कलम 163 नुसार रेल्वेच्या जागेवर केलेल्या अतिक्रमण मुक्त संदर्भात आदेश 04/06/2025 ला कार्यवाही

कलम 163 नुसार रेल्वेच्या जागेवर केलेल्या अतिक्रमण मुक्त संदर्भात आदेश
04/06/2025 ला कार्यवाही
खामगाव 
 (संतोष आटोळे) 

भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलम १६३  नुसार खामगाव उपविभागीय अधिकारी यांनी आदेश  पारीत करीत  खामगांव रेल्वे स्टेशन प्रशासनाच्या जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याबाबत कलम १६३ भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ प्रमाणे जमावबंदी मनाई आदेश जारी होनेबाबत व विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांची नेमणूक होणेबाबत. जारी करण्यात आला आहे 
या मध्ये
  पोलीस स्टेशन अधिकारी खामगांव शहर यांचे पत्र गो.गा.क्र.६०२/२०२५ दि. २७/०५/२०२५. व सहा मंडल अभियंता (पश्चिम) सेंट्रल रेल्वे अकोला यांचे पत्र नं.AK/W/E-१.दि. २१/०५/२०२५ ज्याअर्थी पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन खामगांव शहर यांचे दिनांक २७/०५/२०२५ च्या पत्रान्वये सहा. मंडल अभियंता (पश्चिम) सेंट्रल रेल्वे अकोला यांचे दिनांक २६/०५/२०२५ चे पत्रानुसार खामगांव रेल्वे स्टेशन हद्दीत काही लोकांनी केलेले कच्चे पक्के अतिक्रमण केलेले असुन त्याबाबत रेल्वे प्रशासनाने अतिक्रमण काढण्याबाबत वारंवार सूचना देवुनही न काढल्याने दिनांक ०४/०६/२०२५ रोजी अतिक्रमण काढण्यात येणार असल्याचे कळविले आहे. व ज्याअर्थी त्या ठिकाणीच्या बहुतांश रहीवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या जमिनीवरील केलेले अतिक्रमण काढण्यास विरोध केला असुन त्यावेळी सदर अतिक्रमण धारक किंवा त्यांचे नातेवाईक, हस्तक किंवा समाजकंटका कडून भांडवल होवुन एखादा अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे डॉ. रामेश्वर पूरी उपविभागीय दंडाधिकारी खामगांव यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता चे कलम १६३ अन्वये  प्रदान करण्यात केलेल्या शक्तीनुसार पोलीस स्टेशन खामगांव शहर अंतर्गत खामगांव रेल्वे स्टेशन हद्दीत सार्वजनिक शांताता व सुव्यवस्था अबाधीत राहावी या करिता दिनांक ०४/०६/२०२५ रोजी सकाळी ८.०० वाजल्यापासुन अतिक्रमण काढे पावेतो या कालावधीत पोलीस स्टेशन खामगांव शहर अंतर्गत खामगांव रेल्वे स्टेशन हद्दीत भारतीय नागरीक सुरक्षा संहिताचे कलम १६२ अन्वये जमावबंदी मनाई आदेश जारी करण्यात येत आहे. सदर प्रतिबंधात्मक आदेशामध्ये खालील बाबी प्रामुख्याने समाविष्ट आहेत. सदर आदेशाचे उल्लंघन करणा-या विरुध्द नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल. सदरचे आदेश पोलीस विभागाने जाहीर करुन त्यास प्रसिध्दी करण्याचे असेही आदेशीत करीत आहे. 
१. सदरचे परिसरात कोणही व्यक्ती किंवा जमाव एकत्रितरित्या प्रवेश करणार नाहीत. २. सदरचे परिसरात घोषणा देता येणार नाही. ३. सदरचे परिसरात व्यक्ती, जमाव, हस्तक, समाजकंटक अथवा अन्य व्यक्तीकडून शांतता बाधा निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करता येणार नाही. ४. सदरचे परिसरात कोणत्याही अनधिकृत व्यक्तीस वाहनास प्रवेश मनाई आहे. ५. सदर परिसरातील नियुक्त केलेले अधिकारी व कर्मचारी यांना प्रवेश करण्याचे निर्बंधा पासून वगळण्यात आलेले आहेत, उपरोक्त बाबीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी.
असेही आदेशात डॉक्टर रामेश्वर पुरी उपविभागीय अधिकारी यांनी कळविले आहे

Comments

Popular Posts

*नम्रता गणेशराव धोत्रे कौलखेड अकोला या लाडक्या बहिणी विरुद्ध मलकापूर पो. स्टे. ला महाराष्ट्रातून पहिली तक्रार दाखल. मलकापूर (दिव्यांग शक्ती प्रतिनिध)ी*नुकताच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहिर केली मात्र अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसत आहे.अर्जदार महीला नम्रता यांनी प्रथमतः दि. ३०-०८-२०२४ रोजी योजनेचा अर्ज केला व अंतिमतः दि. ०२-०९-२०२४ रोजी त्यांचा शासनाद्वारे अर्ज मंजुर करण्यात आला आहे व त्याप्रमाणे प्रस्तुत अर्जदार हिस दरमहा १५००/- रूपये प्रमाणे निधी तिचे खात्यात प्राप्त झाला आहे. खरे म्हणजे अर्जदार नम्रता हिने खोटे व बनावटी हमीपत्राचा दस्त तयार करून त्यात खोटी व बनावटी माहित दिली व तो खरा आहे असे भासवुना जाणीव पूर्वक सदर दस्त संबंधीत अधिकाऱ्यांकडे सादर केला.त्याद्वारे शासनाची फसवणुक करून स्वतःचा गैरहक्की आर्थिक लाभ प्राप्त केला आहे.याबाबत सविस्तर असे की सदर योजने करीता पात्रता निकष असे की,ज्या महिलेच्या एकत्रीत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० /- रूपयांपेक्षा अधिक आहे, ज्या कुटूंबातील सदस्य आयकर दाता आहे, ज्या कुटूंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी म्हणुन सेवानिवृत्ती नंतर सेवानिवृत्ती वेतन घेतात, ज्यांच्या कुटूंबात चारचाकी वाहन आहे किंवा ज्या कुटूंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरत नाही. पात्र अर्जदार लाडक्या बहिणीला तसे हमीपत्र सुद्धा द्यावे लागते.असे निकष असताना अर्जदार लाडकी बहिण नम्रता हिने तिचे लग्नानंतरचे नावाने अर्ज केला आहे. सदर अर्जदार हिचे सासर कडील एकत्र कुटूंबाचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त आहे, सदर अर्जदार हिचे सासरे सेवानिवृत्ती वेतन घेतात, त्यांचे पती दिपक चांभारे पाटील नावाने एकुण ६ एकर शेतजमिन आहे. म्हणजेच निकषाप्रमाणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे. असे असतांना देखील व सदरची बाब पुर्णतः माहिती व जाणीवेतील असतांना देखील प्रस्तुत अर्जदार हिने खोटे हमीपत्र निष्पादीत केले व सदर हमीपत्र व त्यातील मजकुर खोटा आहे याची माहिती व जाणीव असतांना गैरहक्की आर्थिक लाभाचे दुषित हेतुने त्याचा वापर करून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा आर्थिक लाभ प्राप्त करून घेतला आहे.प्रस्तुत अर्जदार ही तिचे पतीपासून गेल्या पाच ते सहा वर्षापासुन विभक्त राहत आहे. त्यांचेदरम्यान अकोला येथील न्यायालयात खावटीकरीता न्यायालयीन प्रकरणे सुरू असून सदर अर्जदार हिस तिचे पतीपासून एकत्रीतरित्या दरमहा ५०,००० /- रूपये खावटी मंजुर झाल्याची देखील तक्रारीत नमूद आहे. सबब निकषास पात्र नसतांना देखील खोटी माहिती देवून व खरी माहिती लपवून सदर अर्जदार हिने योजनेचा लाभ मिळविला आहे. सदर अर्जदार हिचे माहेरचे नांव नम्रता गणेश धोत्रे आहे व सदर धोत्रे परिवारात चारचाकी वाहन आहे व त्या परिवाराचे उत्पन्न देखील अडीच लाखापेक्षा जास्त आहे. असे असतांना स्वतःचे वैवाहिकस्थितीबाबत खोटी माहिती प्रस्तुत अर्जदाराने दिली असून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला आहे.सदर महिती जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसिलदार, मलकापूर यांचेकडून अर्ज व त्यासोबतची कागदपत्र यांची माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागणी केली असता. अर्जदार नम्रता यांनी खोटे हमीपत्र तयार करून त्यात खोटी माहिती देऊन शासनाची फसवणुक केल्याबाबतची व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला असल्याचे दिसले. नम्रता यांचे सदरचे कृत्य दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा असून त्याबाबत त्यांच्या विरूध्द मलकापूर पो. स्टे. ला फिर्याद श्री. राजेंद्र काजळे यांनी दिली आहे.