*बोगस UDID🧑🏼‍🦽 चा सुळसुळाट* *तर याचा फटका परिवहन सेवेला*खामगाव (शेखर तायडे)संपूर्ण देशभरात दिव्यांग बांधवांना प्रमाणपत्र वैद्यकीय कार्यालयातून प्राप्त होत आहे तर UDID कार्ड युनिक डिसेबिलिटी आईडी भारतीय पोस्ट सेवेच्या माध्यमातून दिव्यांगांच्या घरी वितरित होत आहे कार्ड UDID स्वावलंबन कार्ड म्हणूनही ओळखले जाते. हा १२ अंकी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर आहे, जो भारत सरकारकडून दिव्यांग व्यक्तींना म्हणजेच PWD श्रेणीतील लोकांना जारी केला जातो. या कार्डचे अनेक फायदे आहेत.या कार्डाची सत्यता तपासण्याकरिता त्यावरील क्यू आर कोड Q R कोड हा स्कॅन केला असता तत्काळ त्या दिव्यांग कार्डधारकाची माहिती उपलब्ध होते तर आपल्या आधार कार्ड वरील नंबर व जन्म तारीख वरूनही याची सत्यता तपासता येते या यु डी आय डी कार्ड सारखे साम्य असलेले बोगस कार्ड घेऊन खामगाव सह संपूर्ण जिल्ह्यात राज्यात व देशात हे बोगस काळधारक दिवसा ढवळ्या जनतेच्या परिवहन ST सेवेचा लाभ घेऊन तिजोरीवर डल्ला मारत आहेनुकतीच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ ST बसने बोगस कार्डाचा आधार घेत अनेक प्रवासी 'फुकट' प्रवास करीत असल्याचे समोर आले असून, चिखली येथील गत 6 दिवसात जेष्ठ नागरिकत्वाची 132 तर बोगस दिव्यांगात्वाची 76 UDID कार्ड जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. यासंदर्भातील माहिती आगार व्यवस्थापक यांनी दिली.तर अश्याच पद्धतीने केंद्र व राज्य सरकारच्या विविध सेवा संस्थेचा हे स्वावलंबन कार्डधारक UDID चा लाभ घेत आहेत अश्या बोगस UDID कार्ड धा देशद्रोह सह २०१६ दिव्यांग सुरक्षा रक्षक हमी कायद्ाअंतर्गत कार्यवाही करण्यात यावी या करिता परिवहन अधिकारी यांना अधिकार द्यावे सोबतच जिं प व इतर सरकारी यंत्रणा यांना पण त्याच पद्धतीत अधिकार द्यावे जेणेकरून दिव्यागांंना बदनाम करणारे हे बोगस अपंगकायद्याच्या दहशतीने जनतेच्या पैशाला धक्का लावण्याचे धाडस यांच्या कडून होणार नाहीत

Comments

Popular Posts

*नम्रता गणेशराव धोत्रे कौलखेड अकोला या लाडक्या बहिणी विरुद्ध मलकापूर पो. स्टे. ला महाराष्ट्रातून पहिली तक्रार दाखल. मलकापूर (दिव्यांग शक्ती प्रतिनिध)ी*नुकताच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहिर केली मात्र अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसत आहे.अर्जदार महीला नम्रता यांनी प्रथमतः दि. ३०-०८-२०२४ रोजी योजनेचा अर्ज केला व अंतिमतः दि. ०२-०९-२०२४ रोजी त्यांचा शासनाद्वारे अर्ज मंजुर करण्यात आला आहे व त्याप्रमाणे प्रस्तुत अर्जदार हिस दरमहा १५००/- रूपये प्रमाणे निधी तिचे खात्यात प्राप्त झाला आहे. खरे म्हणजे अर्जदार नम्रता हिने खोटे व बनावटी हमीपत्राचा दस्त तयार करून त्यात खोटी व बनावटी माहित दिली व तो खरा आहे असे भासवुना जाणीव पूर्वक सदर दस्त संबंधीत अधिकाऱ्यांकडे सादर केला.त्याद्वारे शासनाची फसवणुक करून स्वतःचा गैरहक्की आर्थिक लाभ प्राप्त केला आहे.याबाबत सविस्तर असे की सदर योजने करीता पात्रता निकष असे की,ज्या महिलेच्या एकत्रीत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० /- रूपयांपेक्षा अधिक आहे, ज्या कुटूंबातील सदस्य आयकर दाता आहे, ज्या कुटूंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी म्हणुन सेवानिवृत्ती नंतर सेवानिवृत्ती वेतन घेतात, ज्यांच्या कुटूंबात चारचाकी वाहन आहे किंवा ज्या कुटूंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरत नाही. पात्र अर्जदार लाडक्या बहिणीला तसे हमीपत्र सुद्धा द्यावे लागते.असे निकष असताना अर्जदार लाडकी बहिण नम्रता हिने तिचे लग्नानंतरचे नावाने अर्ज केला आहे. सदर अर्जदार हिचे सासर कडील एकत्र कुटूंबाचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त आहे, सदर अर्जदार हिचे सासरे सेवानिवृत्ती वेतन घेतात, त्यांचे पती दिपक चांभारे पाटील नावाने एकुण ६ एकर शेतजमिन आहे. म्हणजेच निकषाप्रमाणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे. असे असतांना देखील व सदरची बाब पुर्णतः माहिती व जाणीवेतील असतांना देखील प्रस्तुत अर्जदार हिने खोटे हमीपत्र निष्पादीत केले व सदर हमीपत्र व त्यातील मजकुर खोटा आहे याची माहिती व जाणीव असतांना गैरहक्की आर्थिक लाभाचे दुषित हेतुने त्याचा वापर करून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा आर्थिक लाभ प्राप्त करून घेतला आहे.प्रस्तुत अर्जदार ही तिचे पतीपासून गेल्या पाच ते सहा वर्षापासुन विभक्त राहत आहे. त्यांचेदरम्यान अकोला येथील न्यायालयात खावटीकरीता न्यायालयीन प्रकरणे सुरू असून सदर अर्जदार हिस तिचे पतीपासून एकत्रीतरित्या दरमहा ५०,००० /- रूपये खावटी मंजुर झाल्याची देखील तक्रारीत नमूद आहे. सबब निकषास पात्र नसतांना देखील खोटी माहिती देवून व खरी माहिती लपवून सदर अर्जदार हिने योजनेचा लाभ मिळविला आहे. सदर अर्जदार हिचे माहेरचे नांव नम्रता गणेश धोत्रे आहे व सदर धोत्रे परिवारात चारचाकी वाहन आहे व त्या परिवाराचे उत्पन्न देखील अडीच लाखापेक्षा जास्त आहे. असे असतांना स्वतःचे वैवाहिकस्थितीबाबत खोटी माहिती प्रस्तुत अर्जदाराने दिली असून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला आहे.सदर महिती जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसिलदार, मलकापूर यांचेकडून अर्ज व त्यासोबतची कागदपत्र यांची माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागणी केली असता. अर्जदार नम्रता यांनी खोटे हमीपत्र तयार करून त्यात खोटी माहिती देऊन शासनाची फसवणुक केल्याबाबतची व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला असल्याचे दिसले. नम्रता यांचे सदरचे कृत्य दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा असून त्याबाबत त्यांच्या विरूध्द मलकापूर पो. स्टे. ला फिर्याद श्री. राजेंद्र काजळे यांनी दिली आहे.