अखेर मलकापूर शिवसेना उबाठा च्या प्रयत्नांना यश 'त्या' चिमूरड्यास मिळाला न्याय...डॉ. राहुल रमेश चोपडे यांच्याविरुद्ध तब्बल एका वर्षा नंतर गुन्हा दाखल

अखेर मलकापूर शिवसेना उबाठा च्या प्रयत्नांना यश 'त्या' चिमूरड्यास मिळाला न्याय...
डॉ. राहुल रमेश चोपडे यांच्याविरुद्ध तब्बल एका वर्षा नंतर गुन्हा दाखल..

मलकापूर -
 (दिव्यांग शक्ती)

मलकापूर येथील दुर्गेश विश्वनाथ भारंबे वय वर्ष २० याचा दिनांक १३/३/२०२४ रोजी अपघात झाल्याने त्याला डॉ. राहुल रमेश चोपडे यांच्याकडे उपचाराकरिता नेण्यात आले, उपचार झाल्यानंतर काही दिवसांनी त्याला असहाय्य त्रास सुरू झाला, तेव्हा त्याला परत डॉ. चोपडे यांच्याकडे नेण्यात आले परंतु त्यांनी केलेल्या निष्काळजीपणामुळे त्याचा त्रास कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत जात होता. काही महिन्यांनी त्याला राज्यात व राज्याबाहेरील विविध डॉक्टरांकडे उपचारासाठी नेण्यात आले परंतु डॉ चोपडे चुकीच्या उपचार पद्धतीने पायात पस होऊन पाय पडल्याने  उपचारच होऊ शकला नाही. दरम्यान त्याची आई पूनम विश्वनाथ भारंबे यांनी डॉ. राहुल चोपडे यांच्या निष्काळजीपणा बाबत ०४/०५/२४ रोजी मलकापूर पो. स्टे येथे तक्रार दाखल केली परंतु त्याची दखल न घेतल्यामुळे पूनमताई यांनी तालुकाप्रमुख दिपक चांभारे पाटील यांच्याशी संपर्क साधला. तेव्हापासून आजपर्यंत दिपक पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत सदर प्रकरणाचा पाठपुरावा सतत केला. त्यादरम्यान त्यांनी कधी शल्यचिकित्सक कार्यालय हादरवले तर कधी चक्क मलकापूरचे माजी ठाणेदार श्री. अनिल गोपाळ यांची चक्क उपहासात्मक आरतीच ओवाळून टाकली. आता तब्बल एक वर्षानंतर आज दि. ३१/०५/२५ रोजी सदर डॉ. राहुल चोपडे यांच्या विरुद्ध प्रथम खबर क्रमांक ३४०/२५ नुसार भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम ३३८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
बॉक्स 
सामान्य लोकांच्या जेव्हा जेव्हा न्यायचा प्रश्न निर्माण होईल तेव्हा तेव्हा क्षेत्र कोणतेही असो विशेष करून रुग्णांचा प्रश्न कुठलाही धनदांडगा डॉक्टरच्या बेजबाबदारी पणामुळे रुग्णांवर अन्याय होत असेल किंवा त्याच्या जीवाच काही बर वाईट होत असेल तर आम्ही असे कधीच खपून घेणार नाही. मी जिल्ह्यातील सर्व लोकांना आव्हान करतो की अश्या स्वरूपात जर कोणी-कुठला डॉक्टर किंवा प्रशासन सामान्य नागरिकांना त्रास देत असेल तर तेव्हा मलकापूर उबाठा शिवसेना नेहमी तत्पर राहील.
----दिपक चांभारे पाटील,
शिवसेना, मलकापूर तालुकाप्रमुख यांनी प्रतिक्रिया दिली 
तर 
यासाठी सर्व प्रथम दिव्यांग शक्ती ने दखल घेतली होती
हे विशेष

Comments

Popular Posts

*नम्रता गणेशराव धोत्रे कौलखेड अकोला या लाडक्या बहिणी विरुद्ध मलकापूर पो. स्टे. ला महाराष्ट्रातून पहिली तक्रार दाखल. मलकापूर (दिव्यांग शक्ती प्रतिनिध)ी*नुकताच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहिर केली मात्र अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसत आहे.अर्जदार महीला नम्रता यांनी प्रथमतः दि. ३०-०८-२०२४ रोजी योजनेचा अर्ज केला व अंतिमतः दि. ०२-०९-२०२४ रोजी त्यांचा शासनाद्वारे अर्ज मंजुर करण्यात आला आहे व त्याप्रमाणे प्रस्तुत अर्जदार हिस दरमहा १५००/- रूपये प्रमाणे निधी तिचे खात्यात प्राप्त झाला आहे. खरे म्हणजे अर्जदार नम्रता हिने खोटे व बनावटी हमीपत्राचा दस्त तयार करून त्यात खोटी व बनावटी माहित दिली व तो खरा आहे असे भासवुना जाणीव पूर्वक सदर दस्त संबंधीत अधिकाऱ्यांकडे सादर केला.त्याद्वारे शासनाची फसवणुक करून स्वतःचा गैरहक्की आर्थिक लाभ प्राप्त केला आहे.याबाबत सविस्तर असे की सदर योजने करीता पात्रता निकष असे की,ज्या महिलेच्या एकत्रीत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० /- रूपयांपेक्षा अधिक आहे, ज्या कुटूंबातील सदस्य आयकर दाता आहे, ज्या कुटूंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी म्हणुन सेवानिवृत्ती नंतर सेवानिवृत्ती वेतन घेतात, ज्यांच्या कुटूंबात चारचाकी वाहन आहे किंवा ज्या कुटूंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरत नाही. पात्र अर्जदार लाडक्या बहिणीला तसे हमीपत्र सुद्धा द्यावे लागते.असे निकष असताना अर्जदार लाडकी बहिण नम्रता हिने तिचे लग्नानंतरचे नावाने अर्ज केला आहे. सदर अर्जदार हिचे सासर कडील एकत्र कुटूंबाचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त आहे, सदर अर्जदार हिचे सासरे सेवानिवृत्ती वेतन घेतात, त्यांचे पती दिपक चांभारे पाटील नावाने एकुण ६ एकर शेतजमिन आहे. म्हणजेच निकषाप्रमाणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे. असे असतांना देखील व सदरची बाब पुर्णतः माहिती व जाणीवेतील असतांना देखील प्रस्तुत अर्जदार हिने खोटे हमीपत्र निष्पादीत केले व सदर हमीपत्र व त्यातील मजकुर खोटा आहे याची माहिती व जाणीव असतांना गैरहक्की आर्थिक लाभाचे दुषित हेतुने त्याचा वापर करून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा आर्थिक लाभ प्राप्त करून घेतला आहे.प्रस्तुत अर्जदार ही तिचे पतीपासून गेल्या पाच ते सहा वर्षापासुन विभक्त राहत आहे. त्यांचेदरम्यान अकोला येथील न्यायालयात खावटीकरीता न्यायालयीन प्रकरणे सुरू असून सदर अर्जदार हिस तिचे पतीपासून एकत्रीतरित्या दरमहा ५०,००० /- रूपये खावटी मंजुर झाल्याची देखील तक्रारीत नमूद आहे. सबब निकषास पात्र नसतांना देखील खोटी माहिती देवून व खरी माहिती लपवून सदर अर्जदार हिने योजनेचा लाभ मिळविला आहे. सदर अर्जदार हिचे माहेरचे नांव नम्रता गणेश धोत्रे आहे व सदर धोत्रे परिवारात चारचाकी वाहन आहे व त्या परिवाराचे उत्पन्न देखील अडीच लाखापेक्षा जास्त आहे. असे असतांना स्वतःचे वैवाहिकस्थितीबाबत खोटी माहिती प्रस्तुत अर्जदाराने दिली असून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला आहे.सदर महिती जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसिलदार, मलकापूर यांचेकडून अर्ज व त्यासोबतची कागदपत्र यांची माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागणी केली असता. अर्जदार नम्रता यांनी खोटे हमीपत्र तयार करून त्यात खोटी माहिती देऊन शासनाची फसवणुक केल्याबाबतची व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला असल्याचे दिसले. नम्रता यांचे सदरचे कृत्य दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा असून त्याबाबत त्यांच्या विरूध्द मलकापूर पो. स्टे. ला फिर्याद श्री. राजेंद्र काजळे यांनी दिली आहे.