काँग्रेसचे संघटन मजबूत करून पक्षाचे विचार घराघरात पोहचवा - राहुल बोंद्रे

काँग्रेसचे संघटन मजबूत करून पक्षाचे विचार घराघरात पोहचवा - राहुल बोंद्रे
खामगाव 
शेखर तायडे 
येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या 'जनसेवा' कार्यालयाचे उद्घाटन 
खामगाव : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला फार मोठा इतिहास लाभला आहे. देशात लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता रूजवण्याचे काम काँग्रेसने केले असून आजही जनतेच्या मनात काँग्रेस प्रती आदराची भावना आहे. सर्व समाज घटकाला सोबत घेत काँग्रेस पक्षाची वाटचाल सुरू असून आगामी काळ हा काँग्रेसचाच आहे. त्यासाठी काँग्रेसचे संघटन अधिक मजबूत करून पक्षाचे विचार घराघरात पोहचवा असे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी केले.
      खामगाव येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या 'जनसेवा' कार्यालयाचे उद्घाटन २५ जून रोजी करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी खामगाव विधानसभा मतदारसंघ समन्वयक ज्ञानेश्वर दादा पाटील होते.  सर्वप्रथम जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या हस्ते फित कापून व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जनसेवा कार्यालयाचे थाटात उद्घाटन झाले. यानंतर आगामी जिल्हा परिषद निवडणुकी संदर्भात आढावा बैठक पार पडली. या बैठकीत इच्छुक उमेदवार व सध्याचे राजकीय परिस्थिती यावर चर्चा करण्यात आली. दरम्यान पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करून कार्यकर्त्यांनी जोशाने कामाला लागावे अशा सूचना केल्या. 
       यावेळी खामगाव विधानसभा मतदारसंघ समन्वयक ज्ञानेश्वरदादा पाटील, बाजार समितीचे माजी सभापती तथा संचालक राजाराम काळणे, पंचायत समिती माजी सभापती डॉ. सदानंद धनोकार, शेख जूलकर शेख चांद, प्रदेश सरचिटणीस धनंजय देशमुख,  महिला काँग्रेस प्रदेश सचिव डॉ. तबसुम हुसेन, माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमती सीमाताई ठाकरे, सौ. स्मिताताई भोसले, वसीम भाई, ओबिसी विभागाचे सचिव अजय तायडे, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष तेजेंद्रसिंह चौहान, शेगाव तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष ज्ञानेश्वर शेजोळे, शहर कार्याध्यक्ष किशोरआपा भोसले, माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन वाकुडकर, प्रल्हादराव सातव, माजी पंचायत समिति सदस्य सर्वश्री चेतन पाटील, संजय तायडे, मनीष ठाकरे, इनायत भाई, सज्जादउल्ला खान, विठ्ठल सोनटक्के, खविस संचालक पांडुरंग राखोंडे, जिल्हा संघटन सचिव अतुल सिरसाट, किसान काँग्रेस विदर्भ अध्यक्ष मंगेश भारसाकळे, अल्पसंख्यांक विभाग खामगाव शहराध्यक्ष बबलू पठाण, प्रमोद चिंचोळकार, शफीउल्ला खान, मधुकर चोपडे, शिवदास शेळके, संताराम तायडे, भगवान बोंबटकार, प्रकाश इंगळे, प्रविण चोपडे , अनंत गावंडे , अँड. अशोक इंगळे, सुरज बेलोकार, अशोकराव हिंगणे, कैलास बापू देशमुख, जयंतराव खेडकर, कृष्णराव वनारे, लक्ष्मणराव मिरगे, गजानन गव्हाळे, संतोष वराडे, जलील भाई, मुख्तार भाई, अमित तायडे, अँड. शहजाद खान, सौरभ रोछारिया, साहिल देशमुख, कैलास साबे, अक्षय शंकरवार, अंकुश टिकार, वीरेंद्र सिंग इंगळे, कुलदीप राजपूत, प्रल्हादराव गायगोळ, सुबोध गिऱ्हे, सुधाकर डुकरे, शेख समीर, शेखर साबीर, सय्यद जूबेर, शेख सोहेल, सय्यद निहाल, पुरुषोत्तम घोडके, अलीम भाई, वकारखान, साकिद खान, अनिल पाटील, संदीप राठोड, शोयब शेख, अनिकेत पाटील, गणेश पाटील, संदीप शेळके, शेख सलीम, सदानंद वाघमारे, राजेश पाटील, गणेश वानखडे, माणिकराव डिक्कर, अनंत घोंगे, सचिन जयस्वाल, जितेंद्र देशमुख, डिगांबर थेरोकार , विश्वनाथ तिजारे, जावेद देशमुख, संतोष चव्हाण, निवृत्ती राऊत, नकुल देशमुख, अजय भारसाकळे, शेख कयूम यांचेसह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय तायडे, प्रास्ताविक तेजेंद्रसिंह चौहान व आभार  ज्ञानेश्वर शेजोळे यांनी मानले.

Comments

Popular Posts

*नम्रता गणेशराव धोत्रे कौलखेड अकोला या लाडक्या बहिणी विरुद्ध मलकापूर पो. स्टे. ला महाराष्ट्रातून पहिली तक्रार दाखल. मलकापूर (दिव्यांग शक्ती प्रतिनिध)ी*नुकताच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहिर केली मात्र अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसत आहे.अर्जदार महीला नम्रता यांनी प्रथमतः दि. ३०-०८-२०२४ रोजी योजनेचा अर्ज केला व अंतिमतः दि. ०२-०९-२०२४ रोजी त्यांचा शासनाद्वारे अर्ज मंजुर करण्यात आला आहे व त्याप्रमाणे प्रस्तुत अर्जदार हिस दरमहा १५००/- रूपये प्रमाणे निधी तिचे खात्यात प्राप्त झाला आहे. खरे म्हणजे अर्जदार नम्रता हिने खोटे व बनावटी हमीपत्राचा दस्त तयार करून त्यात खोटी व बनावटी माहित दिली व तो खरा आहे असे भासवुना जाणीव पूर्वक सदर दस्त संबंधीत अधिकाऱ्यांकडे सादर केला.त्याद्वारे शासनाची फसवणुक करून स्वतःचा गैरहक्की आर्थिक लाभ प्राप्त केला आहे.याबाबत सविस्तर असे की सदर योजने करीता पात्रता निकष असे की,ज्या महिलेच्या एकत्रीत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० /- रूपयांपेक्षा अधिक आहे, ज्या कुटूंबातील सदस्य आयकर दाता आहे, ज्या कुटूंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी म्हणुन सेवानिवृत्ती नंतर सेवानिवृत्ती वेतन घेतात, ज्यांच्या कुटूंबात चारचाकी वाहन आहे किंवा ज्या कुटूंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरत नाही. पात्र अर्जदार लाडक्या बहिणीला तसे हमीपत्र सुद्धा द्यावे लागते.असे निकष असताना अर्जदार लाडकी बहिण नम्रता हिने तिचे लग्नानंतरचे नावाने अर्ज केला आहे. सदर अर्जदार हिचे सासर कडील एकत्र कुटूंबाचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त आहे, सदर अर्जदार हिचे सासरे सेवानिवृत्ती वेतन घेतात, त्यांचे पती दिपक चांभारे पाटील नावाने एकुण ६ एकर शेतजमिन आहे. म्हणजेच निकषाप्रमाणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे. असे असतांना देखील व सदरची बाब पुर्णतः माहिती व जाणीवेतील असतांना देखील प्रस्तुत अर्जदार हिने खोटे हमीपत्र निष्पादीत केले व सदर हमीपत्र व त्यातील मजकुर खोटा आहे याची माहिती व जाणीव असतांना गैरहक्की आर्थिक लाभाचे दुषित हेतुने त्याचा वापर करून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा आर्थिक लाभ प्राप्त करून घेतला आहे.प्रस्तुत अर्जदार ही तिचे पतीपासून गेल्या पाच ते सहा वर्षापासुन विभक्त राहत आहे. त्यांचेदरम्यान अकोला येथील न्यायालयात खावटीकरीता न्यायालयीन प्रकरणे सुरू असून सदर अर्जदार हिस तिचे पतीपासून एकत्रीतरित्या दरमहा ५०,००० /- रूपये खावटी मंजुर झाल्याची देखील तक्रारीत नमूद आहे. सबब निकषास पात्र नसतांना देखील खोटी माहिती देवून व खरी माहिती लपवून सदर अर्जदार हिने योजनेचा लाभ मिळविला आहे. सदर अर्जदार हिचे माहेरचे नांव नम्रता गणेश धोत्रे आहे व सदर धोत्रे परिवारात चारचाकी वाहन आहे व त्या परिवाराचे उत्पन्न देखील अडीच लाखापेक्षा जास्त आहे. असे असतांना स्वतःचे वैवाहिकस्थितीबाबत खोटी माहिती प्रस्तुत अर्जदाराने दिली असून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला आहे.सदर महिती जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसिलदार, मलकापूर यांचेकडून अर्ज व त्यासोबतची कागदपत्र यांची माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागणी केली असता. अर्जदार नम्रता यांनी खोटे हमीपत्र तयार करून त्यात खोटी माहिती देऊन शासनाची फसवणुक केल्याबाबतची व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला असल्याचे दिसले. नम्रता यांचे सदरचे कृत्य दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा असून त्याबाबत त्यांच्या विरूध्द मलकापूर पो. स्टे. ला फिर्याद श्री. राजेंद्र काजळे यांनी दिली आहे.