अभय योजनेअंतर्गत शास्तीच्या करामध्ये 30 जून पर्यंत मुदत वाढ द्यावी

अभय योजने अंतर्गत शास्तीच्या करामध्ये सूट मिळण्यासाठी नगर परिषदेने ३० जूनपर्यंत मुदतवाढ द्यावी l गणेशभाऊ चौकसे मित्र मंडळाची मागणी 
खामगाव (संतोष आटोळे)


 खामगाव नगर परिषदे मार्फत सद्यस्थितीत अभय योजनेअंतर्गत मालमत्ता धारकांना २ टक्के व्याजामध्ये सवलत मिळत असून योजनेचा लाभ देण्यासाठी ३ जून पर्यंत मुदत देण्यात आली आहे मात्र नागरिकांच्या सोयीसाठी  या  योजनेअंतर्गत सूट मिळण्यासाठी ३० जून पर्यंत मुदतवाढ द्यावी अशी मागणी गणेश भाऊ चौकसे मित्र मंडळाच्या वतीने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. खामगाव नगरपरिषद मार्फत मालमत्ताधारकांना लावण्यात येणारी शासकीय थकबाकी असल्यास अतिरिक्त २ टक्के मासिक व्याज यामध्ये अवय योजनेअंतर्गत सूट मिळावी अशी मागणी गणेश भाऊ चौकशी मित्र मंडळाचे अध्यक्ष गणेश भाऊ चौकसे यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली होती. यानंतर खामगाव नगर परिषदेच्या वतीने थकीत मालमत्ता कराचा भरणा करण्यासाठी लावण्यात येणारी शासकीय थकबाकी असल्यास अतिरिक्त २ टक्के मासिक व्याजामध्ये सूट देण्यात येत आहे सद्यस्थितीत नागरिक खामगाव नगर परिषदेमध्ये कराचा भरणा करण्यासाठी गर्दी करत आहेत. मात्र नगर परिषदेच्या वतीने नागरिकांच्या सुविधेसाठी यात ३ जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. परंतु सद्यस्थितीत शाळा महाविद्यालयामध्ये प्रवेशासाठी पालक व विद्यार्थी व्यस्त आहेत तसेच अवकाळी पावसामुळे व्यापारी तसेच नागरिक हवालदिल झालेला आहे. शेतकरी हे खरीप हंगामाचे शेती कामात व्यस्त आहेत त्यामुळे या योजनेचा अधिकाधिक लाभ घेण्यासाठी तसेच योजनेचा बट्ट्याबोळ होऊ नये यासाठी नागरिकांना सुविधा व्हावी या अनुषंगाने अभय योजनेची मुदत वाढ ३० जून पर्यंत वाढवणे गरजेचे आहे. खामगाव नगर परिषद प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे सन २०२५- २६ चे देयक नागरिकापर्यंत अद्यापही पोहोचलेले नाहीत. सद्यस्थितीत नगर परिषदेमध्ये कराचा भरणा करण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून कराचा भरणा करण्यासाठी कर्मचाऱ्यांची कमतरता दिसून येत आहे त्यामुळे या विभागात कर्मचारी वाढवण्याची गरज आहे.तसेच नागरिकाकडून डिजिटल स्वरूपात पेमेंट स्वीकारण्यात येत नाही त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. तरी मालमत्ता धारकाकडून कराचा मोठ्या प्रमाणावर भरणा होणार आहे त्यामुळे अभय योजनेला ३०  जून पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी तसेच नागरिका करून डिजिटल स्वरूपात पेमेंट स्वीकारण्याबाबत योग्य ती कार्यवाही  करण्याचे निर्देश मुख्याधिकारी यांनी द्यावेत असेही निवेदनात नमूद केले आहे.l चौकट - अभय योजना लागू करण्याचा केला होता पाठपुरावा - खामगाव नगर परिषदेमार्फत मालमत्ताधारकांना लावण्यात येणारी शासकीय थकबाकी यामध्ये अतिरिक्त दोन टक्के मासिक व्याज यामध्ये अभय योजनेअंतर्गत सूट मिळावी अशी मागणी गणेशभाऊ चौकसे मित्र मंडळाच्या वतीने २६ मार्च रोजी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे करण्यात आली होती त्यानंतर या निवेदनाची दखल घेऊन खामगाव नगर परिषदेने कराचा भरणा करण्यासाठी नागरिकांना अतिरिक्त २ टक्के मासिक व्याज कमी केले आहे. सद्यस्थितीत नागरिक कराचा भरणा करत असून याकरिता गणेशभाऊ चौकसे मित्र मंडळाने पाठपुरावा केला होता त्याचेच हे यश असल्याचे दिसून येत आहे.l बाईट - मालमत्ता धारकांना व्याजामध्ये १०० टक्के सूट मिळावी - अभय योजनेअंतर्गत थकीत मालमत्ताधारकांना कराचा भरणा करण्यासाठी  मासिक व्याजामध्ये  १०० टक्के सूट देण्यात यावी. तसेच राज्यातील नगरपरिषदा मालमत्ता धारकाकडून पठाणी पद्धतीने जी शास्तीकर वसूल करत आहे. त्यामध्ये नागरिकांना दिलासा देण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यांनी लक्ष घालून त्वरित आदेश काढावेत. म्हणजे जनता खुशहाल होईल. असे गणेशभाऊ चौकसे,  संस्थापक अध्यक्ष गणेशभाऊ चौकसे मित्र मंडळ च्या वतीने दिलेल्या नियोजनात कळविले आहे

Comments

Popular Posts

*नम्रता गणेशराव धोत्रे कौलखेड अकोला या लाडक्या बहिणी विरुद्ध मलकापूर पो. स्टे. ला महाराष्ट्रातून पहिली तक्रार दाखल. मलकापूर (दिव्यांग शक्ती प्रतिनिध)ी*नुकताच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहिर केली मात्र अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसत आहे.अर्जदार महीला नम्रता यांनी प्रथमतः दि. ३०-०८-२०२४ रोजी योजनेचा अर्ज केला व अंतिमतः दि. ०२-०९-२०२४ रोजी त्यांचा शासनाद्वारे अर्ज मंजुर करण्यात आला आहे व त्याप्रमाणे प्रस्तुत अर्जदार हिस दरमहा १५००/- रूपये प्रमाणे निधी तिचे खात्यात प्राप्त झाला आहे. खरे म्हणजे अर्जदार नम्रता हिने खोटे व बनावटी हमीपत्राचा दस्त तयार करून त्यात खोटी व बनावटी माहित दिली व तो खरा आहे असे भासवुना जाणीव पूर्वक सदर दस्त संबंधीत अधिकाऱ्यांकडे सादर केला.त्याद्वारे शासनाची फसवणुक करून स्वतःचा गैरहक्की आर्थिक लाभ प्राप्त केला आहे.याबाबत सविस्तर असे की सदर योजने करीता पात्रता निकष असे की,ज्या महिलेच्या एकत्रीत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० /- रूपयांपेक्षा अधिक आहे, ज्या कुटूंबातील सदस्य आयकर दाता आहे, ज्या कुटूंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी म्हणुन सेवानिवृत्ती नंतर सेवानिवृत्ती वेतन घेतात, ज्यांच्या कुटूंबात चारचाकी वाहन आहे किंवा ज्या कुटूंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरत नाही. पात्र अर्जदार लाडक्या बहिणीला तसे हमीपत्र सुद्धा द्यावे लागते.असे निकष असताना अर्जदार लाडकी बहिण नम्रता हिने तिचे लग्नानंतरचे नावाने अर्ज केला आहे. सदर अर्जदार हिचे सासर कडील एकत्र कुटूंबाचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त आहे, सदर अर्जदार हिचे सासरे सेवानिवृत्ती वेतन घेतात, त्यांचे पती दिपक चांभारे पाटील नावाने एकुण ६ एकर शेतजमिन आहे. म्हणजेच निकषाप्रमाणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे. असे असतांना देखील व सदरची बाब पुर्णतः माहिती व जाणीवेतील असतांना देखील प्रस्तुत अर्जदार हिने खोटे हमीपत्र निष्पादीत केले व सदर हमीपत्र व त्यातील मजकुर खोटा आहे याची माहिती व जाणीव असतांना गैरहक्की आर्थिक लाभाचे दुषित हेतुने त्याचा वापर करून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा आर्थिक लाभ प्राप्त करून घेतला आहे.प्रस्तुत अर्जदार ही तिचे पतीपासून गेल्या पाच ते सहा वर्षापासुन विभक्त राहत आहे. त्यांचेदरम्यान अकोला येथील न्यायालयात खावटीकरीता न्यायालयीन प्रकरणे सुरू असून सदर अर्जदार हिस तिचे पतीपासून एकत्रीतरित्या दरमहा ५०,००० /- रूपये खावटी मंजुर झाल्याची देखील तक्रारीत नमूद आहे. सबब निकषास पात्र नसतांना देखील खोटी माहिती देवून व खरी माहिती लपवून सदर अर्जदार हिने योजनेचा लाभ मिळविला आहे. सदर अर्जदार हिचे माहेरचे नांव नम्रता गणेश धोत्रे आहे व सदर धोत्रे परिवारात चारचाकी वाहन आहे व त्या परिवाराचे उत्पन्न देखील अडीच लाखापेक्षा जास्त आहे. असे असतांना स्वतःचे वैवाहिकस्थितीबाबत खोटी माहिती प्रस्तुत अर्जदाराने दिली असून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला आहे.सदर महिती जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसिलदार, मलकापूर यांचेकडून अर्ज व त्यासोबतची कागदपत्र यांची माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागणी केली असता. अर्जदार नम्रता यांनी खोटे हमीपत्र तयार करून त्यात खोटी माहिती देऊन शासनाची फसवणुक केल्याबाबतची व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला असल्याचे दिसले. नम्रता यांचे सदरचे कृत्य दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा असून त्याबाबत त्यांच्या विरूध्द मलकापूर पो. स्टे. ला फिर्याद श्री. राजेंद्र काजळे यांनी दिली आहे.