*गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप* *गुंजकर एज्युकेशन हबमध्ये १० वी १२ वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार*

*गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप* 

 *गुंजकर एज्युकेशन हबमध्ये १० वी १२ वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार* 
खामगाव - (संतोष आटोळे)

 शिक्षण क्षेत्रात उत्क्रांती घडविणाऱ्या प्रा. रामकृष्ण गुंजकर सरांच्या गुंजकर एज्युकेशन हबमध्ये दरवर्षीप्रमाणे काल २९ मे रोजी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर आवार मधील १० च्या व गुंजकर ज्युनिअर कॉलेजमधील १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
     नुकतेच निकाल जाहीर झालेल्या एचएससी परीक्षेत  शहरातून प्रथम येण्याचा मान हा गुंजकर कॉलेजला मिळाला आहे.  ही बाब कॉलेजसाठी नक्कीच अभिमानास्पद आहे, तसेच विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणारी आहे. आजच्या गुंजकर एज्युकेशन हबचे नाव उंचावणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत त्यांना प्रोत्साहित करण्याकरिता प्रा. रामकृष्ण गुंजकर सरांच्या संकल्पनेतून दरवर्षी प्रमाणे काल गुंजकर एज्युकेशन हबमध्ये सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामकृष्ण गुंजकर हे होते.तर संस्थेच्या सचिव सौ. सुरेखा गुंजकर, ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य सतीश रायबोले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बारावी मधून  प्रथम येण्याचा मान मिळविणारा स्पर्श मुनोत(९६%) दुसरी येणारी कु.रिद्धी जैन (९३.९०%)  तिसरी येणारी  कु. पलक संचेती (९३.८३%) सायन्स शाखेमधून प्रथम येणारी कु.सानिका गुंजकर (८८.१७% ) तसेच जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलरमध्ये दहावीत प्रथम येणारी  प्रगती मेतकर(९५.६०% ) दुसरी येणारी श्रुती लाहुडकर (९४.४०%) तिसरी येणारी अनुष्का देशमुख (९३.६०%) यांचा तसेच इतर चांगले गुण मिळविणारे विद्यार्थी श्रुती भोरे  93.20%, सेजल  खराटे 92.60%, अनुजा ढोरे 92.60%, ऋतुजा टिकार 91.60%, सानिका थेटे 91.40%, चेतन पांढरे 91.00%, जानवी ढोरे 90.40%, प्रणाली मेतकर 
89.80%, जागृती रबडे 89.80%, पूजा वांडे 89.80%, आदित्य चिमकर 
89.60, मेघा लगर 89.60%, ऋतुजा काळणे 89.60%, अर्जुन कापले 89.60%, ओम प्रकाश मस्के 89.20%, रोशन तायडे 89%, आर्यन नेरकर 88.20%, सेजल राजगुरु 88.20%, मयूर पाटेखेडे 88.80%  आर्या  जोहरने 87.60%, या  विद्यार्थ्यांचा यथोचित स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन संस्थेच्या वतीने अध्यक्ष प्रा. गुंजकर सर यांनी सत्कार केला तसेच पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या सत्कार सोहळ्याला काही गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.

Comments

Popular Posts

*नम्रता गणेशराव धोत्रे कौलखेड अकोला या लाडक्या बहिणी विरुद्ध मलकापूर पो. स्टे. ला महाराष्ट्रातून पहिली तक्रार दाखल. मलकापूर (दिव्यांग शक्ती प्रतिनिध)ी*नुकताच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहिर केली मात्र अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसत आहे.अर्जदार महीला नम्रता यांनी प्रथमतः दि. ३०-०८-२०२४ रोजी योजनेचा अर्ज केला व अंतिमतः दि. ०२-०९-२०२४ रोजी त्यांचा शासनाद्वारे अर्ज मंजुर करण्यात आला आहे व त्याप्रमाणे प्रस्तुत अर्जदार हिस दरमहा १५००/- रूपये प्रमाणे निधी तिचे खात्यात प्राप्त झाला आहे. खरे म्हणजे अर्जदार नम्रता हिने खोटे व बनावटी हमीपत्राचा दस्त तयार करून त्यात खोटी व बनावटी माहित दिली व तो खरा आहे असे भासवुना जाणीव पूर्वक सदर दस्त संबंधीत अधिकाऱ्यांकडे सादर केला.त्याद्वारे शासनाची फसवणुक करून स्वतःचा गैरहक्की आर्थिक लाभ प्राप्त केला आहे.याबाबत सविस्तर असे की सदर योजने करीता पात्रता निकष असे की,ज्या महिलेच्या एकत्रीत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० /- रूपयांपेक्षा अधिक आहे, ज्या कुटूंबातील सदस्य आयकर दाता आहे, ज्या कुटूंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी म्हणुन सेवानिवृत्ती नंतर सेवानिवृत्ती वेतन घेतात, ज्यांच्या कुटूंबात चारचाकी वाहन आहे किंवा ज्या कुटूंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरत नाही. पात्र अर्जदार लाडक्या बहिणीला तसे हमीपत्र सुद्धा द्यावे लागते.असे निकष असताना अर्जदार लाडकी बहिण नम्रता हिने तिचे लग्नानंतरचे नावाने अर्ज केला आहे. सदर अर्जदार हिचे सासर कडील एकत्र कुटूंबाचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त आहे, सदर अर्जदार हिचे सासरे सेवानिवृत्ती वेतन घेतात, त्यांचे पती दिपक चांभारे पाटील नावाने एकुण ६ एकर शेतजमिन आहे. म्हणजेच निकषाप्रमाणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे. असे असतांना देखील व सदरची बाब पुर्णतः माहिती व जाणीवेतील असतांना देखील प्रस्तुत अर्जदार हिने खोटे हमीपत्र निष्पादीत केले व सदर हमीपत्र व त्यातील मजकुर खोटा आहे याची माहिती व जाणीव असतांना गैरहक्की आर्थिक लाभाचे दुषित हेतुने त्याचा वापर करून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा आर्थिक लाभ प्राप्त करून घेतला आहे.प्रस्तुत अर्जदार ही तिचे पतीपासून गेल्या पाच ते सहा वर्षापासुन विभक्त राहत आहे. त्यांचेदरम्यान अकोला येथील न्यायालयात खावटीकरीता न्यायालयीन प्रकरणे सुरू असून सदर अर्जदार हिस तिचे पतीपासून एकत्रीतरित्या दरमहा ५०,००० /- रूपये खावटी मंजुर झाल्याची देखील तक्रारीत नमूद आहे. सबब निकषास पात्र नसतांना देखील खोटी माहिती देवून व खरी माहिती लपवून सदर अर्जदार हिने योजनेचा लाभ मिळविला आहे. सदर अर्जदार हिचे माहेरचे नांव नम्रता गणेश धोत्रे आहे व सदर धोत्रे परिवारात चारचाकी वाहन आहे व त्या परिवाराचे उत्पन्न देखील अडीच लाखापेक्षा जास्त आहे. असे असतांना स्वतःचे वैवाहिकस्थितीबाबत खोटी माहिती प्रस्तुत अर्जदाराने दिली असून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला आहे.सदर महिती जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसिलदार, मलकापूर यांचेकडून अर्ज व त्यासोबतची कागदपत्र यांची माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागणी केली असता. अर्जदार नम्रता यांनी खोटे हमीपत्र तयार करून त्यात खोटी माहिती देऊन शासनाची फसवणुक केल्याबाबतची व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला असल्याचे दिसले. नम्रता यांचे सदरचे कृत्य दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा असून त्याबाबत त्यांच्या विरूध्द मलकापूर पो. स्टे. ला फिर्याद श्री. राजेंद्र काजळे यांनी दिली आहे.