*चला जाणून घ्या दिव्यांग प्रमाणपत्र कसे कोणाला मिळते , तर खामगाव साठी संपर्क कुठे करावा*

चला जाणून घ्या दिव्यांग प्रमाणपत्र कसे कोणाला मिळते

खामगांव (शेखर तायडे)

अपंग व्यक्तींच्या हक्क कायदा, २०१६ अंतर्गत २१ प्रकारचे अपंगत्व आहेत, ज्यामध्ये दृष्टिहीन, श्रवणदोष, हालचाल अशक्तपणा, बौनेपणा, बौद्धिक अपंगत्व, मानसिक आजार, ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर, सेरेब्रल पाल्सी, मस्क्युलर डिस्ट्रॉफी, क्रॉनिक न्यूरोलॉजिकल स्थिती, विशिष्ट शिक्षण अशक्तपणा, बहुविध अपंगत्व, अ‍ॅसिड हल्ल्याचे बळी, कुष्ठरोगातून वाचलेले, बोलणे आणि भाषा अपंगत्व, थॅलेसेमिया, हिमोफिलिया, सिकलसेल रोग, मल्टिपल स्क्लेरोसिस आणि पार्किन्सन रोग यांचा समावेश आहे.
यासाठी वरील पैकी कोणताही अपंगत्व आल्यास आपण वैद्यकीय महाविद्यालय जिल्हा शल्य चिकित्सक आदेशित असलेली सामान्य रुग्णालय याठिकाणी तपासणी करण्यात येऊन प्रमाणपत्र देण्यात येते
हे मिळविण्यासाठी आपले आधार कार्ड,रेशन कार्ड पेन कार्ड पासपोर्ट फोटो तसेच ज्यात अपंगत्व आले आहे त्याचे मागील वर्ष झाले असलेली रुग्णालय उपचार कागद पत्र वैद्यकीय अधिकाऱ्यांना दाखवावी
तर आपल्या खामगाव येथे  शेगाव,संग्रामपूर,जळगांव जामोद,नांदुरा मलकापूर व खामगाव या तालुक्यातील अपंगत्व आलेल्यानी दर बुधवारी सकाळी लवकर नऊ वाजता सामान्य रुग्णालय शेगाव रोड खामगाव येथे ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करून आपली व्यक्तिगत माहितीचा अर्ज भरून रुग्णालयाची पावती घ्यावी
त्यानंतर विविध विभागातील तज्ञ डॉक्टर ही कागदपत्रे पाहून आपल्याला योग्य मार्गदर्शन करत प्रमाणपत्र नियमाप्रमाणे देतील यासह प्रमाणपत्र सोबत यु डी आय डी कार्ड आपल्या येथे भारतीय डाक सेवेच्या माध्यमातून घरपोच प्राप्त होतात 
तर वरील पैकी काही प्रमाणपत्र बुलढाणा,अकोला,छत्रपती संभाजी नगर येथे मिळतात
काही अडचण असल्यास दिव्यांग शक्ती कार्यालयात येऊन आपण मदत घेऊ शकता  या मदतीकरिता कुठलेच शुल्क आकारले जात नाही 
अधिक माहितीसाठी 
7770010084/9371664790 यावर सकाळी आठ ते संध्याकाळी सात वाजे पर्यंत संपर्क साधावा 

Comments

Popular Posts

*नम्रता गणेशराव धोत्रे कौलखेड अकोला या लाडक्या बहिणी विरुद्ध मलकापूर पो. स्टे. ला महाराष्ट्रातून पहिली तक्रार दाखल. मलकापूर (दिव्यांग शक्ती प्रतिनिध)ी*नुकताच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहिर केली मात्र अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसत आहे.अर्जदार महीला नम्रता यांनी प्रथमतः दि. ३०-०८-२०२४ रोजी योजनेचा अर्ज केला व अंतिमतः दि. ०२-०९-२०२४ रोजी त्यांचा शासनाद्वारे अर्ज मंजुर करण्यात आला आहे व त्याप्रमाणे प्रस्तुत अर्जदार हिस दरमहा १५००/- रूपये प्रमाणे निधी तिचे खात्यात प्राप्त झाला आहे. खरे म्हणजे अर्जदार नम्रता हिने खोटे व बनावटी हमीपत्राचा दस्त तयार करून त्यात खोटी व बनावटी माहित दिली व तो खरा आहे असे भासवुना जाणीव पूर्वक सदर दस्त संबंधीत अधिकाऱ्यांकडे सादर केला.त्याद्वारे शासनाची फसवणुक करून स्वतःचा गैरहक्की आर्थिक लाभ प्राप्त केला आहे.याबाबत सविस्तर असे की सदर योजने करीता पात्रता निकष असे की,ज्या महिलेच्या एकत्रीत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० /- रूपयांपेक्षा अधिक आहे, ज्या कुटूंबातील सदस्य आयकर दाता आहे, ज्या कुटूंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी म्हणुन सेवानिवृत्ती नंतर सेवानिवृत्ती वेतन घेतात, ज्यांच्या कुटूंबात चारचाकी वाहन आहे किंवा ज्या कुटूंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरत नाही. पात्र अर्जदार लाडक्या बहिणीला तसे हमीपत्र सुद्धा द्यावे लागते.असे निकष असताना अर्जदार लाडकी बहिण नम्रता हिने तिचे लग्नानंतरचे नावाने अर्ज केला आहे. सदर अर्जदार हिचे सासर कडील एकत्र कुटूंबाचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त आहे, सदर अर्जदार हिचे सासरे सेवानिवृत्ती वेतन घेतात, त्यांचे पती दिपक चांभारे पाटील नावाने एकुण ६ एकर शेतजमिन आहे. म्हणजेच निकषाप्रमाणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे. असे असतांना देखील व सदरची बाब पुर्णतः माहिती व जाणीवेतील असतांना देखील प्रस्तुत अर्जदार हिने खोटे हमीपत्र निष्पादीत केले व सदर हमीपत्र व त्यातील मजकुर खोटा आहे याची माहिती व जाणीव असतांना गैरहक्की आर्थिक लाभाचे दुषित हेतुने त्याचा वापर करून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा आर्थिक लाभ प्राप्त करून घेतला आहे.प्रस्तुत अर्जदार ही तिचे पतीपासून गेल्या पाच ते सहा वर्षापासुन विभक्त राहत आहे. त्यांचेदरम्यान अकोला येथील न्यायालयात खावटीकरीता न्यायालयीन प्रकरणे सुरू असून सदर अर्जदार हिस तिचे पतीपासून एकत्रीतरित्या दरमहा ५०,००० /- रूपये खावटी मंजुर झाल्याची देखील तक्रारीत नमूद आहे. सबब निकषास पात्र नसतांना देखील खोटी माहिती देवून व खरी माहिती लपवून सदर अर्जदार हिने योजनेचा लाभ मिळविला आहे. सदर अर्जदार हिचे माहेरचे नांव नम्रता गणेश धोत्रे आहे व सदर धोत्रे परिवारात चारचाकी वाहन आहे व त्या परिवाराचे उत्पन्न देखील अडीच लाखापेक्षा जास्त आहे. असे असतांना स्वतःचे वैवाहिकस्थितीबाबत खोटी माहिती प्रस्तुत अर्जदाराने दिली असून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला आहे.सदर महिती जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसिलदार, मलकापूर यांचेकडून अर्ज व त्यासोबतची कागदपत्र यांची माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागणी केली असता. अर्जदार नम्रता यांनी खोटे हमीपत्र तयार करून त्यात खोटी माहिती देऊन शासनाची फसवणुक केल्याबाबतची व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला असल्याचे दिसले. नम्रता यांचे सदरचे कृत्य दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा असून त्याबाबत त्यांच्या विरूध्द मलकापूर पो. स्टे. ला फिर्याद श्री. राजेंद्र काजळे यांनी दिली आहे.