*बेस्ट कामगारांचे प्रश्न सुटणार*....*गजानन नागे* *कामगार मंत्री श्री आकाशजी फुंडकर यांचे संयुक्त बैठकीत बेस्ट प्रशासनाला आदेश*

*बेस्ट कामगारांचे प्रश्न सुटणार*....*गजानन नागे*

 *कामगार मंत्री श्री आकाशजी फुंडकर यांचे संयुक्त बैठकीत बेस्ट प्रशासनाला आदेश*
मुंबई - कामगार मंत्री मा.ना. आकाशजी फुंडकर व भाजपा बेस्ट कामगार संघाचे सरचिटणीस तथा भाजपा कामगार मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष  गजानन नागे  यांचे उपस्थितीत बेस्ट कामगारांच्या विविध मागण्यांसाठी व बेस्ट कामगारांच्या पुढील येणाऱ्या काळात सुरक्षित भविष्यासाठीत्यांच्या  मंत्रालयालयीन  दालनात सभा घेण्यात आली. त्या सभेमध्ये कामगार सचिव श्रीमती कुंदन मॅडम,महानगरपालिकेचे सह आयुक्त, कामगार साह्यक आयुक्त श्री अतुल सावरकर तसेच बेस्ट प्रशासनाचे सह महाव्यवस्थापक श्री आनंद साखरे व इतर बेस्ट अधिकारी तथा व्हिजिलन्स डिपार्टमेंट , अकाऊंट डिपार्टमेंट , वाहतूक डिपार्टमेंट चें ऑडिटर विभागीय सर्व अधिकारी उपस्थित होते,श.

        सर्वांच्या समक्ष चर्चेमध्ये २०१६-२०२१ च्या करारातील एरिअस व भत्ते अदा करणे, 
 रिटायर झालेले कामगारांची देणी ,सर्वांच्या रखडलेले कोविड भत्त्या बाबत चर्चा होऊन मंत्री महोदयांनी टप्प्या, टप्प्यात लवकर कोविड भत्ता देण्याचे आदेश दिले, तसेच ज्येष्ठतेनुसार ड्रायव्हर,कंडक्टर यांना बढती देण्याबाबत निर्णय झाला. रखडलेला एलटीए, विविध विभागात भरती बाबत निर्णय घेण्यात आला. २०२१-२०२६ चा करार लवकर करण्यात यावा. बेस्ट उपक्रमातील ३३३७  बस ताफा पूर्ण करण्यात यावा.बेस्ट अधिकाऱ्यांची दादागिरी खपवून घेणार नाही असा इशारा देण्यात आला.कामगारांसाठी महापालिकेने दिलेला निधी, कामगारांचे वेतन व इतर देणी देण्यासाठी वापरल्या गेला पाहिजे.अशी मागणी गजानन नागे यांनी केली. ती मान्य करण्यात आली.
तसेच सर्वांचा महानगरपालिकेमध्ये विलीनीकरणाचा विषय महत्त्वाचा मुद्दा म्हणून उपस्थित करण्यात आला. अशा प्रदीर्घ चर्चेत कामगार मंत्र्यांना महानगरपालिका  प्रशासन तसेच  बेस्ट प्रशासन कडून समर्पक उत्तरे देण्यात आलीत. या सगळ्या मागण्या महानगरपालिकेच्या निवडणुकांपूर्वी  पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन देण्यात आले.या बैठकीला कार्याध्यक्ष  सिद्धार्थ पडसपगार, आनंद जरग, अनिल यादव, संतोष काटकर, मुकेश इंगवले,राजु लिहिणार, महादेव खांडे, विजय मावळे,पुथ्वीराज जाधव, झुंबर जाधव, आबा यादव आगार अध्यक्ष व सचिव युनियन चे प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.कामगार मंत्री महोदयांनी बेस्ट कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतल्याबध्दल बेस्ट उपक्रमात कामगारां कडून अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

Comments

Popular Posts

*नम्रता गणेशराव धोत्रे कौलखेड अकोला या लाडक्या बहिणी विरुद्ध मलकापूर पो. स्टे. ला महाराष्ट्रातून पहिली तक्रार दाखल. मलकापूर (दिव्यांग शक्ती प्रतिनिध)ी*नुकताच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहिर केली मात्र अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसत आहे.अर्जदार महीला नम्रता यांनी प्रथमतः दि. ३०-०८-२०२४ रोजी योजनेचा अर्ज केला व अंतिमतः दि. ०२-०९-२०२४ रोजी त्यांचा शासनाद्वारे अर्ज मंजुर करण्यात आला आहे व त्याप्रमाणे प्रस्तुत अर्जदार हिस दरमहा १५००/- रूपये प्रमाणे निधी तिचे खात्यात प्राप्त झाला आहे. खरे म्हणजे अर्जदार नम्रता हिने खोटे व बनावटी हमीपत्राचा दस्त तयार करून त्यात खोटी व बनावटी माहित दिली व तो खरा आहे असे भासवुना जाणीव पूर्वक सदर दस्त संबंधीत अधिकाऱ्यांकडे सादर केला.त्याद्वारे शासनाची फसवणुक करून स्वतःचा गैरहक्की आर्थिक लाभ प्राप्त केला आहे.याबाबत सविस्तर असे की सदर योजने करीता पात्रता निकष असे की,ज्या महिलेच्या एकत्रीत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० /- रूपयांपेक्षा अधिक आहे, ज्या कुटूंबातील सदस्य आयकर दाता आहे, ज्या कुटूंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी म्हणुन सेवानिवृत्ती नंतर सेवानिवृत्ती वेतन घेतात, ज्यांच्या कुटूंबात चारचाकी वाहन आहे किंवा ज्या कुटूंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरत नाही. पात्र अर्जदार लाडक्या बहिणीला तसे हमीपत्र सुद्धा द्यावे लागते.असे निकष असताना अर्जदार लाडकी बहिण नम्रता हिने तिचे लग्नानंतरचे नावाने अर्ज केला आहे. सदर अर्जदार हिचे सासर कडील एकत्र कुटूंबाचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त आहे, सदर अर्जदार हिचे सासरे सेवानिवृत्ती वेतन घेतात, त्यांचे पती दिपक चांभारे पाटील नावाने एकुण ६ एकर शेतजमिन आहे. म्हणजेच निकषाप्रमाणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे. असे असतांना देखील व सदरची बाब पुर्णतः माहिती व जाणीवेतील असतांना देखील प्रस्तुत अर्जदार हिने खोटे हमीपत्र निष्पादीत केले व सदर हमीपत्र व त्यातील मजकुर खोटा आहे याची माहिती व जाणीव असतांना गैरहक्की आर्थिक लाभाचे दुषित हेतुने त्याचा वापर करून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा आर्थिक लाभ प्राप्त करून घेतला आहे.प्रस्तुत अर्जदार ही तिचे पतीपासून गेल्या पाच ते सहा वर्षापासुन विभक्त राहत आहे. त्यांचेदरम्यान अकोला येथील न्यायालयात खावटीकरीता न्यायालयीन प्रकरणे सुरू असून सदर अर्जदार हिस तिचे पतीपासून एकत्रीतरित्या दरमहा ५०,००० /- रूपये खावटी मंजुर झाल्याची देखील तक्रारीत नमूद आहे. सबब निकषास पात्र नसतांना देखील खोटी माहिती देवून व खरी माहिती लपवून सदर अर्जदार हिने योजनेचा लाभ मिळविला आहे. सदर अर्जदार हिचे माहेरचे नांव नम्रता गणेश धोत्रे आहे व सदर धोत्रे परिवारात चारचाकी वाहन आहे व त्या परिवाराचे उत्पन्न देखील अडीच लाखापेक्षा जास्त आहे. असे असतांना स्वतःचे वैवाहिकस्थितीबाबत खोटी माहिती प्रस्तुत अर्जदाराने दिली असून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला आहे.सदर महिती जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसिलदार, मलकापूर यांचेकडून अर्ज व त्यासोबतची कागदपत्र यांची माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागणी केली असता. अर्जदार नम्रता यांनी खोटे हमीपत्र तयार करून त्यात खोटी माहिती देऊन शासनाची फसवणुक केल्याबाबतची व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला असल्याचे दिसले. नम्रता यांचे सदरचे कृत्य दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा असून त्याबाबत त्यांच्या विरूध्द मलकापूर पो. स्टे. ला फिर्याद श्री. राजेंद्र काजळे यांनी दिली आहे.