डॉ श्रीकांत शिंदे इकडेही लक्ष द्या, शहाड रेल्वे स्टेशन वर तिकिट घरापासून तीनशे ते चारशेमीटर अंतरावर लावले बँरेकेट,दिव्यांगाची गैरसोय, नैसर्गिक आपत्तीत काय?रेल्वेची मनमानी!

डॉ श्रीकांत शिंदे इकडेही लक्ष द्या,
 शहाड रेल्वे स्टेशन वर तिकिट घरापासून तीनशे ते चारशेमीटर अंतरावर लावले बँरेकेट,दिव्यांगाची गैरसोय, नैसर्गिक आपत्तीत काय?रेल्वेची मनमानी!
कल्याण
(संजय कांबळे)
मध्यरेल्वेच्या मुख्य मार्गावरील कल्याण ते कसारा दरम्यान असलेल्या शहाड रेल्वे स्टेशन वर तिकीट घर/तिकीट हाँल पासून सुमारे तोनशे ते साडेतीनशे मीटर अंतरावर रेल्वेच्या बांधकाम विभागाने बँरेकेट लावले असून यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या हजारो दिव्यांग बांधवाना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे, शिवाय येथे नैसर्गिक आपत्ती निर्माण झाल्यास किंवा पुर परिस्थिती उद्भवल्यास फायरब्रीगेडच्या गाड्या किंवा रुग्णवाहिका कशी जाणार असा प्रश्न पडला आहे, रेल्वेच्या या आडमुठ्या व मनमानी कारभारा विरोधात मोठ्या प्रमाणात तक्रारी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
कल्याण कसारा मार्गावर शहाड हे महत्त्वाचे स्टेशन आहे, दररोज३०ते४०हजार प्रवासी या स्थानकातून प्रवास करतात.या स्टेशन च्या लगत पुर्वेला गेल्या १५ते२०वर्षापासून उल्हासनगर पालिकेच्या जागेवर अनाधिकृत पार्किंग सुरू होते,यातून रेल्वेच्या अधिका-यांना मलिदा भेटत होता अशी चर्चा आहे, परंतु उल्हासनगर पालिकेच्या उपायुक्त श्रीमती पवार मँडम यांनी ही अनाधिकृत पार्किंग हटवून पालिकेची जागा रिकामी करून येथे अधिकृत पार्किंग सुरू केली. पण हे रेल्वे ला पटले नाही, त्यांनी तिकीट घरापासून३००ते३५०मीटर अंतरावर मनमानी पणे बँरेकेट लावले, विशेष म्हणजे पश्चिमेला असे केले नाही, यामुळे दिंव्याग, वयोवृद्ध, गरोदर महिला, यांना ऐवढे अंतर चालत येवून तिकीट काढावे लागत आहे,
शिवाय येथे काही अपघात घडला, किंवा नैसर्गिक आपत्ती ओढावली तर येथे रुग्णवाहिका किंवा फायरब्रीगेडची गाडी यायला जागा नाही, तसेच बाजूला मोठा नाला आहे, येथे पुरपरिस्थिती निर्माण झाल्यास मदत कशी करणार?असा प्रश्न पडतो.कालच म्हणजे१७जून रोजी एका प्रवाशाला अपघात झाला तर त्याला उपचारासाठी इतके अंतर बाहेर जावे लागले, तेंव्हा रुग्णवाहिका मिळाली,२०२१मध्ये स्टेशनला आग लागली होती, त्यामुळे ही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती.
येथे येण्यासाठी पर्यायी मार्ग गुलशननगर मधून येतो परंतु हे अंतर एक ते दिड किलोमीटर इतके आहे, याचबरोबर तो मार्ग प्लँटफार्म वर येतो,प्रत्येक महिन्याच्या १०तारखेला संपूर्ण महाराष्ट्रातून दिव्यांग बांधव उल्हासनगर येथे मोफत रेशन घेण्यासाठी येतात, त्यांची संख्या२००च्या वर असते, भारत राजपत्रात दिव्यांग प्रवाशांना रेल्वेत व प्लँटफार्म वर सोईसुविधा पुरवाव्यात असे निर्देश आहेत, शिवाय भारतीय रेल्वे दिव्यांग अधिकार अधिनियम२०१६चा आदेश आहे. तरीही रेल्वेच्या मनमानी व आडमुठ्या पणामुळे याचा नाहक त्रास प्रवासी व नागरिकांना होत आहे. असा इतर रेल्वे स्टेशन वर नाही, मग शहाड येथेच का?व कशासाठी?याबाबत रेल्वे मंत्रालय तसेच वरीष्ठ अधिकारी यांच्या कडे तक्रारी करण्यात आल्याची खात्रीशीर माहिती आहे.याविषयी रेल्वेचे अभियंता ललित सोंळकी यांना विचारले असता ते म्हणाले, बँरेकेट विषयी मंडळ रेल्वे प्रंबधक यांचे निर्देश आहेत व त्यानुसार हे काम केले आहे.
त्यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिव्यांगांच्या तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या अडीअडचणीला मुक्त करण्याकरिता लक्ष देण्याची मागणी रेल्वे प्रवास करणाऱ्या दिव्यांग बांधवांकडून होत आहे

Comments

Popular Posts

*नम्रता गणेशराव धोत्रे कौलखेड अकोला या लाडक्या बहिणी विरुद्ध मलकापूर पो. स्टे. ला महाराष्ट्रातून पहिली तक्रार दाखल. मलकापूर (दिव्यांग शक्ती प्रतिनिध)ी*नुकताच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहिर केली मात्र अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसत आहे.अर्जदार महीला नम्रता यांनी प्रथमतः दि. ३०-०८-२०२४ रोजी योजनेचा अर्ज केला व अंतिमतः दि. ०२-०९-२०२४ रोजी त्यांचा शासनाद्वारे अर्ज मंजुर करण्यात आला आहे व त्याप्रमाणे प्रस्तुत अर्जदार हिस दरमहा १५००/- रूपये प्रमाणे निधी तिचे खात्यात प्राप्त झाला आहे. खरे म्हणजे अर्जदार नम्रता हिने खोटे व बनावटी हमीपत्राचा दस्त तयार करून त्यात खोटी व बनावटी माहित दिली व तो खरा आहे असे भासवुना जाणीव पूर्वक सदर दस्त संबंधीत अधिकाऱ्यांकडे सादर केला.त्याद्वारे शासनाची फसवणुक करून स्वतःचा गैरहक्की आर्थिक लाभ प्राप्त केला आहे.याबाबत सविस्तर असे की सदर योजने करीता पात्रता निकष असे की,ज्या महिलेच्या एकत्रीत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० /- रूपयांपेक्षा अधिक आहे, ज्या कुटूंबातील सदस्य आयकर दाता आहे, ज्या कुटूंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी म्हणुन सेवानिवृत्ती नंतर सेवानिवृत्ती वेतन घेतात, ज्यांच्या कुटूंबात चारचाकी वाहन आहे किंवा ज्या कुटूंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरत नाही. पात्र अर्जदार लाडक्या बहिणीला तसे हमीपत्र सुद्धा द्यावे लागते.असे निकष असताना अर्जदार लाडकी बहिण नम्रता हिने तिचे लग्नानंतरचे नावाने अर्ज केला आहे. सदर अर्जदार हिचे सासर कडील एकत्र कुटूंबाचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त आहे, सदर अर्जदार हिचे सासरे सेवानिवृत्ती वेतन घेतात, त्यांचे पती दिपक चांभारे पाटील नावाने एकुण ६ एकर शेतजमिन आहे. म्हणजेच निकषाप्रमाणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे. असे असतांना देखील व सदरची बाब पुर्णतः माहिती व जाणीवेतील असतांना देखील प्रस्तुत अर्जदार हिने खोटे हमीपत्र निष्पादीत केले व सदर हमीपत्र व त्यातील मजकुर खोटा आहे याची माहिती व जाणीव असतांना गैरहक्की आर्थिक लाभाचे दुषित हेतुने त्याचा वापर करून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा आर्थिक लाभ प्राप्त करून घेतला आहे.प्रस्तुत अर्जदार ही तिचे पतीपासून गेल्या पाच ते सहा वर्षापासुन विभक्त राहत आहे. त्यांचेदरम्यान अकोला येथील न्यायालयात खावटीकरीता न्यायालयीन प्रकरणे सुरू असून सदर अर्जदार हिस तिचे पतीपासून एकत्रीतरित्या दरमहा ५०,००० /- रूपये खावटी मंजुर झाल्याची देखील तक्रारीत नमूद आहे. सबब निकषास पात्र नसतांना देखील खोटी माहिती देवून व खरी माहिती लपवून सदर अर्जदार हिने योजनेचा लाभ मिळविला आहे. सदर अर्जदार हिचे माहेरचे नांव नम्रता गणेश धोत्रे आहे व सदर धोत्रे परिवारात चारचाकी वाहन आहे व त्या परिवाराचे उत्पन्न देखील अडीच लाखापेक्षा जास्त आहे. असे असतांना स्वतःचे वैवाहिकस्थितीबाबत खोटी माहिती प्रस्तुत अर्जदाराने दिली असून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला आहे.सदर महिती जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसिलदार, मलकापूर यांचेकडून अर्ज व त्यासोबतची कागदपत्र यांची माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागणी केली असता. अर्जदार नम्रता यांनी खोटे हमीपत्र तयार करून त्यात खोटी माहिती देऊन शासनाची फसवणुक केल्याबाबतची व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला असल्याचे दिसले. नम्रता यांचे सदरचे कृत्य दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा असून त्याबाबत त्यांच्या विरूध्द मलकापूर पो. स्टे. ला फिर्याद श्री. राजेंद्र काजळे यांनी दिली आहे.