जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसिलदार, मलकापूर यांचेकडून अर्ज व त्यासोबतची कागदपत्र यांची माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागणी केली असता. अर्जदार नम्रता यांनी खोटे हमीपत्र तयार करून त्यात खोटी माहिती देऊन शासनाची फसवणुक केल्याबाबतची व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला असल्याचे दिसले. नम्रता यांचे सदरचे कृत्य दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा असून त्याबाबत त्यांच्या विरूध्द मलकापूर पो. स्टे. ला फिर्याद श्री. राजेंद्र काजळे यांनी दिली आहे.