*लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे मागणीलापुन्हा यशाची किनार!**पत्रकारांच्या समस्या करिता आता कुठलीही तारीख नाही*

*लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे 
मागणीलापुन्हा यशाची किनार!*
*पत्रकारांच्या समस्या करिता आता कुठलीही तारीख नाही*
खामगाव (शेखर तायडे)
 नुकतेच  महाराष्ट्र शासनाकडून पत्रकारांसाठी राबविल्या जाणार्‍या विविध कल्याण योजना, आजार उपचार योजनांमधील दुरूस्त्या आणि पत्रकारांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसाला किती रक्कम दिली जावी या बाबतच्या अभिप्रायांसाठी पत्रकार संघटनांकडून निवेदने घ्यावित अशा आशयाचे एक कार्यालयीन पत्र मा.संचालक वृत्त,माहिती आणि जनसंपर्क,यांच्या सहीने राज्यातील विभागीय संचालक व सर्व जिल्हा माहिती अधिकार्‍यांना पाठविण्यात आले होते.  यामध्ये फक्त ३ दिवसांचा कार्यालयीन अवधी दिल्याने शासनाच्या उद्देशांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत होते. अभिप्राय मागविण्यासाठी हे पत्र  बुधवार दि.११ जून रोजी काढण्यात आले. ते मेल वर १२ जून रोजी सर्वांना पोहचले असावे आणि सोमवार दि.१६ जून रोजी आपल्या विभागातील पत्रकार संघटनांची निवेदने पाठवावित असा फतवा या पत्रातून काढण्यात आला. तीन दिवसांमध्ये पत्रकारांच्या मागण्यावर पत्रकार विचार होऊ शकला असता का? ‘‘सरकार धार्जिन्य संघटनांकडून, त्यांच्या अध्यक्षांकडून थातूर मातूर’’ अभिप्राय मागून घेतला असता व पत्रकारांची ‘जैसे थे’ परिस्थिती राहली असती.

राज्यातील पत्रकार संघटनांना किमान १५ दिवस ते १ महिन्याचा अवधी द्यावा अशी रोखठोक मागणी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेकडून संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख यांनी महासंचालक,माहिती व जनसंपर्क यांचेकडे मेलवर पत्र पाठवून केली आहे. त्याची प्रतिलिपी या.मुख्यमंत्री आणि संचालक,वृत्त,माहिती आणि जनसंपर्क यांना पाठविण्यात आली आहे.
जेणे करून राज्यातील जास्तीत जास्त पात्र  पत्रकारांना या योजनांचा लाभ मिळावा आणि  योजनांच्या नियम व अटींमध्ये आवश्यक त्या दुरूस्त्या व्हाव्यात हा उद्देश यामागे असावा असे पत्रानुसार तरी कागदोपत्री दिसते. दोन कार्यालयीन दिवसांमध्ये एवढ्या घाईत हे अभिप्राय कसे पोहचू शकतील याचा विचार न करता काढण्यात आलेले हे पत्र आहे. राज्यातील अनेक जिल्हा माहिती अधिकार्‍यांकडून अजून संबंधित पत्रकार संघटनांना याबाबत माहिती देऊन संपर्कही साधता आलेला नाही. अशा अभिप्रायांची व दुरूस्त्यांची निवेदने सादर करण्यासाठी जुण्या नियम व अटींचे अवलोकन  आवश्यक आहे. मागील काळात पत्रकारांच्या विविध प्रस्तावात काढण्यात आलेल्या अयोग्य आणि विपर्यस्त त्रूटींमुळे पात्र लोकांना झालेल्या वेदनांचा अभ्यास करून सुधारीत अभिप्राय व्यक्त करण्यासाठी पत्रकार संघटनांना वेळ देणे आवश्यक आहे.या वस्तूस्थितीचा विचार न करता काढलेले हे पत्र आणि दिलेली मुदत म्हणजे मुळ  उध्देशांबाबत साशंकता वाटण्यासारखे आहे. कोणाचे अभिप्राय आले नाहीत या कारणासाठी घाईगर्दीत कागदी घोडे नाचवून ह्या सुधारणा फाईलबंद करण्याचा हा प्रयत्न आहे का? असे प्रश्न लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडे अनेक पत्रकार व्यक्त करीत आहेत.
    शासनाने पत्रकारांच्या योजनांमध्ये पात्र लाभार्थींना योग्य तो न्याय देता यावा यासाठी पारदर्शकता आणि सुलभता निर्माण करण्यासाठी योग्य ते नियोजन ठेवावे.त्यासाठी ही निवेदने सादर करण्यासाठी पत्रकार संघटनांना किमान १५ दिवस ते १ महिन्याचा अवधी देण्यात यावा अशी मागणी आपल्या लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख यांनी केली होती.
त्याचाच परिणाम म्हणून की काय, आपल्या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय देशमु़ख यांचे मित्र ठाणे येथील जिल्हा माहिती अधिकारी सानप साहेब यांनी एक पत्र काढून संघटनेने आपल्या हरकती कळवाव्यात यामध्ये कोणतीही तारखेची अट न टाकता अभिप्राय मागीतलेले आहेत. आता पत्रकारांच्या मागण्यासाठी घाईगडबडीत नव्हे तर विचारपूर्वक निर्णय घेतला जाईल, याचे श्रेय आपल्या लढाऊ वृत्तीच्या लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या राष्ट्रीय /संस्थापक अध्यक्षाला जाते. पत्रकारांच्या भल्यासाठी झटणार्‍या देशमुख साहेबांचे मन:पूर्वक अभिनंदन तसेच ज्याही पत्रकार संघटनांनी आवाज उचलला त्यांचे ही दिव्यांग शक्ती परिवाराच्या वतीने अभिनंदन

Comments

Popular Posts

*नम्रता गणेशराव धोत्रे कौलखेड अकोला या लाडक्या बहिणी विरुद्ध मलकापूर पो. स्टे. ला महाराष्ट्रातून पहिली तक्रार दाखल. मलकापूर (दिव्यांग शक्ती प्रतिनिध)ी*नुकताच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहिर केली मात्र अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसत आहे.अर्जदार महीला नम्रता यांनी प्रथमतः दि. ३०-०८-२०२४ रोजी योजनेचा अर्ज केला व अंतिमतः दि. ०२-०९-२०२४ रोजी त्यांचा शासनाद्वारे अर्ज मंजुर करण्यात आला आहे व त्याप्रमाणे प्रस्तुत अर्जदार हिस दरमहा १५००/- रूपये प्रमाणे निधी तिचे खात्यात प्राप्त झाला आहे. खरे म्हणजे अर्जदार नम्रता हिने खोटे व बनावटी हमीपत्राचा दस्त तयार करून त्यात खोटी व बनावटी माहित दिली व तो खरा आहे असे भासवुना जाणीव पूर्वक सदर दस्त संबंधीत अधिकाऱ्यांकडे सादर केला.त्याद्वारे शासनाची फसवणुक करून स्वतःचा गैरहक्की आर्थिक लाभ प्राप्त केला आहे.याबाबत सविस्तर असे की सदर योजने करीता पात्रता निकष असे की,ज्या महिलेच्या एकत्रीत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० /- रूपयांपेक्षा अधिक आहे, ज्या कुटूंबातील सदस्य आयकर दाता आहे, ज्या कुटूंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी म्हणुन सेवानिवृत्ती नंतर सेवानिवृत्ती वेतन घेतात, ज्यांच्या कुटूंबात चारचाकी वाहन आहे किंवा ज्या कुटूंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरत नाही. पात्र अर्जदार लाडक्या बहिणीला तसे हमीपत्र सुद्धा द्यावे लागते.असे निकष असताना अर्जदार लाडकी बहिण नम्रता हिने तिचे लग्नानंतरचे नावाने अर्ज केला आहे. सदर अर्जदार हिचे सासर कडील एकत्र कुटूंबाचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त आहे, सदर अर्जदार हिचे सासरे सेवानिवृत्ती वेतन घेतात, त्यांचे पती दिपक चांभारे पाटील नावाने एकुण ६ एकर शेतजमिन आहे. म्हणजेच निकषाप्रमाणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे. असे असतांना देखील व सदरची बाब पुर्णतः माहिती व जाणीवेतील असतांना देखील प्रस्तुत अर्जदार हिने खोटे हमीपत्र निष्पादीत केले व सदर हमीपत्र व त्यातील मजकुर खोटा आहे याची माहिती व जाणीव असतांना गैरहक्की आर्थिक लाभाचे दुषित हेतुने त्याचा वापर करून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा आर्थिक लाभ प्राप्त करून घेतला आहे.प्रस्तुत अर्जदार ही तिचे पतीपासून गेल्या पाच ते सहा वर्षापासुन विभक्त राहत आहे. त्यांचेदरम्यान अकोला येथील न्यायालयात खावटीकरीता न्यायालयीन प्रकरणे सुरू असून सदर अर्जदार हिस तिचे पतीपासून एकत्रीतरित्या दरमहा ५०,००० /- रूपये खावटी मंजुर झाल्याची देखील तक्रारीत नमूद आहे. सबब निकषास पात्र नसतांना देखील खोटी माहिती देवून व खरी माहिती लपवून सदर अर्जदार हिने योजनेचा लाभ मिळविला आहे. सदर अर्जदार हिचे माहेरचे नांव नम्रता गणेश धोत्रे आहे व सदर धोत्रे परिवारात चारचाकी वाहन आहे व त्या परिवाराचे उत्पन्न देखील अडीच लाखापेक्षा जास्त आहे. असे असतांना स्वतःचे वैवाहिकस्थितीबाबत खोटी माहिती प्रस्तुत अर्जदाराने दिली असून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला आहे.सदर महिती जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसिलदार, मलकापूर यांचेकडून अर्ज व त्यासोबतची कागदपत्र यांची माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागणी केली असता. अर्जदार नम्रता यांनी खोटे हमीपत्र तयार करून त्यात खोटी माहिती देऊन शासनाची फसवणुक केल्याबाबतची व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला असल्याचे दिसले. नम्रता यांचे सदरचे कृत्य दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा असून त्याबाबत त्यांच्या विरूध्द मलकापूर पो. स्टे. ला फिर्याद श्री. राजेंद्र काजळे यांनी दिली आहे.