प्रा मोहम्मद फारुक राष्ट्रसंत गाडगेबाबा राज्यस्तरीय समाज भूषण 2025 पुरस्कारा ने सन्मानित

प्रा मोहम्मद फारुक राष्ट्रसंत गाडगेबाबा राज्यस्तरीय समाज भूषण 2025 पुरस्कारा ने सन्मानित 

खामगाव :- पहाट फाउंडेशन संभाजी नगर  च्या माध्यमातून राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय ग्रामविकास परिषदेचे आयोजन व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण शेगाव येथे करण्यात आले याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार प्रा मोहम्मद फारुक यांना राज्यस्तरीय समाजभूषण 2025 पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच यावेळी महाराष्ट्र भरातील विविध क्षेत्रात विशेष काम करणाऱ्याना राष्ट्रसंत गाडगेबाबा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचेउदघाटन मिसेस इंडिया श्वेता परदेशी यांच्या हस्ते झाले  याप्रसंगी  पाटोदा ग्राम पंचायत के सरपंच भास्कर पेरे पाटिल , ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भाऊ भोजने, डॉ.संजय गायकवाड, प्रा.रमेश गावित, पहाट फाउंडेशन च्या संचालिका अर्पिता सुरडकर, संचालक अमोल भिलंगे मंचावर विराजमान होते.
कार्यक्रमाचे  दुसऱ्या सत्रात भास्कर पेरे पाटील यांनी सांगितले की गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही ते पुढे म्हणाले की अशक्य कुठलीच गोष्ट नाही फक्त प्रयत्न हे योग्य दिशेने व्हायला पाहिजेत गावाच्या विकास करताना सर्व गावकऱ्यांना एकत्र करून विकासाची आखणी करणे गरजेचे आहे
दिवसभराच्या परिषेदेत एकूण पाच चर्चासत्र होते.त्यामध्ये शाश्वत ग्रामीण विकास आणि लोकांचा सहभाग, ग्रामीण विकासासाठी महिलांचा सहभाग, वातावरण बदलाचा होणारे परिणाम इत्यादी विषयांवर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केलेत. त्यामध्ये कृषी अधिकारी अमोल बनसोडे,अभयसिंग मारोडे, वैशाली चोपडे, सुवर्णा टापरे, विद्या सुमित डोसे , उदयकुमार पगाडे आदींनी सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती गवते व वैशाली भिलंगे यांनी केले. तर पहाट फाउंडेशन चे संचालक सोमनाथ चौधरी, रिक्लेमा वळवी, पल्लवी धांडे, नितीन कसाब, मेघना हिवाळे, अश्विनी राठोड, महादेव लोखंडे, संतोष घुंगासे, ऍड.निवृत्ती बोरसे आदींनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले तर आभार प्रदर्शन पहाट फाउंडेशन च्या संचालिका अर्पिता सुरडकर यांनी मानले.

Comments

Popular Posts

*नम्रता गणेशराव धोत्रे कौलखेड अकोला या लाडक्या बहिणी विरुद्ध मलकापूर पो. स्टे. ला महाराष्ट्रातून पहिली तक्रार दाखल. मलकापूर (दिव्यांग शक्ती प्रतिनिध)ी*नुकताच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहिर केली मात्र अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसत आहे.अर्जदार महीला नम्रता यांनी प्रथमतः दि. ३०-०८-२०२४ रोजी योजनेचा अर्ज केला व अंतिमतः दि. ०२-०९-२०२४ रोजी त्यांचा शासनाद्वारे अर्ज मंजुर करण्यात आला आहे व त्याप्रमाणे प्रस्तुत अर्जदार हिस दरमहा १५००/- रूपये प्रमाणे निधी तिचे खात्यात प्राप्त झाला आहे. खरे म्हणजे अर्जदार नम्रता हिने खोटे व बनावटी हमीपत्राचा दस्त तयार करून त्यात खोटी व बनावटी माहित दिली व तो खरा आहे असे भासवुना जाणीव पूर्वक सदर दस्त संबंधीत अधिकाऱ्यांकडे सादर केला.त्याद्वारे शासनाची फसवणुक करून स्वतःचा गैरहक्की आर्थिक लाभ प्राप्त केला आहे.याबाबत सविस्तर असे की सदर योजने करीता पात्रता निकष असे की,ज्या महिलेच्या एकत्रीत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० /- रूपयांपेक्षा अधिक आहे, ज्या कुटूंबातील सदस्य आयकर दाता आहे, ज्या कुटूंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी म्हणुन सेवानिवृत्ती नंतर सेवानिवृत्ती वेतन घेतात, ज्यांच्या कुटूंबात चारचाकी वाहन आहे किंवा ज्या कुटूंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरत नाही. पात्र अर्जदार लाडक्या बहिणीला तसे हमीपत्र सुद्धा द्यावे लागते.असे निकष असताना अर्जदार लाडकी बहिण नम्रता हिने तिचे लग्नानंतरचे नावाने अर्ज केला आहे. सदर अर्जदार हिचे सासर कडील एकत्र कुटूंबाचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त आहे, सदर अर्जदार हिचे सासरे सेवानिवृत्ती वेतन घेतात, त्यांचे पती दिपक चांभारे पाटील नावाने एकुण ६ एकर शेतजमिन आहे. म्हणजेच निकषाप्रमाणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे. असे असतांना देखील व सदरची बाब पुर्णतः माहिती व जाणीवेतील असतांना देखील प्रस्तुत अर्जदार हिने खोटे हमीपत्र निष्पादीत केले व सदर हमीपत्र व त्यातील मजकुर खोटा आहे याची माहिती व जाणीव असतांना गैरहक्की आर्थिक लाभाचे दुषित हेतुने त्याचा वापर करून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा आर्थिक लाभ प्राप्त करून घेतला आहे.प्रस्तुत अर्जदार ही तिचे पतीपासून गेल्या पाच ते सहा वर्षापासुन विभक्त राहत आहे. त्यांचेदरम्यान अकोला येथील न्यायालयात खावटीकरीता न्यायालयीन प्रकरणे सुरू असून सदर अर्जदार हिस तिचे पतीपासून एकत्रीतरित्या दरमहा ५०,००० /- रूपये खावटी मंजुर झाल्याची देखील तक्रारीत नमूद आहे. सबब निकषास पात्र नसतांना देखील खोटी माहिती देवून व खरी माहिती लपवून सदर अर्जदार हिने योजनेचा लाभ मिळविला आहे. सदर अर्जदार हिचे माहेरचे नांव नम्रता गणेश धोत्रे आहे व सदर धोत्रे परिवारात चारचाकी वाहन आहे व त्या परिवाराचे उत्पन्न देखील अडीच लाखापेक्षा जास्त आहे. असे असतांना स्वतःचे वैवाहिकस्थितीबाबत खोटी माहिती प्रस्तुत अर्जदाराने दिली असून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला आहे.सदर महिती जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसिलदार, मलकापूर यांचेकडून अर्ज व त्यासोबतची कागदपत्र यांची माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागणी केली असता. अर्जदार नम्रता यांनी खोटे हमीपत्र तयार करून त्यात खोटी माहिती देऊन शासनाची फसवणुक केल्याबाबतची व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला असल्याचे दिसले. नम्रता यांचे सदरचे कृत्य दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा असून त्याबाबत त्यांच्या विरूध्द मलकापूर पो. स्टे. ला फिर्याद श्री. राजेंद्र काजळे यांनी दिली आहे.