*शहरातील सर्वात भव्य विज्ञान प्रदर्शन युगधर्म पब्लिक स्कूलमध्ये – विज्ञान, सृजनशीलता आणि तंत्रज्ञानाचा संगम! *

खामगाव: युगधर्म पब्लिक स्कूलतर्फे विज्ञानाच्या नवकल्पनांना आणि विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या शहरातील सर्वात मोठ्या विज्ञान प्रदर्शनाला भेट देण्याची संधी चुकवू नका! हे प्रदर्शन *३० नोव्हेंबर २०२४ ते १ डिसेंबर २०२४* दरम्यान, *सकाळी १० ते सायंकाळी ५* वाजेपर्यंत भरविण्यात येणार आहे.                                               कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी *सुप्रसिद्ध उद्योजक श्री. संतोषजी देशमुख* तर उद्घाटक म्हणून  *खामगाव बी.एड. कॉलेजचे प्राचार्य श्री. गजाननजी शर्मा,* *सूर्योदय एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष श्री गोपालजी अग्रवाल*  उपस्थित राहणार आहेत.     या प्रदर्शनाचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेली अनोखी वैज्ञानिक मॉडेल्स. केवळ शाळेपुरती मर्यादित न ठेवता ही प्रदर्शनी सर्व पालकांसाठी खुली करण्यात आली आहे, ज्यामुळे विज्ञानप्रेमींच्या कल्पकतेला नवी दिशा मिळेल.                                            पालकांसाठी आयोजित क्विझ आणि विविध  मनोरंजक स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यामध्ये विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसे आहेत.विद्यार्थ्यांसाठी *पर्यावरणपूरक विज्ञान उपक्रम,* ज्यात पुष्पगुच्छ तयार करून सृजनशीलता व तंत्रज्ञानाला पर्यावरणाशी जोडण्याचा प्रयत्न आहे.          शहरातील विज्ञानप्रेमी नागरिक, पालक, आणि विद्यार्थ्यांसाठी हे प्रदर्शन म्हणजे विज्ञानाचा साजरा करण्याचा एक अनोखा उत्सव आहे.               तर मग, *विज्ञानाची नवी दालने उघडण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला पंख देण्यासाठी आणि विज्ञान, तंत्रज्ञान, व पर्यावरणाचा नवा अध्याय अनुभवण्यासाठी* विज्ञान प्रदर्शनीला  नक्की भेट द्या!तुमची उपस्थिती *उद्याच्या वैज्ञानिकांना नवसंजीवनी देईल!* असे आव्हान शाळेचं प्राचार्य श्री यशवंतजी बोदडे सर यांनी केले

Comments

Popular Posts

*नम्रता गणेशराव धोत्रे कौलखेड अकोला या लाडक्या बहिणी विरुद्ध मलकापूर पो. स्टे. ला महाराष्ट्रातून पहिली तक्रार दाखल. मलकापूर (दिव्यांग शक्ती प्रतिनिध)ी*नुकताच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहिर केली मात्र अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसत आहे.अर्जदार महीला नम्रता यांनी प्रथमतः दि. ३०-०८-२०२४ रोजी योजनेचा अर्ज केला व अंतिमतः दि. ०२-०९-२०२४ रोजी त्यांचा शासनाद्वारे अर्ज मंजुर करण्यात आला आहे व त्याप्रमाणे प्रस्तुत अर्जदार हिस दरमहा १५००/- रूपये प्रमाणे निधी तिचे खात्यात प्राप्त झाला आहे. खरे म्हणजे अर्जदार नम्रता हिने खोटे व बनावटी हमीपत्राचा दस्त तयार करून त्यात खोटी व बनावटी माहित दिली व तो खरा आहे असे भासवुना जाणीव पूर्वक सदर दस्त संबंधीत अधिकाऱ्यांकडे सादर केला.त्याद्वारे शासनाची फसवणुक करून स्वतःचा गैरहक्की आर्थिक लाभ प्राप्त केला आहे.याबाबत सविस्तर असे की सदर योजने करीता पात्रता निकष असे की,ज्या महिलेच्या एकत्रीत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० /- रूपयांपेक्षा अधिक आहे, ज्या कुटूंबातील सदस्य आयकर दाता आहे, ज्या कुटूंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी म्हणुन सेवानिवृत्ती नंतर सेवानिवृत्ती वेतन घेतात, ज्यांच्या कुटूंबात चारचाकी वाहन आहे किंवा ज्या कुटूंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरत नाही. पात्र अर्जदार लाडक्या बहिणीला तसे हमीपत्र सुद्धा द्यावे लागते.असे निकष असताना अर्जदार लाडकी बहिण नम्रता हिने तिचे लग्नानंतरचे नावाने अर्ज केला आहे. सदर अर्जदार हिचे सासर कडील एकत्र कुटूंबाचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त आहे, सदर अर्जदार हिचे सासरे सेवानिवृत्ती वेतन घेतात, त्यांचे पती दिपक चांभारे पाटील नावाने एकुण ६ एकर शेतजमिन आहे. म्हणजेच निकषाप्रमाणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे. असे असतांना देखील व सदरची बाब पुर्णतः माहिती व जाणीवेतील असतांना देखील प्रस्तुत अर्जदार हिने खोटे हमीपत्र निष्पादीत केले व सदर हमीपत्र व त्यातील मजकुर खोटा आहे याची माहिती व जाणीव असतांना गैरहक्की आर्थिक लाभाचे दुषित हेतुने त्याचा वापर करून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा आर्थिक लाभ प्राप्त करून घेतला आहे.प्रस्तुत अर्जदार ही तिचे पतीपासून गेल्या पाच ते सहा वर्षापासुन विभक्त राहत आहे. त्यांचेदरम्यान अकोला येथील न्यायालयात खावटीकरीता न्यायालयीन प्रकरणे सुरू असून सदर अर्जदार हिस तिचे पतीपासून एकत्रीतरित्या दरमहा ५०,००० /- रूपये खावटी मंजुर झाल्याची देखील तक्रारीत नमूद आहे. सबब निकषास पात्र नसतांना देखील खोटी माहिती देवून व खरी माहिती लपवून सदर अर्जदार हिने योजनेचा लाभ मिळविला आहे. सदर अर्जदार हिचे माहेरचे नांव नम्रता गणेश धोत्रे आहे व सदर धोत्रे परिवारात चारचाकी वाहन आहे व त्या परिवाराचे उत्पन्न देखील अडीच लाखापेक्षा जास्त आहे. असे असतांना स्वतःचे वैवाहिकस्थितीबाबत खोटी माहिती प्रस्तुत अर्जदाराने दिली असून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला आहे.सदर महिती जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसिलदार, मलकापूर यांचेकडून अर्ज व त्यासोबतची कागदपत्र यांची माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागणी केली असता. अर्जदार नम्रता यांनी खोटे हमीपत्र तयार करून त्यात खोटी माहिती देऊन शासनाची फसवणुक केल्याबाबतची व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला असल्याचे दिसले. नम्रता यांचे सदरचे कृत्य दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा असून त्याबाबत त्यांच्या विरूध्द मलकापूर पो. स्टे. ला फिर्याद श्री. राजेंद्र काजळे यांनी दिली आहे.