खामगाव जिल्हा व्हावा व शेतकऱ्यांना संपुर्ण कर्जमाफी मिळावी या प्रमुख मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 1 मे रोजी धरणे आंदोलन

खामगाव जिल्हा व्हावा व शेतकऱ्यांना संपुर्ण कर्जमाफी मिळावी या प्रमुख मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 1 मे रोजी धरणे आंदोलन
धरणे आंदोलनामध्ये स्वयंस्फुतने हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे ...माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांचे आवाहन 
खामगाव ः- बुलढाणा जिल्हयाचे विभाजन करुन खामगाव जिल्हयासह स्वतंत्र लाखनवाडा तालुक्याची निर्मिती करण्यात यावी तसेच अस्मानी व सुल्तानी संकटात सापडलेल्या बळीराजाला मदतीचा हात देण्यासाठी महायुती सरकारने  निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे संपुर्ण कर्जमाफी देवुन बळीराजाला दिलासा देण्यात यावा या प्रमुख मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवार दि. 1 मे  महाराष्ट्र दिन,जागतिक कामगार दिनी मा.उपविभागीय अधिकारी खामगाव यांचे कार्यालयासमोर टॉवर चौक येथे माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
बुलढाणा जिल्हा भौगोलिक दृष्टया खुप मोठा असल्यामुळे घाटाखालील लोकांना सोयीचे होण्यासाठी बुलढाणा जिल्हयाचे विभाजन करुन खामगाव जिल्हयासह स्वतंत्र लाखनवाडा तालुक्याची निर्मिती करण्यात यावी  ही जनतेची अनेक वर्षापासुनची जिव्हाळयाची मागणी आहे. या मागणीसाठी आजपर्यंत अनेक आंदोलने झाली तरी देखील अद्यापपर्यंत खामगाव जिल्हा झालेला नाही.सन 2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे प्रचार सभेसाठी खामगाव येथे आले असता त्यांनी खामगावकरांना साद घालत खामगाव जिल्हा होईल असे संकेत दिले होते. परंतू अद्यापपर्यंत खामगाव जिल्हा झालेला नाही. मागील 25 वर्षापासुन खामगाव जिल्हा निर्मितीचा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित आहे. जर खामगाव जिल्हा झाला तर यामुळे जनतेचा फायदा होईल.म्हणून छोटे कुटुंब-सुखी कुटुंब या उक्तीप्रमाणे बुलढाणा जिल्हयाचे विभाजन करुन खामगाव जिल्हयासह स्वतंत्र लाखनवाडा तालुक्याची निर्मिती करण्यात यावी तसेच विधानसभा निवडणुकी दरम्यान राज्यातील महायुती सरकारने शेतकरी बांधवांना संपुर्ण
कर्जमाफी देवु असे आपल्या वचननाम्यामध्ये आश्वासन दिले होते. सध्या राज्यात निसर्गाच्या लहरीपणामुळे जगाचा पोशिंदा शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतमालाला हमी भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी अधिक कर्जबाजारी होत चालला असुन राज्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरुच आहे. अश्या परिस्थितीमध्ये राज्य सरकारने शेतकऱ्यांना संपुर्ण कर्जमाफी देवुन दिलासा द्यावा या प्रमुख मागण्यांसह शेतकऱ्यांच्या इतर रास्त मागण्यांकडेे शासनाचे लक्ष वेध्ाण्यासाठी गुरुवार दि.1 मे 2025 रोजी सकाळी 9 वाजता खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथुन शेतकरी बांधव व नागरीकांसह मोर्चा काढुन टिळक पुतळामार्गे,भारत कटपीस स्टोअर्स समोरुन, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळयाजवळुन,राष्ट्रपिता महात्मा गांधी उद्यानासमोरुन,टॉवर चौक येथे पोहचुन मा.उपविभागीय अधिकारी खामगाव यांचे
कार्यालयासमोर सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत हे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.तसेच याप्रसंगी जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवाद्यांकडुन निष्पाप भारतीयांवर गोळीबार करण्यात आला त्यामध्ये 28 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला.दहशतवाद्यांकडुन झालेल्या या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करुन हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या निष्पाप व्यक्तींना श्रध्दांजली वाहण्यात येणार आहे.तरी या धरणे आंदोलनामध्ये शेतकरी बांधवांसह खामगाव शहर व परिसरातील नागरीकांनी पक्षभेद विसरुन   मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले आहे.

--------
 1 मे महाराष्ट्र दिन,जागतिक कामगार दिन व विकासमहष माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दरवष विविध विधायक कार्यक्रमांचे आयोजन करुन लोकोपयोगी कार्यक्रम राबवुन राणाजींचा वाढदिवस साजरा करण्यात येत असतो.मागील 30 वर्षापासुन जनसेवेचा हा उपक्रम निरंतरपणे सुरु आहे.याहीवष माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या वाढदिवसानिमित्त विविध विधायक उपक्रम राबविण्यासाठी नियोजन करण्यात आले होते. परंतू दि.22 एप्रिल 2025 रोजी जम्मु काश्मीरमधील पहलगाम येथे निष्पाप भारतीय नागरीकांवर दहशतवाद्यांनी क्रुर हल्ला केला. यामध्ये 28 भारतीय नागरीक मृत्युमुखी पडले.ही दुःखद घटना घडल्यामुळे यावष 1 मे रोजी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या वाढदिवसानिमित्त होणारे कार्यक्रम रदद्‌‍ करण्यात आले आहे.त्यामुळे माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या वाढदिवशी कार्यकर्त्यांनी सत्कारासाइी हार,तुरे,शाल,श्रीफळ न आणता सत्कारासाठी होणाऱ्या खर्चाच्या रकमेतुन सामाजिक व लोकोपयोगी कामांना प्राधान्य द्यावे व त्या दृष्टीने नियोजन करावे आणि 1 मे रोजी आयोजित धरणे आंदोलन व सायंकाळी 5 वाजता सामान्य रुग्णालय येथे आयोजित रुग्णांना फळवाटप, शरबत वितरण व अपंगांना तीन चाकी सायकल वाटप या कार्यक्रमांना मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सानंदा मित्र मंडळ,राणा फाऊंडेशनच्या,सीएम हेल्थ क्लब,राणा व्यायाम मंदिर यांच्यासह शक्तीउपासक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments

Popular Posts

*नम्रता गणेशराव धोत्रे कौलखेड अकोला या लाडक्या बहिणी विरुद्ध मलकापूर पो. स्टे. ला महाराष्ट्रातून पहिली तक्रार दाखल. मलकापूर (दिव्यांग शक्ती प्रतिनिध)ी*नुकताच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहिर केली मात्र अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसत आहे.अर्जदार महीला नम्रता यांनी प्रथमतः दि. ३०-०८-२०२४ रोजी योजनेचा अर्ज केला व अंतिमतः दि. ०२-०९-२०२४ रोजी त्यांचा शासनाद्वारे अर्ज मंजुर करण्यात आला आहे व त्याप्रमाणे प्रस्तुत अर्जदार हिस दरमहा १५००/- रूपये प्रमाणे निधी तिचे खात्यात प्राप्त झाला आहे. खरे म्हणजे अर्जदार नम्रता हिने खोटे व बनावटी हमीपत्राचा दस्त तयार करून त्यात खोटी व बनावटी माहित दिली व तो खरा आहे असे भासवुना जाणीव पूर्वक सदर दस्त संबंधीत अधिकाऱ्यांकडे सादर केला.त्याद्वारे शासनाची फसवणुक करून स्वतःचा गैरहक्की आर्थिक लाभ प्राप्त केला आहे.याबाबत सविस्तर असे की सदर योजने करीता पात्रता निकष असे की,ज्या महिलेच्या एकत्रीत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० /- रूपयांपेक्षा अधिक आहे, ज्या कुटूंबातील सदस्य आयकर दाता आहे, ज्या कुटूंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी म्हणुन सेवानिवृत्ती नंतर सेवानिवृत्ती वेतन घेतात, ज्यांच्या कुटूंबात चारचाकी वाहन आहे किंवा ज्या कुटूंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरत नाही. पात्र अर्जदार लाडक्या बहिणीला तसे हमीपत्र सुद्धा द्यावे लागते.असे निकष असताना अर्जदार लाडकी बहिण नम्रता हिने तिचे लग्नानंतरचे नावाने अर्ज केला आहे. सदर अर्जदार हिचे सासर कडील एकत्र कुटूंबाचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त आहे, सदर अर्जदार हिचे सासरे सेवानिवृत्ती वेतन घेतात, त्यांचे पती दिपक चांभारे पाटील नावाने एकुण ६ एकर शेतजमिन आहे. म्हणजेच निकषाप्रमाणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे. असे असतांना देखील व सदरची बाब पुर्णतः माहिती व जाणीवेतील असतांना देखील प्रस्तुत अर्जदार हिने खोटे हमीपत्र निष्पादीत केले व सदर हमीपत्र व त्यातील मजकुर खोटा आहे याची माहिती व जाणीव असतांना गैरहक्की आर्थिक लाभाचे दुषित हेतुने त्याचा वापर करून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा आर्थिक लाभ प्राप्त करून घेतला आहे.प्रस्तुत अर्जदार ही तिचे पतीपासून गेल्या पाच ते सहा वर्षापासुन विभक्त राहत आहे. त्यांचेदरम्यान अकोला येथील न्यायालयात खावटीकरीता न्यायालयीन प्रकरणे सुरू असून सदर अर्जदार हिस तिचे पतीपासून एकत्रीतरित्या दरमहा ५०,००० /- रूपये खावटी मंजुर झाल्याची देखील तक्रारीत नमूद आहे. सबब निकषास पात्र नसतांना देखील खोटी माहिती देवून व खरी माहिती लपवून सदर अर्जदार हिने योजनेचा लाभ मिळविला आहे. सदर अर्जदार हिचे माहेरचे नांव नम्रता गणेश धोत्रे आहे व सदर धोत्रे परिवारात चारचाकी वाहन आहे व त्या परिवाराचे उत्पन्न देखील अडीच लाखापेक्षा जास्त आहे. असे असतांना स्वतःचे वैवाहिकस्थितीबाबत खोटी माहिती प्रस्तुत अर्जदाराने दिली असून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला आहे.सदर महिती जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसिलदार, मलकापूर यांचेकडून अर्ज व त्यासोबतची कागदपत्र यांची माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागणी केली असता. अर्जदार नम्रता यांनी खोटे हमीपत्र तयार करून त्यात खोटी माहिती देऊन शासनाची फसवणुक केल्याबाबतची व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला असल्याचे दिसले. नम्रता यांचे सदरचे कृत्य दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा असून त्याबाबत त्यांच्या विरूध्द मलकापूर पो. स्टे. ला फिर्याद श्री. राजेंद्र काजळे यांनी दिली आहे.