*सरपंच ताई यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक**जयरामगड येथे एतीहासीक ५१ लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्र वितरण

*सरपंच ताई यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक*
*जयरामगड येथे एतीहासीक ५१ लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्र वितरण*

*जयरामगड:-* (शेखर तायडे)येथे इतिहासात प्रथमच एकत्रित एकूण ५१ घरकुल गरजू लाभार्थ्यांना मंजूर झाल्याने परिसरामध्ये सरपंच ताई यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
        केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेत महाराष्ट्रासाठी २० लाख नवीन घरे मंजूर केली आहे. दरम्यान जयरामगड येथे प्रधानमंत्री आवास योजनेचे ५१ लाभार्थ्यांना घरकुलांचे मंजूरी पत्र वितरण करण्यात आले.   
       पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात २ महिन्यांपूर्वी केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या प्रयत्नाने केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेत महाराष्ट्रासाठी २० लाख नवीन घरे मंजूर केली होती. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २२ फेब्रुवारी रोजी पुणे येथे महाआवास अभियान २०२४-२५ ग्रामीण टप्पा-२ मधील घरकुल मंजूर झालेल्या २० लाख लाभाथ्यापैकी ५ लाभर्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात अमित शाह यांचे हस्ते मंजुरी पत्राचे वाटप केले.
         तसेच जयरामगड जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा येथे या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण लाभार्थ्यांना दाखवण्यात आले.जयरामगड येथे नव्याने प्रधानमंत्री आवास योजनेचे ५१ लाभार्थ्यांना मंजूरी पत्र वाटप करण्यात आले.लाभार्थ्याचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत कर्मचारी नितेश वानखडे यांनी केले.ग्रामपंचायत अधिकारी अंभोरे सर यांनी
प्रास्ताविक केले तर रोजगार सेवक गजानन बंड यांनी आभार प्रदर्शन केले.प्रसंगी गावच्या प्रथम नागरिक सौ.वानिताताई सुनिल जाधव,ग्रा. पं.सर्व सदस्या, तंटामुक्ती अध्यक्ष भिकाजी अढाव, संगणक परिचालक राम राठोड व गावातील शेकडो महिला, पुरूष व लाभार्थी तसेच इतर नागरिक उपस्थित होते.

Comments

Popular Posts

*नम्रता गणेशराव धोत्रे कौलखेड अकोला या लाडक्या बहिणी विरुद्ध मलकापूर पो. स्टे. ला महाराष्ट्रातून पहिली तक्रार दाखल. मलकापूर (दिव्यांग शक्ती प्रतिनिध)ी*नुकताच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहिर केली मात्र अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसत आहे.अर्जदार महीला नम्रता यांनी प्रथमतः दि. ३०-०८-२०२४ रोजी योजनेचा अर्ज केला व अंतिमतः दि. ०२-०९-२०२४ रोजी त्यांचा शासनाद्वारे अर्ज मंजुर करण्यात आला आहे व त्याप्रमाणे प्रस्तुत अर्जदार हिस दरमहा १५००/- रूपये प्रमाणे निधी तिचे खात्यात प्राप्त झाला आहे. खरे म्हणजे अर्जदार नम्रता हिने खोटे व बनावटी हमीपत्राचा दस्त तयार करून त्यात खोटी व बनावटी माहित दिली व तो खरा आहे असे भासवुना जाणीव पूर्वक सदर दस्त संबंधीत अधिकाऱ्यांकडे सादर केला.त्याद्वारे शासनाची फसवणुक करून स्वतःचा गैरहक्की आर्थिक लाभ प्राप्त केला आहे.याबाबत सविस्तर असे की सदर योजने करीता पात्रता निकष असे की,ज्या महिलेच्या एकत्रीत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० /- रूपयांपेक्षा अधिक आहे, ज्या कुटूंबातील सदस्य आयकर दाता आहे, ज्या कुटूंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी म्हणुन सेवानिवृत्ती नंतर सेवानिवृत्ती वेतन घेतात, ज्यांच्या कुटूंबात चारचाकी वाहन आहे किंवा ज्या कुटूंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरत नाही. पात्र अर्जदार लाडक्या बहिणीला तसे हमीपत्र सुद्धा द्यावे लागते.असे निकष असताना अर्जदार लाडकी बहिण नम्रता हिने तिचे लग्नानंतरचे नावाने अर्ज केला आहे. सदर अर्जदार हिचे सासर कडील एकत्र कुटूंबाचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त आहे, सदर अर्जदार हिचे सासरे सेवानिवृत्ती वेतन घेतात, त्यांचे पती दिपक चांभारे पाटील नावाने एकुण ६ एकर शेतजमिन आहे. म्हणजेच निकषाप्रमाणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे. असे असतांना देखील व सदरची बाब पुर्णतः माहिती व जाणीवेतील असतांना देखील प्रस्तुत अर्जदार हिने खोटे हमीपत्र निष्पादीत केले व सदर हमीपत्र व त्यातील मजकुर खोटा आहे याची माहिती व जाणीव असतांना गैरहक्की आर्थिक लाभाचे दुषित हेतुने त्याचा वापर करून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा आर्थिक लाभ प्राप्त करून घेतला आहे.प्रस्तुत अर्जदार ही तिचे पतीपासून गेल्या पाच ते सहा वर्षापासुन विभक्त राहत आहे. त्यांचेदरम्यान अकोला येथील न्यायालयात खावटीकरीता न्यायालयीन प्रकरणे सुरू असून सदर अर्जदार हिस तिचे पतीपासून एकत्रीतरित्या दरमहा ५०,००० /- रूपये खावटी मंजुर झाल्याची देखील तक्रारीत नमूद आहे. सबब निकषास पात्र नसतांना देखील खोटी माहिती देवून व खरी माहिती लपवून सदर अर्जदार हिने योजनेचा लाभ मिळविला आहे. सदर अर्जदार हिचे माहेरचे नांव नम्रता गणेश धोत्रे आहे व सदर धोत्रे परिवारात चारचाकी वाहन आहे व त्या परिवाराचे उत्पन्न देखील अडीच लाखापेक्षा जास्त आहे. असे असतांना स्वतःचे वैवाहिकस्थितीबाबत खोटी माहिती प्रस्तुत अर्जदाराने दिली असून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला आहे.सदर महिती जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसिलदार, मलकापूर यांचेकडून अर्ज व त्यासोबतची कागदपत्र यांची माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागणी केली असता. अर्जदार नम्रता यांनी खोटे हमीपत्र तयार करून त्यात खोटी माहिती देऊन शासनाची फसवणुक केल्याबाबतची व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला असल्याचे दिसले. नम्रता यांचे सदरचे कृत्य दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा असून त्याबाबत त्यांच्या विरूध्द मलकापूर पो. स्टे. ला फिर्याद श्री. राजेंद्र काजळे यांनी दिली आहे.