यंदा अभाविप चे 53 वे प्रदेश अधिवेशन नागपुरात

 राष्ट्रीय सहसंघटन मंत्री देवदत्त जोशींच्या उपस्थितीत  अधिवेशन लोगोचे विमोचन

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हे शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात काम करणारी जगातली सर्वात मोठी विद्यार्थी संघटन आहे हे आपण जाणताच यावर्षी अभावीपने देशभरात 55,12,470 सदस्यता करून पुन्हा एकदा जगातील सर्वात मोठे विद्यार्थी संघटन म्हणून विक्रम प्रस्थापित केला.

विद्यार्थी परिषद दरवर्षी आपले प्रदेश अधिवेशन करत असते या अधिवेशनात प्रदेशातील कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात युवा तरुणाई विद्यार्थी एकत्रित येत असतात या अधिवेशनात विविध शैक्षणिक व सामाजिक समस्यांवर सर्व विद्यार्थ्यांचे मत घेऊन त्या समस्या सोडविण्यासाठी प्रस्ताव पारित होतात.

विद्यार्थी परिषदेचे अधिवेशन म्हणजे  तरुणाई मध्ये उत्साह, उर्जा पूर्ण वातावरण निर्माण करण्याचे एक कार्य होय. यात विद्यार्थ्यांच्या मनामध्ये विविध विषय चालू असतात त्या विषयांना हात घालत त्यापैकी महत्त्वाचे सध्या स्थितींवर आधारित विषयांवर भाषणही होत असतात. सोबतच भव्य दिव्य अशी शोभायात्रा निघून त्यामध्ये सुद्धा युवा नेतृत्वाला मंच मिळत असते .सोबतच प्रदेश अधिवेशनात प्रदेशाचे नूतन अध्यक्ष, मंत्री आणि कार्यकारणी घोषित होत असते जी संपूर्ण वर्षभरात कार्यरत असते. 

अशा या भव्य दिव्य आणि तरुनाईला दिशा देणारे, प्रेरणा देणारे व नेतृत्वाला उभारी देणारे

यंदा विदर्भ प्रांताचे 53 वे अधिवेशन दि. 28, 29, 30 जानेवरी 2025 ला नागपुरात होणार आहे, आणि आज राष्ट्रीय सहसंघटन मंत्री देवदत्त जोशी, क्षेत्रीय संघटन मंत्री गितेश चव्हाण, प्रदेश अध्यक्ष प्रा. नितीन गुप्ता, प्रदेश मंत्री कु. पायल कीनाके, प्रदेश संघटन मंत्री विक्रमजीत कलाने, प्रदेश सहसंघटन मंत्री मनोज साबळे यांच्या उपस्थितीत अधिवेशन लोगोचे विमोचन नागपुरात करण्यात आले.

वरील सर्व माहिती विदर्भ प्रदेश मीडिया संयोजक अबुजर हुसैन यांनी पाठविली

Comments

Popular Posts

*नम्रता गणेशराव धोत्रे कौलखेड अकोला या लाडक्या बहिणी विरुद्ध मलकापूर पो. स्टे. ला महाराष्ट्रातून पहिली तक्रार दाखल. मलकापूर (दिव्यांग शक्ती प्रतिनिध)ी*नुकताच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहिर केली मात्र अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसत आहे.अर्जदार महीला नम्रता यांनी प्रथमतः दि. ३०-०८-२०२४ रोजी योजनेचा अर्ज केला व अंतिमतः दि. ०२-०९-२०२४ रोजी त्यांचा शासनाद्वारे अर्ज मंजुर करण्यात आला आहे व त्याप्रमाणे प्रस्तुत अर्जदार हिस दरमहा १५००/- रूपये प्रमाणे निधी तिचे खात्यात प्राप्त झाला आहे. खरे म्हणजे अर्जदार नम्रता हिने खोटे व बनावटी हमीपत्राचा दस्त तयार करून त्यात खोटी व बनावटी माहित दिली व तो खरा आहे असे भासवुना जाणीव पूर्वक सदर दस्त संबंधीत अधिकाऱ्यांकडे सादर केला.त्याद्वारे शासनाची फसवणुक करून स्वतःचा गैरहक्की आर्थिक लाभ प्राप्त केला आहे.याबाबत सविस्तर असे की सदर योजने करीता पात्रता निकष असे की,ज्या महिलेच्या एकत्रीत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० /- रूपयांपेक्षा अधिक आहे, ज्या कुटूंबातील सदस्य आयकर दाता आहे, ज्या कुटूंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी म्हणुन सेवानिवृत्ती नंतर सेवानिवृत्ती वेतन घेतात, ज्यांच्या कुटूंबात चारचाकी वाहन आहे किंवा ज्या कुटूंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरत नाही. पात्र अर्जदार लाडक्या बहिणीला तसे हमीपत्र सुद्धा द्यावे लागते.असे निकष असताना अर्जदार लाडकी बहिण नम्रता हिने तिचे लग्नानंतरचे नावाने अर्ज केला आहे. सदर अर्जदार हिचे सासर कडील एकत्र कुटूंबाचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त आहे, सदर अर्जदार हिचे सासरे सेवानिवृत्ती वेतन घेतात, त्यांचे पती दिपक चांभारे पाटील नावाने एकुण ६ एकर शेतजमिन आहे. म्हणजेच निकषाप्रमाणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे. असे असतांना देखील व सदरची बाब पुर्णतः माहिती व जाणीवेतील असतांना देखील प्रस्तुत अर्जदार हिने खोटे हमीपत्र निष्पादीत केले व सदर हमीपत्र व त्यातील मजकुर खोटा आहे याची माहिती व जाणीव असतांना गैरहक्की आर्थिक लाभाचे दुषित हेतुने त्याचा वापर करून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा आर्थिक लाभ प्राप्त करून घेतला आहे.प्रस्तुत अर्जदार ही तिचे पतीपासून गेल्या पाच ते सहा वर्षापासुन विभक्त राहत आहे. त्यांचेदरम्यान अकोला येथील न्यायालयात खावटीकरीता न्यायालयीन प्रकरणे सुरू असून सदर अर्जदार हिस तिचे पतीपासून एकत्रीतरित्या दरमहा ५०,००० /- रूपये खावटी मंजुर झाल्याची देखील तक्रारीत नमूद आहे. सबब निकषास पात्र नसतांना देखील खोटी माहिती देवून व खरी माहिती लपवून सदर अर्जदार हिने योजनेचा लाभ मिळविला आहे. सदर अर्जदार हिचे माहेरचे नांव नम्रता गणेश धोत्रे आहे व सदर धोत्रे परिवारात चारचाकी वाहन आहे व त्या परिवाराचे उत्पन्न देखील अडीच लाखापेक्षा जास्त आहे. असे असतांना स्वतःचे वैवाहिकस्थितीबाबत खोटी माहिती प्रस्तुत अर्जदाराने दिली असून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला आहे.सदर महिती जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसिलदार, मलकापूर यांचेकडून अर्ज व त्यासोबतची कागदपत्र यांची माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागणी केली असता. अर्जदार नम्रता यांनी खोटे हमीपत्र तयार करून त्यात खोटी माहिती देऊन शासनाची फसवणुक केल्याबाबतची व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला असल्याचे दिसले. नम्रता यांचे सदरचे कृत्य दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा असून त्याबाबत त्यांच्या विरूध्द मलकापूर पो. स्टे. ला फिर्याद श्री. राजेंद्र काजळे यांनी दिली आहे.