*अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ बुलढाणा जिल्हा पुर्व (घाटाखालील) जिल्हा अध्यक्ष व जिल्हा कार्यकारिणी जाहीर.**जिल्हाध्यक्ष राजू घाटे तर खामगाव शहराध्यक्ष अविनाश घोडके*



*अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ बुलढाणा जिल्हा पुर्व (घाटाखालील) जिल्हा अध्यक्ष व जिल्हा कार्यकारिणी जाहीर.*
*जिल्हाध्यक्ष राजू घाटे तर खामगाव शहराध्यक्ष अविनाश घोडके*
खामगाव (संतोष आटोळे)
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ बुलढाणा जिल्हा पुर्व (घाटाखालील) जिल्हा अध्यक्ष व जिल्हा कार्यकारिणी बैठक  संपन्न दिनांक २८/५/२०२५ बुधवार रोजी दुपारी 2 वाजता शेगांव विश्राम गृहावर संपन्न झाली. 
वरील बैठकीच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र प्रदेश सल्लागार श्री अरुणभाऊ कुलथे होते तर प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलासबापू देशमुख, केंद्रीय कार्यालय प्रमुख श्री बाबाराव खडसे ह्यांची होती.
बैठकीत कैलासबापू देशमुख यांनी संघटनेची माहिती सांगीतली तर बाबाराव खडसे यांनी नवनियुक्त बुलढाणा जिल्हा अध्यक्ष म्हणून राजु घाटे (पाटील) ह्यांच्या नांवाची घोषणा केली वरील बैठकीत महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलासबापू देशमुख, केंद्रीय कार्यालय प्रमुख श्री बाबाराव खडसे, महाराष्ट्र प्रदेश सल्लागार श्री अरुणभाऊ कुलथे, ह्यांच्या सत्कार श्री. सुरज यादव, राजु घाटे यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन केले कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुरज यादव यांनी केले. सुरज यादव यांचा सत्कार जिल्हा अध्यक्ष राजु घाटे जिल्हा कार्याध्यक्ष आश्विन राजपूत, जिल्हा सचिव संतोष कुलथे, जिल्हा उपाध्यक्ष प्रभुदास पारस्कर, जिल्हा उपाध्यक्ष दत्तु दांडगे, जिल्हा संपर्कप्रमुख अमोल भगत यांनी केले तसेच जिल्हा कार्यकारीणी मध्ये ह्यांच्या नांवाची घोषणा करण्यात आली. सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र , पुष्पगुच्छ देऊन स्वागत मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. जिल्हा अध्यक्ष यांनी आपल्या नियुक्ती निमित्ताने मनोगत व्यक्त केले त्यामध्ये त्यांनी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये लवकरच तालुका कार्यकारिणी गठीत करण्यासाठी कटिबद्ध राहणार तसेच लवकरच जिल्हा कार्यकारिणी बैठक आयोजित करून उर्वरित जिल्हा कार्यकारिणी व तालुका अध्यक्ष जाहीर होणार अशी ग्वाही सुद्धा दिली. या कार्यक्रमात अध्यक्ष यांनी नवनियुक्त कार्यकारिणी ला शुभेच्छा दिल्या व संघटना वाढीसाठी कटीबद्ध राहून प्रयत्न करा , एकसंघ संघटीत राहा असे सांगितले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन खामगांव शहर अध्यक्ष अविनाश घोडके यांनी केले.


वरील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रकाशित करावी ही विनंती 🙏🏻

Comments

Popular Posts

*नम्रता गणेशराव धोत्रे कौलखेड अकोला या लाडक्या बहिणी विरुद्ध मलकापूर पो. स्टे. ला महाराष्ट्रातून पहिली तक्रार दाखल. मलकापूर (दिव्यांग शक्ती प्रतिनिध)ी*नुकताच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहिर केली मात्र अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसत आहे.अर्जदार महीला नम्रता यांनी प्रथमतः दि. ३०-०८-२०२४ रोजी योजनेचा अर्ज केला व अंतिमतः दि. ०२-०९-२०२४ रोजी त्यांचा शासनाद्वारे अर्ज मंजुर करण्यात आला आहे व त्याप्रमाणे प्रस्तुत अर्जदार हिस दरमहा १५००/- रूपये प्रमाणे निधी तिचे खात्यात प्राप्त झाला आहे. खरे म्हणजे अर्जदार नम्रता हिने खोटे व बनावटी हमीपत्राचा दस्त तयार करून त्यात खोटी व बनावटी माहित दिली व तो खरा आहे असे भासवुना जाणीव पूर्वक सदर दस्त संबंधीत अधिकाऱ्यांकडे सादर केला.त्याद्वारे शासनाची फसवणुक करून स्वतःचा गैरहक्की आर्थिक लाभ प्राप्त केला आहे.याबाबत सविस्तर असे की सदर योजने करीता पात्रता निकष असे की,ज्या महिलेच्या एकत्रीत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० /- रूपयांपेक्षा अधिक आहे, ज्या कुटूंबातील सदस्य आयकर दाता आहे, ज्या कुटूंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी म्हणुन सेवानिवृत्ती नंतर सेवानिवृत्ती वेतन घेतात, ज्यांच्या कुटूंबात चारचाकी वाहन आहे किंवा ज्या कुटूंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरत नाही. पात्र अर्जदार लाडक्या बहिणीला तसे हमीपत्र सुद्धा द्यावे लागते.असे निकष असताना अर्जदार लाडकी बहिण नम्रता हिने तिचे लग्नानंतरचे नावाने अर्ज केला आहे. सदर अर्जदार हिचे सासर कडील एकत्र कुटूंबाचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त आहे, सदर अर्जदार हिचे सासरे सेवानिवृत्ती वेतन घेतात, त्यांचे पती दिपक चांभारे पाटील नावाने एकुण ६ एकर शेतजमिन आहे. म्हणजेच निकषाप्रमाणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे. असे असतांना देखील व सदरची बाब पुर्णतः माहिती व जाणीवेतील असतांना देखील प्रस्तुत अर्जदार हिने खोटे हमीपत्र निष्पादीत केले व सदर हमीपत्र व त्यातील मजकुर खोटा आहे याची माहिती व जाणीव असतांना गैरहक्की आर्थिक लाभाचे दुषित हेतुने त्याचा वापर करून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा आर्थिक लाभ प्राप्त करून घेतला आहे.प्रस्तुत अर्जदार ही तिचे पतीपासून गेल्या पाच ते सहा वर्षापासुन विभक्त राहत आहे. त्यांचेदरम्यान अकोला येथील न्यायालयात खावटीकरीता न्यायालयीन प्रकरणे सुरू असून सदर अर्जदार हिस तिचे पतीपासून एकत्रीतरित्या दरमहा ५०,००० /- रूपये खावटी मंजुर झाल्याची देखील तक्रारीत नमूद आहे. सबब निकषास पात्र नसतांना देखील खोटी माहिती देवून व खरी माहिती लपवून सदर अर्जदार हिने योजनेचा लाभ मिळविला आहे. सदर अर्जदार हिचे माहेरचे नांव नम्रता गणेश धोत्रे आहे व सदर धोत्रे परिवारात चारचाकी वाहन आहे व त्या परिवाराचे उत्पन्न देखील अडीच लाखापेक्षा जास्त आहे. असे असतांना स्वतःचे वैवाहिकस्थितीबाबत खोटी माहिती प्रस्तुत अर्जदाराने दिली असून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला आहे.सदर महिती जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसिलदार, मलकापूर यांचेकडून अर्ज व त्यासोबतची कागदपत्र यांची माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागणी केली असता. अर्जदार नम्रता यांनी खोटे हमीपत्र तयार करून त्यात खोटी माहिती देऊन शासनाची फसवणुक केल्याबाबतची व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला असल्याचे दिसले. नम्रता यांचे सदरचे कृत्य दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा असून त्याबाबत त्यांच्या विरूध्द मलकापूर पो. स्टे. ला फिर्याद श्री. राजेंद्र काजळे यांनी दिली आहे.