दिव्यांग अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

*दिव्यांग अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी दिव्यांग कर्मचारी संघटनेचे माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर.
बुलढाणा | 26 मे 2025

शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना, मुंबई जिल्हा शाखा बुलढाणा यांच्यातर्फे  दिनांक 26 मे 2025 रोजी मा. जिल्हाधिकारी, बुलढाणा यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात दिव्यांग अधिकारी, कर्मचारी आणि शिक्षकांच्या न्याय्य व प्रलंबित मागण्यांचा पाढा मांडत प्रशासनाकडून वारंवार होत असलेल्या दुर्लक्षाविरोधात निवेदन  देण्यात आले.

ठळक मुद्दे:

1. दिव्यांग ग्रामसेवकास झालेली मारहाण:
असोला बु  तालुका चिखली येथील  दिव्यांग ग्रामसेवक एस एस सवडतकर यांना  नुकतीच झालेली मारहाणीची घटना अत्यंत गंभीर असून, संबंधित आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी संघटनेने केली. दिव्यांग कर्मचाऱ्यांवरील कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन केला जाणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
2. दिव्यांग तक्रार निवारण समितीचा अभाव – RPWD कायदा कलम 23 नुसार:
दिव्यांग व्यक्ती हक्क संरक्षण कायदा 2016 (RPWD Act) अंतर्गत कलम 23 नुसार प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग तक्रार निवारण समितीची स्थापना बंधनकारक आहे. परंतु बुलढाणा जिल्ह्यात सदर समिती चे कार्य दिसून येत नाही, हे अत्यंत खेदजनक आहे. परिणामी, दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या तक्रारी वेळेत नोंदवल्या जात नाहीत आणि त्यांना न्याय मिळत नाही.
3. प्रशासनाचे दुर्लक्ष – 
संघटनेने स्पष्टपणे नमूद केले की, शासन निर्णयानुसार दिव्यांग पदाची परीगनना 2016 पासून करून स्वतंत्र ज्येष्ठता यादी तयार कराव्यात व पदोन्नती देण्यात यावी. तसेच इतर  दिव्यांग  कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. अशा हलगर्जीपणामुळे दिव्यांग अधिकारी आणि कर्मचार्यांमध्ये असंतोष वाढत आहे.
संघटनेने मा. जिल्हाधिकारी यांच्याकडे विनंती केली की, वरील तिन्ही प्रमुख मुद्द्यांवर तातडीने बैठक घेऊन निर्णय घेण्यात यावा. तसेच सर्व खात्यांचे प्रमुख अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या समस्यांचा स्थायी व न्याय्य तोडगा काढण्यात यावा.

निवेदन प्रसंगी उपस्थित:
जिल्हाध्यक्ष मा. श्री. संजय भाऊ बनगाळे, जिल्हा सचिव मा. किशन केणे मानेगावकर, जिल्हा कार्याध्यक्ष मा. योगेशजी मुळे, मा. धनराज सातपुतळे सर, मा. राम जाधव सर, मा. राहुल कांबळे सर, मा. भांबळे साहेब व इतर दिव्यांग कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular Posts

*नम्रता गणेशराव धोत्रे कौलखेड अकोला या लाडक्या बहिणी विरुद्ध मलकापूर पो. स्टे. ला महाराष्ट्रातून पहिली तक्रार दाखल. मलकापूर (दिव्यांग शक्ती प्रतिनिध)ी*नुकताच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहिर केली मात्र अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसत आहे.अर्जदार महीला नम्रता यांनी प्रथमतः दि. ३०-०८-२०२४ रोजी योजनेचा अर्ज केला व अंतिमतः दि. ०२-०९-२०२४ रोजी त्यांचा शासनाद्वारे अर्ज मंजुर करण्यात आला आहे व त्याप्रमाणे प्रस्तुत अर्जदार हिस दरमहा १५००/- रूपये प्रमाणे निधी तिचे खात्यात प्राप्त झाला आहे. खरे म्हणजे अर्जदार नम्रता हिने खोटे व बनावटी हमीपत्राचा दस्त तयार करून त्यात खोटी व बनावटी माहित दिली व तो खरा आहे असे भासवुना जाणीव पूर्वक सदर दस्त संबंधीत अधिकाऱ्यांकडे सादर केला.त्याद्वारे शासनाची फसवणुक करून स्वतःचा गैरहक्की आर्थिक लाभ प्राप्त केला आहे.याबाबत सविस्तर असे की सदर योजने करीता पात्रता निकष असे की,ज्या महिलेच्या एकत्रीत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० /- रूपयांपेक्षा अधिक आहे, ज्या कुटूंबातील सदस्य आयकर दाता आहे, ज्या कुटूंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी म्हणुन सेवानिवृत्ती नंतर सेवानिवृत्ती वेतन घेतात, ज्यांच्या कुटूंबात चारचाकी वाहन आहे किंवा ज्या कुटूंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरत नाही. पात्र अर्जदार लाडक्या बहिणीला तसे हमीपत्र सुद्धा द्यावे लागते.असे निकष असताना अर्जदार लाडकी बहिण नम्रता हिने तिचे लग्नानंतरचे नावाने अर्ज केला आहे. सदर अर्जदार हिचे सासर कडील एकत्र कुटूंबाचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त आहे, सदर अर्जदार हिचे सासरे सेवानिवृत्ती वेतन घेतात, त्यांचे पती दिपक चांभारे पाटील नावाने एकुण ६ एकर शेतजमिन आहे. म्हणजेच निकषाप्रमाणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे. असे असतांना देखील व सदरची बाब पुर्णतः माहिती व जाणीवेतील असतांना देखील प्रस्तुत अर्जदार हिने खोटे हमीपत्र निष्पादीत केले व सदर हमीपत्र व त्यातील मजकुर खोटा आहे याची माहिती व जाणीव असतांना गैरहक्की आर्थिक लाभाचे दुषित हेतुने त्याचा वापर करून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा आर्थिक लाभ प्राप्त करून घेतला आहे.प्रस्तुत अर्जदार ही तिचे पतीपासून गेल्या पाच ते सहा वर्षापासुन विभक्त राहत आहे. त्यांचेदरम्यान अकोला येथील न्यायालयात खावटीकरीता न्यायालयीन प्रकरणे सुरू असून सदर अर्जदार हिस तिचे पतीपासून एकत्रीतरित्या दरमहा ५०,००० /- रूपये खावटी मंजुर झाल्याची देखील तक्रारीत नमूद आहे. सबब निकषास पात्र नसतांना देखील खोटी माहिती देवून व खरी माहिती लपवून सदर अर्जदार हिने योजनेचा लाभ मिळविला आहे. सदर अर्जदार हिचे माहेरचे नांव नम्रता गणेश धोत्रे आहे व सदर धोत्रे परिवारात चारचाकी वाहन आहे व त्या परिवाराचे उत्पन्न देखील अडीच लाखापेक्षा जास्त आहे. असे असतांना स्वतःचे वैवाहिकस्थितीबाबत खोटी माहिती प्रस्तुत अर्जदाराने दिली असून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला आहे.सदर महिती जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसिलदार, मलकापूर यांचेकडून अर्ज व त्यासोबतची कागदपत्र यांची माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागणी केली असता. अर्जदार नम्रता यांनी खोटे हमीपत्र तयार करून त्यात खोटी माहिती देऊन शासनाची फसवणुक केल्याबाबतची व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला असल्याचे दिसले. नम्रता यांचे सदरचे कृत्य दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा असून त्याबाबत त्यांच्या विरूध्द मलकापूर पो. स्टे. ला फिर्याद श्री. राजेंद्र काजळे यांनी दिली आहे.