श्री राजेंद्र दीक्षित यांना महाराष्ट्र सन्मान पुरस्कार 2025 ने सन्मानित

श्री राजेंद्र दिक्षित *महाराष्ट्र भूषण सन्मान पुरस्कार 2025 ने सन्मानित*

पंचायत समिती अमरावती अंतर्गत येणाऱ्या जि प उच्च प्राथमिक शाळा कठोरा( बु) येथे कार्यरत असलेले  सहा.शिक्षक तसेच महा. राज्य अपंग कर्मचारी संघटना मुंबई 32 शाखा अमरावती चे जिल्हाध्यक्ष श्री राजेंद्र दिक्षित यांना महाराष्ट्र भूषण सन्मान 2025 पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.
   युवा महाराष्ट्र फाउंडेशन पुणे चे संस्थापक अध्यक्ष मा. श्री डॉ. अविनाश अंकुरे  व सचिव मा . श्री गणेश विटकर  स्वागत समिती व पुरस्कार समिती व प्रमुख अतिथी *पूजा राठोड अभिनेत्री*,*डॉ इलाशी गुप्ता अभिनेत्री( तानाजी चित्रपट )*मा. हसीनी सुधीर अभिनेत्री (साउथ चित्रपट)* *मा. रुचिरा जाधव अभिनेत्री*(*लागील प्रेमाचं चित्रपट*) यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला
युवा महाराष्ट्र फाउंडेशन पुणे च्या वतीने ज्यांनी त्यांच्या आयुष्यात केलेल्या शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य, सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य व साहित्य क्षेत्रातील भरिव योगदाना बद्दल  राज्यातील प्रत्येक जिल्हातील मानव विकासात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींना
*महाराष्ट्र भूषण सन्मान पुरस्कार 2025**देऊन गौरविण्यात येते. यावर्षी हा पुरस्कार श्री राजेंद्र दिक्षित यांना मिळाला आहे. सदरील  पुरस्कार सोहळा हा बुधवार 23 एप्रिल 2025 ला सकाळी 11ते 1 वाजे पर्यंत स्थळ पंडित जवाहरलाल नेहरू सभागृह, घोडे रोड, शिवाजीनगर ,पुणे येथे  घेण्यात आले. 
राज्य भरातील शैक्षणिक व उत्कृष्ट सामाजिक क्षेत्रांतील भरीव योगदान असणारे व्यक्तींना युवा महाराष्ट्र फाउंडेशन पुणे च्या वतीने   *महाराष्ट्र भूषण सन्मान पुरस्कार 2025* देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
 श्री राजेंद्र दिक्षित हे पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल  त्यांना पंचायत समिती अमरावतीचे गटशिक्षणाधिकारी मा. श्री धनंजय वानखडे ,प.स  चे गटशिक्षणाधिकारी डाँ नितिन उंडे  प.स अम चे शिक्षणविस्तार अधिकारी संदीप बोडखे, अजित पाटील, सुधीर खोडे व केंद्रप्रमुख अफसर खान, मोहन जाधव व महाराष्ट्र राज्य  अपंग कर्मचारी संघटना मुंबई 32 हे राज्याध्यक्ष रवींद्र पाटील राज्यसचिव परमेश्वर बाबर व सातारा जिल्हाध्यक्ष हनुमंत अवघडे सर बुलढाणा चे जिल्हाध्यक्ष व जिल्हा सचिव किसन केले व राज्य कार्यकारणी व अमरावती शाखा अमरावती चे जिल्हासचिव  किशोर मालोकार, कार्याध्यक्ष  चंद्रकांत मामनकर , कोषाध्यक्ष  युवराज थोरात , जिल्हा उपाध्यक्ष सौ शालिनी बोरखडे , उपाध्यक्ष श्री कपिल हडाले , सहसचिव सचिन इंगोले ,  प्रसिद्धी प्रमुख राजू डांगे,नितीन गायकी , संतोष चव्हाण , राजेश सावरकर, सुनिल कुकडे ,विलास बाबरे संदिप घाटे ,प्रशांत मुंदरे   व संघटनाचे सर्व जिल्हा कार्यकारणी व 14 तालुका चे तालुका कार्यकर्त्यांनी व सदस्य कडून व शिक्षक मिञ परिवार व दिव्यांग शक्ती च्या वतीने अभिनंदन केले आहे.

Comments

  1. दीक्षित सर, खूप खूप अभिनंदन

    ReplyDelete

Post a Comment

Popular Posts

*नम्रता गणेशराव धोत्रे कौलखेड अकोला या लाडक्या बहिणी विरुद्ध मलकापूर पो. स्टे. ला महाराष्ट्रातून पहिली तक्रार दाखल. मलकापूर (दिव्यांग शक्ती प्रतिनिध)ी*नुकताच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहिर केली मात्र अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसत आहे.अर्जदार महीला नम्रता यांनी प्रथमतः दि. ३०-०८-२०२४ रोजी योजनेचा अर्ज केला व अंतिमतः दि. ०२-०९-२०२४ रोजी त्यांचा शासनाद्वारे अर्ज मंजुर करण्यात आला आहे व त्याप्रमाणे प्रस्तुत अर्जदार हिस दरमहा १५००/- रूपये प्रमाणे निधी तिचे खात्यात प्राप्त झाला आहे. खरे म्हणजे अर्जदार नम्रता हिने खोटे व बनावटी हमीपत्राचा दस्त तयार करून त्यात खोटी व बनावटी माहित दिली व तो खरा आहे असे भासवुना जाणीव पूर्वक सदर दस्त संबंधीत अधिकाऱ्यांकडे सादर केला.त्याद्वारे शासनाची फसवणुक करून स्वतःचा गैरहक्की आर्थिक लाभ प्राप्त केला आहे.याबाबत सविस्तर असे की सदर योजने करीता पात्रता निकष असे की,ज्या महिलेच्या एकत्रीत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० /- रूपयांपेक्षा अधिक आहे, ज्या कुटूंबातील सदस्य आयकर दाता आहे, ज्या कुटूंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी म्हणुन सेवानिवृत्ती नंतर सेवानिवृत्ती वेतन घेतात, ज्यांच्या कुटूंबात चारचाकी वाहन आहे किंवा ज्या कुटूंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरत नाही. पात्र अर्जदार लाडक्या बहिणीला तसे हमीपत्र सुद्धा द्यावे लागते.असे निकष असताना अर्जदार लाडकी बहिण नम्रता हिने तिचे लग्नानंतरचे नावाने अर्ज केला आहे. सदर अर्जदार हिचे सासर कडील एकत्र कुटूंबाचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त आहे, सदर अर्जदार हिचे सासरे सेवानिवृत्ती वेतन घेतात, त्यांचे पती दिपक चांभारे पाटील नावाने एकुण ६ एकर शेतजमिन आहे. म्हणजेच निकषाप्रमाणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे. असे असतांना देखील व सदरची बाब पुर्णतः माहिती व जाणीवेतील असतांना देखील प्रस्तुत अर्जदार हिने खोटे हमीपत्र निष्पादीत केले व सदर हमीपत्र व त्यातील मजकुर खोटा आहे याची माहिती व जाणीव असतांना गैरहक्की आर्थिक लाभाचे दुषित हेतुने त्याचा वापर करून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा आर्थिक लाभ प्राप्त करून घेतला आहे.प्रस्तुत अर्जदार ही तिचे पतीपासून गेल्या पाच ते सहा वर्षापासुन विभक्त राहत आहे. त्यांचेदरम्यान अकोला येथील न्यायालयात खावटीकरीता न्यायालयीन प्रकरणे सुरू असून सदर अर्जदार हिस तिचे पतीपासून एकत्रीतरित्या दरमहा ५०,००० /- रूपये खावटी मंजुर झाल्याची देखील तक्रारीत नमूद आहे. सबब निकषास पात्र नसतांना देखील खोटी माहिती देवून व खरी माहिती लपवून सदर अर्जदार हिने योजनेचा लाभ मिळविला आहे. सदर अर्जदार हिचे माहेरचे नांव नम्रता गणेश धोत्रे आहे व सदर धोत्रे परिवारात चारचाकी वाहन आहे व त्या परिवाराचे उत्पन्न देखील अडीच लाखापेक्षा जास्त आहे. असे असतांना स्वतःचे वैवाहिकस्थितीबाबत खोटी माहिती प्रस्तुत अर्जदाराने दिली असून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला आहे.सदर महिती जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसिलदार, मलकापूर यांचेकडून अर्ज व त्यासोबतची कागदपत्र यांची माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागणी केली असता. अर्जदार नम्रता यांनी खोटे हमीपत्र तयार करून त्यात खोटी माहिती देऊन शासनाची फसवणुक केल्याबाबतची व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला असल्याचे दिसले. नम्रता यांचे सदरचे कृत्य दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा असून त्याबाबत त्यांच्या विरूध्द मलकापूर पो. स्टे. ला फिर्याद श्री. राजेंद्र काजळे यांनी दिली आहे.