45 डिग्री मध्ये फरदापुर मोताळा लॉंग मार्च निघणार..रस्त्यासाठी सर्वस्व पणाला लावणार ग्रामस्थांनी घेतली शपथ



45 डिग्री मध्ये फरदापुर मोताळा लॉंग मार्च निघणार..
रस्त्यासाठी सर्वस्व पणाला लावणार ग्रामस्थांनी घेतली शपथ.

रस्ते मिळेपर्यंत संघर्ष अटळ आहे.
           अँड.सतीशचंद्र रोठे.
बुलढाणा मोताळा 
देशाला स्वातंत्र्य मिळाले फर्दापूरच्या रस्त्यांना केव्हा मिळेल..? साहेब आम्हाला रस्ते द्या हो..! आम्ही स्वातंत्र भारतात राहतो आमचा अधिकार आम्हाला द्या हो...  असा आर्थ  टाहो फोडत मोताळा तालुक्यातील ऐतिहासिक लॉंग मार्च 28 मार्चला सकाळी अकरा वाजता फरदापुरातून मोताळा तहसील साठी आगेकूच करणार आहे.
आबाल, वृद्ध ,महिला, मुली,पुरुष गावातील प्रत्येक व्यक्ती या लॉन्ग मार्चमध्ये सहभागी होणार आहे. तर पंचक्रोशीतील गावकऱ्यांसह विविध संघटनांचाही सहभाग लॉन्ग मार्चला मिळणार आहे.
मोताळा तालुक्यातील बहुचर्चित फरदापुर गावातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेण्यासाठी गावकऱ्यांनी 27 एप्रिल ला सायंकाळी अर्धापुरात आढावा बैठक घेतली. यावेळी सदर बैठकीला गावातील पंचक्रोशीतील बहुसंख्य नागरिकांची प्रामुख्याने उपस्थिती होती. बैठकीदरम्यान समस्त ग्रामस्थांनी  फरदापुर रस्त्यांसाठी सर्वस्व पणाला लावण्याची शपथ घेतली.तर जोपर्यंत फरदापुर चे रस्ते अतिक्रमण मुक्त होऊन गावकऱ्यांना रस्ता तयार होऊन मिळत नाही तोपर्यंत संघर्ष चालू ठेवणार असा इशारा यावेळी लॉंग मार्च चे संयोजक प्रबोधनकार ॲड.सतीशचंद्र रोठे पाटील यांनी आढावा बैठकी ला  मार्गदर्शन करताना दिला आहे.
सकाळी 11 वाजता लॉन्ग मार्चला सुरुवात होऊन तहसीलदारामार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व संबंधित प्रशासनाला फरदापुर रस्त्यांसह पिक विमा, अतिवृष्टी,कर्जमाफी, अनधिकृत घरगुती गॅस सिलेंडरचा वापर,अनधिकृत व्यवसाय आदी मागण्यांचे निवेदन सभेनंतर सादर करण्यात येणार आहे.
फरदापुर ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील गावकऱ्यांनी शेतकऱ्यांनी सदर ऐतिहासिक लॉन्ग मार्चमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक ग्राम स्वराज्य समिती, फरदापुर ग्रामस्थ, आझाद हिंद शेतकरी संघटना, राष्ट्रीय बजरंग दल, किसान ब्रिगेड, रमाई ब्रिगेड आदी संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे. 
___
तगडा पोलीस बंदोबस्तासह प्रशासन अलर्ट मोडवर.

ॲम्बुलन्स,प्राथमिक उपचार केंद्रही सोबत.

43 ते 45 डिग्री उन्हाचा पारा 28 एप्रिल ला राहणार आहे. त्यामुळे प्रशासनासह आंदोलकही अलर्टमोडवर आहेत.जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय,डीएसबी विभाग, धामणगाव बढे पोलीस स्टेशन आणि बोराखेडी पोलीस स्टेशनचा तगडा पोलिस बंदोबस्त राहणार आहे. तर जिल्हा प्रशासन आणि जिल्हा रुग्णालयाच्या वतीने ॲम्बुलन्स, प्राथमिक औषधोपचार केंद्र, पिण्याचे पाणी, नींबू शरबत आदींची व्यवस्था चोख ठेवली आहे.

Comments

Popular Posts

*नम्रता गणेशराव धोत्रे कौलखेड अकोला या लाडक्या बहिणी विरुद्ध मलकापूर पो. स्टे. ला महाराष्ट्रातून पहिली तक्रार दाखल. मलकापूर (दिव्यांग शक्ती प्रतिनिध)ी*नुकताच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहिर केली मात्र अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसत आहे.अर्जदार महीला नम्रता यांनी प्रथमतः दि. ३०-०८-२०२४ रोजी योजनेचा अर्ज केला व अंतिमतः दि. ०२-०९-२०२४ रोजी त्यांचा शासनाद्वारे अर्ज मंजुर करण्यात आला आहे व त्याप्रमाणे प्रस्तुत अर्जदार हिस दरमहा १५००/- रूपये प्रमाणे निधी तिचे खात्यात प्राप्त झाला आहे. खरे म्हणजे अर्जदार नम्रता हिने खोटे व बनावटी हमीपत्राचा दस्त तयार करून त्यात खोटी व बनावटी माहित दिली व तो खरा आहे असे भासवुना जाणीव पूर्वक सदर दस्त संबंधीत अधिकाऱ्यांकडे सादर केला.त्याद्वारे शासनाची फसवणुक करून स्वतःचा गैरहक्की आर्थिक लाभ प्राप्त केला आहे.याबाबत सविस्तर असे की सदर योजने करीता पात्रता निकष असे की,ज्या महिलेच्या एकत्रीत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० /- रूपयांपेक्षा अधिक आहे, ज्या कुटूंबातील सदस्य आयकर दाता आहे, ज्या कुटूंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी म्हणुन सेवानिवृत्ती नंतर सेवानिवृत्ती वेतन घेतात, ज्यांच्या कुटूंबात चारचाकी वाहन आहे किंवा ज्या कुटूंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरत नाही. पात्र अर्जदार लाडक्या बहिणीला तसे हमीपत्र सुद्धा द्यावे लागते.असे निकष असताना अर्जदार लाडकी बहिण नम्रता हिने तिचे लग्नानंतरचे नावाने अर्ज केला आहे. सदर अर्जदार हिचे सासर कडील एकत्र कुटूंबाचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त आहे, सदर अर्जदार हिचे सासरे सेवानिवृत्ती वेतन घेतात, त्यांचे पती दिपक चांभारे पाटील नावाने एकुण ६ एकर शेतजमिन आहे. म्हणजेच निकषाप्रमाणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे. असे असतांना देखील व सदरची बाब पुर्णतः माहिती व जाणीवेतील असतांना देखील प्रस्तुत अर्जदार हिने खोटे हमीपत्र निष्पादीत केले व सदर हमीपत्र व त्यातील मजकुर खोटा आहे याची माहिती व जाणीव असतांना गैरहक्की आर्थिक लाभाचे दुषित हेतुने त्याचा वापर करून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा आर्थिक लाभ प्राप्त करून घेतला आहे.प्रस्तुत अर्जदार ही तिचे पतीपासून गेल्या पाच ते सहा वर्षापासुन विभक्त राहत आहे. त्यांचेदरम्यान अकोला येथील न्यायालयात खावटीकरीता न्यायालयीन प्रकरणे सुरू असून सदर अर्जदार हिस तिचे पतीपासून एकत्रीतरित्या दरमहा ५०,००० /- रूपये खावटी मंजुर झाल्याची देखील तक्रारीत नमूद आहे. सबब निकषास पात्र नसतांना देखील खोटी माहिती देवून व खरी माहिती लपवून सदर अर्जदार हिने योजनेचा लाभ मिळविला आहे. सदर अर्जदार हिचे माहेरचे नांव नम्रता गणेश धोत्रे आहे व सदर धोत्रे परिवारात चारचाकी वाहन आहे व त्या परिवाराचे उत्पन्न देखील अडीच लाखापेक्षा जास्त आहे. असे असतांना स्वतःचे वैवाहिकस्थितीबाबत खोटी माहिती प्रस्तुत अर्जदाराने दिली असून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला आहे.सदर महिती जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसिलदार, मलकापूर यांचेकडून अर्ज व त्यासोबतची कागदपत्र यांची माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागणी केली असता. अर्जदार नम्रता यांनी खोटे हमीपत्र तयार करून त्यात खोटी माहिती देऊन शासनाची फसवणुक केल्याबाबतची व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला असल्याचे दिसले. नम्रता यांचे सदरचे कृत्य दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा असून त्याबाबत त्यांच्या विरूध्द मलकापूर पो. स्टे. ला फिर्याद श्री. राजेंद्र काजळे यांनी दिली आहे.