"प्रा.राजेश पाटिल ताले यांच्या कार्याचा राष्ट्रिय स्तरावर सन्मान" !!!सुपरस्टार अमिताभ बच्चन,मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना ज्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे यावर्षीचा तोच पुरस्कार *आऊटस्टँडिंग यंग पर्सन ऑफ द इंडिया अवॉर्ड :- २०२४* स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन चे अध्यक्ष माझोड चे सुपुत्र प्रा.राजेश पाटिल ताले यांच्या कार्यावर राष्ट्रीय सन्मानाची परत नवी मोहोर उमटली आहे.नुकत्याच हैद्राबाद येथे पार पडलेल्या *६९ व्या जेसीआय इंटरनॅशनल कॉन्व्हेंशन-२०२४* मध्ये जेसीआयतर्फे स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन चे अध्यक्ष, युथ आयकॉन प्रा.राजेश पाटिल ताले यांना *आऊटस्टँडिंग यंग पर्सन ऑफ द इंडिया अवॉर्ड :-२०२४* या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हैदराबाद येथे Novotel HICC Convention Center ला दि.२६ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ दरम्यान आयोजित *६९ व्या जेसीआय कॉन्व्हेंशन:-२०२४* पुरस्कार सोहळयात नुकताच तो मा.श्री.कविनकुमार कार्तिकेयन(इंटरनॅशनल प्रेसिडेंट जेसीआय),ऍड.रेखेश शर्मा(नॅशनल प्रेसिडेंट जेसीआय) या मान्यवरांच्या हस्ते स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन चे अध्यक्ष प्रा.राजेश पाटिल ताले यांना सन्मानित करण्यात आले.याद्वारे राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन चे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य,समाजातील युवकांना त्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देऊन जीवनात दिशा देणारे कार्य आणि सामाजिक बांधिलकीची दखल घेत संस्थेला आतापर्यंत अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन च्या वाचनालय चळवळ तसेच प्रा.राजेश पाटिल ताले यांच्या विविध व्याख्याने, कार्यशाळा,शिबिरे च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या जिवनात घडुन आलेला खास बदल, दिवसेंदिवस समाजात घडत असलेला बदल,शैक्षणिक व सामाजिक कार्यातील नावीन्यपूर्ण प्रयोग,संकल्पना व त्यातून घडलेल्या प्रत्यक्ष सकारात्मक बदलांची दखल घेत हा सन्मान बहाल केला गेला आहे. स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन या संस्थेच्या कार्याला पुरस्कार रूपाने मिळालेली ही पावती हा ग्रुपच्या कार्याचा सन्मान होय.स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन चे संचालक मंडळ,पदाधिकारी, मार्गदर्शकमंडळ तसेच सर्व सदस्य यांची शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात झोकून देऊन काम करण्याची वृत्ती,सातत्याने राबविलेले नवनवीन प्रयोग, नवनवीन जीवन कौशल्ये शिकण्याची जिज्ञासा असलेले विद्यार्थीच या सन्मानाचे खरे वाटेकरी आहेत,अशी प्रांजळ कबुली जेसीआय महाराष्ट्र चे शैलेष बोरले(मुंबई),अंकुश सोमाणी(नाशिक) तसेच प्रतीक सारडा(चंद्रपूर) यांनी यावेळी बोलताना दिली.

Comments

Popular Posts

*नम्रता गणेशराव धोत्रे कौलखेड अकोला या लाडक्या बहिणी विरुद्ध मलकापूर पो. स्टे. ला महाराष्ट्रातून पहिली तक्रार दाखल. मलकापूर (दिव्यांग शक्ती प्रतिनिध)ी*नुकताच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहिर केली मात्र अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसत आहे.अर्जदार महीला नम्रता यांनी प्रथमतः दि. ३०-०८-२०२४ रोजी योजनेचा अर्ज केला व अंतिमतः दि. ०२-०९-२०२४ रोजी त्यांचा शासनाद्वारे अर्ज मंजुर करण्यात आला आहे व त्याप्रमाणे प्रस्तुत अर्जदार हिस दरमहा १५००/- रूपये प्रमाणे निधी तिचे खात्यात प्राप्त झाला आहे. खरे म्हणजे अर्जदार नम्रता हिने खोटे व बनावटी हमीपत्राचा दस्त तयार करून त्यात खोटी व बनावटी माहित दिली व तो खरा आहे असे भासवुना जाणीव पूर्वक सदर दस्त संबंधीत अधिकाऱ्यांकडे सादर केला.त्याद्वारे शासनाची फसवणुक करून स्वतःचा गैरहक्की आर्थिक लाभ प्राप्त केला आहे.याबाबत सविस्तर असे की सदर योजने करीता पात्रता निकष असे की,ज्या महिलेच्या एकत्रीत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० /- रूपयांपेक्षा अधिक आहे, ज्या कुटूंबातील सदस्य आयकर दाता आहे, ज्या कुटूंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी म्हणुन सेवानिवृत्ती नंतर सेवानिवृत्ती वेतन घेतात, ज्यांच्या कुटूंबात चारचाकी वाहन आहे किंवा ज्या कुटूंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरत नाही. पात्र अर्जदार लाडक्या बहिणीला तसे हमीपत्र सुद्धा द्यावे लागते.असे निकष असताना अर्जदार लाडकी बहिण नम्रता हिने तिचे लग्नानंतरचे नावाने अर्ज केला आहे. सदर अर्जदार हिचे सासर कडील एकत्र कुटूंबाचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त आहे, सदर अर्जदार हिचे सासरे सेवानिवृत्ती वेतन घेतात, त्यांचे पती दिपक चांभारे पाटील नावाने एकुण ६ एकर शेतजमिन आहे. म्हणजेच निकषाप्रमाणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे. असे असतांना देखील व सदरची बाब पुर्णतः माहिती व जाणीवेतील असतांना देखील प्रस्तुत अर्जदार हिने खोटे हमीपत्र निष्पादीत केले व सदर हमीपत्र व त्यातील मजकुर खोटा आहे याची माहिती व जाणीव असतांना गैरहक्की आर्थिक लाभाचे दुषित हेतुने त्याचा वापर करून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा आर्थिक लाभ प्राप्त करून घेतला आहे.प्रस्तुत अर्जदार ही तिचे पतीपासून गेल्या पाच ते सहा वर्षापासुन विभक्त राहत आहे. त्यांचेदरम्यान अकोला येथील न्यायालयात खावटीकरीता न्यायालयीन प्रकरणे सुरू असून सदर अर्जदार हिस तिचे पतीपासून एकत्रीतरित्या दरमहा ५०,००० /- रूपये खावटी मंजुर झाल्याची देखील तक्रारीत नमूद आहे. सबब निकषास पात्र नसतांना देखील खोटी माहिती देवून व खरी माहिती लपवून सदर अर्जदार हिने योजनेचा लाभ मिळविला आहे. सदर अर्जदार हिचे माहेरचे नांव नम्रता गणेश धोत्रे आहे व सदर धोत्रे परिवारात चारचाकी वाहन आहे व त्या परिवाराचे उत्पन्न देखील अडीच लाखापेक्षा जास्त आहे. असे असतांना स्वतःचे वैवाहिकस्थितीबाबत खोटी माहिती प्रस्तुत अर्जदाराने दिली असून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला आहे.सदर महिती जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसिलदार, मलकापूर यांचेकडून अर्ज व त्यासोबतची कागदपत्र यांची माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागणी केली असता. अर्जदार नम्रता यांनी खोटे हमीपत्र तयार करून त्यात खोटी माहिती देऊन शासनाची फसवणुक केल्याबाबतची व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला असल्याचे दिसले. नम्रता यांचे सदरचे कृत्य दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा असून त्याबाबत त्यांच्या विरूध्द मलकापूर पो. स्टे. ला फिर्याद श्री. राजेंद्र काजळे यांनी दिली आहे.